शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर मोर्चा, संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 14:45 IST

वेळ पडल्यास मुख्यमंत्री निवासस्थानी धडक देण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी  दिला आहे. 

नारायण गावसपणजी : संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प लवकर सुरु करावा या मागणीसाठी गोमंतक ऊस उत्पादक संघटनेच्या शेकडो शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर धडक मोर्चा.  मुख्यमंत्री तसेच कृषीमंत्र्यांकडून यावर स्पष्टीकरण मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदानावर बसून राहण्याचा निर्णय या शेतकऱ्यांनी घेतला. वेळ पडल्यास मुख्यमंत्री निवासस्थानी धडक देण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी  दिला आहे. 

गेली अनेक वर्षे संजीवनी साखर कारखाना बंद आहे. संजीवनी साखर कारखाना बंद केला यामुळे आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बैठक घेऊन हा साखर कारखाना सुरु करा अशी मागणी केली. आता सरकारने या ठिकाणी पीपीपी तत्त्वावर इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यालाही आम्ही  पाठिंबा दिला. पण अजूनही काहीच झालेले नाही. गेले चार दिवस आम्ही साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले पण कुणीच याची दखल घेतली नसल्याचे आज पणजीतील आझाद मैदानावर न्यायासाठी यावे लागले, असे यावेळी गोमंतक ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

सरकारने सरळ भूमिका घ्यावीसरकारने  संजीवनी साखर कारखाना बंद होणार की पुन्हा सुरु करणार याची सरळ भूमिका घ्यावी. भागधारक शेतकऱ्यांना ताटकळत ठेऊ नये. आता लोक शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. साखर कारखाना बंद पडल्याने ऊस उत्पादन कमी झाले आहे. सरकारने हा कारखाना स्वताही सुरु करत नाही तसेच पीपीपी तत्वावरही अद्याप सुरु कलेला नाही. फक़्त शेतकऱ्यांना खोटी आश्वासने दिली जातात. या साखर कारखान्याचे जवळपास ७०० भागधारक शेतकरी आहेत. जर साखर कारखाना पुन्हा सुरु झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर यावे लागणार आहे, असे या शेतकऱ्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा भर उन्हात मोर्चाराज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आझाद मैदानावर उन्हात मोर्चा सुरु केला.  जय जवान जय किसानचा नारा देत संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. यात अनेक महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता. सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करते असे सांगितले जाते, पण प्रत्येक्षात शेतकऱ्यांच्या मागणीकडे डोळेझाक केली जाते. आम्ही फक्त मुख्यमंत्र्यांकडे ठोस आश्वासन मागत आहाेत. आम्ही सरकारच्या विरोधात नाही असेही या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा