शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर मोर्चा, संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 14:45 IST

वेळ पडल्यास मुख्यमंत्री निवासस्थानी धडक देण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी  दिला आहे. 

नारायण गावसपणजी : संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प लवकर सुरु करावा या मागणीसाठी गोमंतक ऊस उत्पादक संघटनेच्या शेकडो शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर धडक मोर्चा.  मुख्यमंत्री तसेच कृषीमंत्र्यांकडून यावर स्पष्टीकरण मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदानावर बसून राहण्याचा निर्णय या शेतकऱ्यांनी घेतला. वेळ पडल्यास मुख्यमंत्री निवासस्थानी धडक देण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी  दिला आहे. 

गेली अनेक वर्षे संजीवनी साखर कारखाना बंद आहे. संजीवनी साखर कारखाना बंद केला यामुळे आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बैठक घेऊन हा साखर कारखाना सुरु करा अशी मागणी केली. आता सरकारने या ठिकाणी पीपीपी तत्त्वावर इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यालाही आम्ही  पाठिंबा दिला. पण अजूनही काहीच झालेले नाही. गेले चार दिवस आम्ही साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले पण कुणीच याची दखल घेतली नसल्याचे आज पणजीतील आझाद मैदानावर न्यायासाठी यावे लागले, असे यावेळी गोमंतक ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

सरकारने सरळ भूमिका घ्यावीसरकारने  संजीवनी साखर कारखाना बंद होणार की पुन्हा सुरु करणार याची सरळ भूमिका घ्यावी. भागधारक शेतकऱ्यांना ताटकळत ठेऊ नये. आता लोक शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. साखर कारखाना बंद पडल्याने ऊस उत्पादन कमी झाले आहे. सरकारने हा कारखाना स्वताही सुरु करत नाही तसेच पीपीपी तत्वावरही अद्याप सुरु कलेला नाही. फक़्त शेतकऱ्यांना खोटी आश्वासने दिली जातात. या साखर कारखान्याचे जवळपास ७०० भागधारक शेतकरी आहेत. जर साखर कारखाना पुन्हा सुरु झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर यावे लागणार आहे, असे या शेतकऱ्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा भर उन्हात मोर्चाराज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आझाद मैदानावर उन्हात मोर्चा सुरु केला.  जय जवान जय किसानचा नारा देत संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. यात अनेक महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता. सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करते असे सांगितले जाते, पण प्रत्येक्षात शेतकऱ्यांच्या मागणीकडे डोळेझाक केली जाते. आम्ही फक्त मुख्यमंत्र्यांकडे ठोस आश्वासन मागत आहाेत. आम्ही सरकारच्या विरोधात नाही असेही या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा