शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिने पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा: जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

By किशोर कुबल | Updated: April 5, 2024 15:10 IST

चिंतेचे कारण नाही ; कालव्यांचे पाणी १५ मे पासून बंद करणार

किशोर कुबल, पणजी : राज्यातील धरणांमध्ये पुढील दोन महिने पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा असून चिंतेचे कारण नाही, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पष्ट केले. कालव्यांमधून सिंचनासाठीचे पाणी १५ मे पासून बंद केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना शिरोडकर म्हणाले की, 'धरणांमधील पाण्याची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे. साळावली धरणात ११,७८५ हेक्टर मिटर पाणी असून ते पुढील १३० दिवस पुरेल एवढे आहे. या धरणातून आम्ही रोज ९० हेक्टर मीटर पाणी घेतो. त्या हिशोबाने १३० दिवस पाणी पुरेल एवढे पाणी या धरणात आहे. तिळारी धरणात १२,५६७ हेक्टर मीटर पाणी असून या धरणातून रोज १५६ हेक्टर मीटर पाणी आम्ही घेतो. त्यामुळे पुढील १४४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा या धरणात आहे. चापोली धरणात ४६० दिवस पुरे एवढा पाणीसाठा आहे.

तिथे जास्त पाणी वापरले जात नाही. अंजुणे धरणात ७० दिवस पुरेल एवढे पाणी आहे. आमठाणे धरणात पंपिंग स्टेशन असल्याने कमी जास्त प्रमाणात पाणी असते. ही सर्व स्थिती पाहता पुढील दोन महिने उलटूनही दहा ते पंधरा दिवस पाणी पुरेल एवढा साठा आहे. त्यामुळे मान्सून लांबणीवर पडला तरी चिंतेचे कारण नाही, असा दावा शिरोडकर यांनी केला.

ते म्हणाले की' पंचवाडी धरणात १२७ दिवस पुरेल एवढे पाणी आहे या धरणातून रोज ५ ते ८ एमएलडी पाणी घेतले जाते. तेथे १७६ हेक्टर मीटर पाणी आहे. गेल्या वर्षी २४ जून पर्यंत पंचवाडी धरण क्षेत्रात पाऊस झाला नव्हता. त्यामुळे हे धरण आटले होते. परंतु यंदा स्थिती समाधानकारक आहे.

कालव्यांमधून सिंचनासाठीचे पाणी १५ मे पासून पाणी बंद करणार

अंजुणे किंवा इतर धरणांमधून भात शेतीसाठी कालव्यांद्वारे सिंचनासाठी दिले जाणारे पाणी हळूहळू कमी करून १५ मे रोजी बंद केले जाईल. या हंगामधील भात शेतीची कापणी साधारणपणे २० ते ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होते त्यामुळे पुढे शेतकऱ्यांना पाणी लागत नाही. १५ मेपर्यंत कालव्याचे पाणी बंद केले जाईल., असे शिरोडकर यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाWaterपाणी