शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

दोन महिने पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा: जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

By किशोर कुबल | Updated: April 5, 2024 15:10 IST

चिंतेचे कारण नाही ; कालव्यांचे पाणी १५ मे पासून बंद करणार

किशोर कुबल, पणजी : राज्यातील धरणांमध्ये पुढील दोन महिने पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा असून चिंतेचे कारण नाही, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पष्ट केले. कालव्यांमधून सिंचनासाठीचे पाणी १५ मे पासून बंद केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना शिरोडकर म्हणाले की, 'धरणांमधील पाण्याची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे. साळावली धरणात ११,७८५ हेक्टर मिटर पाणी असून ते पुढील १३० दिवस पुरेल एवढे आहे. या धरणातून आम्ही रोज ९० हेक्टर मीटर पाणी घेतो. त्या हिशोबाने १३० दिवस पाणी पुरेल एवढे पाणी या धरणात आहे. तिळारी धरणात १२,५६७ हेक्टर मीटर पाणी असून या धरणातून रोज १५६ हेक्टर मीटर पाणी आम्ही घेतो. त्यामुळे पुढील १४४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा या धरणात आहे. चापोली धरणात ४६० दिवस पुरे एवढा पाणीसाठा आहे.

तिथे जास्त पाणी वापरले जात नाही. अंजुणे धरणात ७० दिवस पुरेल एवढे पाणी आहे. आमठाणे धरणात पंपिंग स्टेशन असल्याने कमी जास्त प्रमाणात पाणी असते. ही सर्व स्थिती पाहता पुढील दोन महिने उलटूनही दहा ते पंधरा दिवस पाणी पुरेल एवढा साठा आहे. त्यामुळे मान्सून लांबणीवर पडला तरी चिंतेचे कारण नाही, असा दावा शिरोडकर यांनी केला.

ते म्हणाले की' पंचवाडी धरणात १२७ दिवस पुरेल एवढे पाणी आहे या धरणातून रोज ५ ते ८ एमएलडी पाणी घेतले जाते. तेथे १७६ हेक्टर मीटर पाणी आहे. गेल्या वर्षी २४ जून पर्यंत पंचवाडी धरण क्षेत्रात पाऊस झाला नव्हता. त्यामुळे हे धरण आटले होते. परंतु यंदा स्थिती समाधानकारक आहे.

कालव्यांमधून सिंचनासाठीचे पाणी १५ मे पासून पाणी बंद करणार

अंजुणे किंवा इतर धरणांमधून भात शेतीसाठी कालव्यांद्वारे सिंचनासाठी दिले जाणारे पाणी हळूहळू कमी करून १५ मे रोजी बंद केले जाईल. या हंगामधील भात शेतीची कापणी साधारणपणे २० ते ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होते त्यामुळे पुढे शेतकऱ्यांना पाणी लागत नाही. १५ मेपर्यंत कालव्याचे पाणी बंद केले जाईल., असे शिरोडकर यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाWaterपाणी