शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

दोन महिने पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा: जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

By किशोर कुबल | Updated: April 5, 2024 15:10 IST

चिंतेचे कारण नाही ; कालव्यांचे पाणी १५ मे पासून बंद करणार

किशोर कुबल, पणजी : राज्यातील धरणांमध्ये पुढील दोन महिने पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा असून चिंतेचे कारण नाही, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पष्ट केले. कालव्यांमधून सिंचनासाठीचे पाणी १५ मे पासून बंद केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना शिरोडकर म्हणाले की, 'धरणांमधील पाण्याची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे. साळावली धरणात ११,७८५ हेक्टर मिटर पाणी असून ते पुढील १३० दिवस पुरेल एवढे आहे. या धरणातून आम्ही रोज ९० हेक्टर मीटर पाणी घेतो. त्या हिशोबाने १३० दिवस पाणी पुरेल एवढे पाणी या धरणात आहे. तिळारी धरणात १२,५६७ हेक्टर मीटर पाणी असून या धरणातून रोज १५६ हेक्टर मीटर पाणी आम्ही घेतो. त्यामुळे पुढील १४४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा या धरणात आहे. चापोली धरणात ४६० दिवस पुरे एवढा पाणीसाठा आहे.

तिथे जास्त पाणी वापरले जात नाही. अंजुणे धरणात ७० दिवस पुरेल एवढे पाणी आहे. आमठाणे धरणात पंपिंग स्टेशन असल्याने कमी जास्त प्रमाणात पाणी असते. ही सर्व स्थिती पाहता पुढील दोन महिने उलटूनही दहा ते पंधरा दिवस पाणी पुरेल एवढा साठा आहे. त्यामुळे मान्सून लांबणीवर पडला तरी चिंतेचे कारण नाही, असा दावा शिरोडकर यांनी केला.

ते म्हणाले की' पंचवाडी धरणात १२७ दिवस पुरेल एवढे पाणी आहे या धरणातून रोज ५ ते ८ एमएलडी पाणी घेतले जाते. तेथे १७६ हेक्टर मीटर पाणी आहे. गेल्या वर्षी २४ जून पर्यंत पंचवाडी धरण क्षेत्रात पाऊस झाला नव्हता. त्यामुळे हे धरण आटले होते. परंतु यंदा स्थिती समाधानकारक आहे.

कालव्यांमधून सिंचनासाठीचे पाणी १५ मे पासून पाणी बंद करणार

अंजुणे किंवा इतर धरणांमधून भात शेतीसाठी कालव्यांद्वारे सिंचनासाठी दिले जाणारे पाणी हळूहळू कमी करून १५ मे रोजी बंद केले जाईल. या हंगामधील भात शेतीची कापणी साधारणपणे २० ते ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होते त्यामुळे पुढे शेतकऱ्यांना पाणी लागत नाही. १५ मेपर्यंत कालव्याचे पाणी बंद केले जाईल., असे शिरोडकर यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाWaterपाणी