शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

४९ दिवसांच्या लढ्याला यश, आदेश आला... मिराबाग बंधारा रद्दच!; आंदोलकांमध्ये आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 09:54 IST

तब्बल ४९ दिवस चाललेले ग्रामस्थांचे आंदोलन यामुळे संपुष्टात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, कुडचडे : मिराबाग बंधारा प्रकल्प अखेर अधिकृतपणे रद्द करण्यात आला आहे. त्यासंबंधीचा आदेश काल, शुक्रवारी सरकारकडून जारी झाला आहे. आंदोलकांनाही हा आदेश प्राप्त झाला असून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. तब्बल ४९ दिवस चाललेले ग्रामस्थांचे आंदोलन यामुळे संपुष्टात आले आहे.

या आदेशात स्पष्टपणे नमूद आहे की, स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध, सार्वजनिक भावना आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच भविष्यातील पाणीपुरवठा गरजांसाठी पर्यायी ठिकाणे शोधण्याचे निर्देशही संबंधित खात्याला देण्यात आले आहेत.

प्रकल्पाविरोधात मिराबाग परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमी एकत्र आले होते. बंधाऱ्यामुळे शेतीवर परिणाम, पाणीप्रवाहात अडथळे आणि पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला जोरदार विरोध झाला. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन, निदर्शने, तसेच पणजीतील आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी रस्त्यावर उतरून लढा दिला. अखेर सरकारला झुकावे लागले.

दरम्यान, आमदार विजय सरदेसाई यांनी हा निर्णय "लोकशक्तीचा विजय" असल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांचे अभिनंदन केले. मिराबाग येथे सुरू करण्यात आलेल्या बंधारा प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन प्रकल्प पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, भविष्यातील पाणीपुरवठा आणि सिंचनाच्या गरजांसाठी दक्षिण गोवा (कुशावती परिसर) येथे पर्यायी प्रकल्प राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये स्थानिकांशी सल्लामसलत करण्यावरही भर देण्यात आला आहे.

मिराबाग प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी ४९ दिवस ठिय्या आंदोलन केले. सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरू झालेला विरोध हळूहळू व्यापक स्वरूपात गेला. महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, तर शेतकऱ्यांनी शेती वाचवण्यासाठी लढा उभारला.

अनेक वेळा प्रशासनाशी चर्चा झाली, तरी समाधानकारक तोडगा निघाला नाही. अखेर सातत्यपूर्ण दबाव, एकजूट आणि शांततामय आंदोलनामुळे सरकारला निर्णय बदलावा लागला.

निर्णयानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे. "हा केवळ प्रकल्प रद्द होण्याचा निर्णय नाही, तर लोकशक्तीचा विजय आहे," अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mirabag Dam Project Cancelled After 49-Day Protest; Villagers Celebrate

Web Summary : The Mirabag dam project is officially cancelled after 49 days of protests. Villagers, farmers, and environmentalists united against the project citing agricultural and ecological concerns. The government has directed the department to find alternative water supply solutions.
टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार