शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची पर्यायी व्यवस्था करणार: जलस्रोतमंत्री, अस्नोडा प्रकल्पात अतिरिक्त जलशुद्धीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2024 09:07 IST

टंचाई भासणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पर्वरी पठारासह साळगाव, कांदोळी, कळंगुट, गिरी व हणजुण आदी भागांना पाणी टंचाईची झळ पोचू नये म्हणून जलस्रोत खात्याने अस्नोडा जलशुध्दीकरण प्रकल्पात अतिरिक्त दहा टक्के जलशुध्दीकरण प्रक्रिया सुरू करून ते पाणी थेट पर्वरीला देण्याची सोय केली आहे. तिळारीच्या कालव्याला शेजारी महाराष्ट्रात कुडासे येथे भगदाड पडल्याने या कालव्यातून पाणी पुरवठा बंद झाला आहे. पर्वरीतील जलशुध्दीकरण प्रकल्पाला तिळारीचे पाणी येते. या पाण्यावर अवलंबून असलेला पर्वरीतील हा प्रकल्प कालवे फुटल्यावर कोरडा पडतो आणि वरील भागातील लोकांचे प्रचंड हाल होतात.

तिळारीचे पाणी गोव्यासाठी बेभरवशाचे बनले आहे. कालवे बांधून २५ ते ३० वर्षे उलटली आहेत. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ते वरचेवर फुटत असतात. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये देखभाल दुरुस्तीसाठी कालवे बंद असतातच. शिवाय अधूनमधून कालवे फुटतात. गेल्या डिसेंबरमध्ये तिळारीच्या कालव्याचे गेट लॉक झाले. त्यामुळे पुणे येथून खास तंत्रज्ञ मागवावे लागले होते. पाच ते सहा तंत्रज्ञाना गेटचे लॉक उघडण्यासाठी सुमारे २० तास लागले होते. त्यानंतर तिळारीचे पाणी वाटेत कुठेही न वळवता थेट पर्वरी प्रकल्पाला सोडण्यात आले होते.

टंचाई भासणार नाही

जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'पर्वरी येथे जलकुंभात दोन दिवस पुरेल एवढे पाणी आहे. शिवाय पर्यायी व्यवस्था म्हणून आमठाणे येथून १०० एमएलडी पाणी आम्ही अस्नोडा प्रकल्पाला घेत असून, तेथून शुध्दीकरण करून थेट पर्वरीला पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पाण्याची कोणतीही टंचाई भासणार नाही. कालव्याच्या डागडुजीचे काम युध्दपातळीवर सुरू असून, दोन दिवसात पूर्ण होईल. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. मी पुन्हा आज, सोमवारी याचा आढावा घेणार आहे.'

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणी