शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पाण्याची पर्यायी व्यवस्था करणार: जलस्रोतमंत्री, अस्नोडा प्रकल्पात अतिरिक्त जलशुद्धीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2024 09:07 IST

टंचाई भासणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पर्वरी पठारासह साळगाव, कांदोळी, कळंगुट, गिरी व हणजुण आदी भागांना पाणी टंचाईची झळ पोचू नये म्हणून जलस्रोत खात्याने अस्नोडा जलशुध्दीकरण प्रकल्पात अतिरिक्त दहा टक्के जलशुध्दीकरण प्रक्रिया सुरू करून ते पाणी थेट पर्वरीला देण्याची सोय केली आहे. तिळारीच्या कालव्याला शेजारी महाराष्ट्रात कुडासे येथे भगदाड पडल्याने या कालव्यातून पाणी पुरवठा बंद झाला आहे. पर्वरीतील जलशुध्दीकरण प्रकल्पाला तिळारीचे पाणी येते. या पाण्यावर अवलंबून असलेला पर्वरीतील हा प्रकल्प कालवे फुटल्यावर कोरडा पडतो आणि वरील भागातील लोकांचे प्रचंड हाल होतात.

तिळारीचे पाणी गोव्यासाठी बेभरवशाचे बनले आहे. कालवे बांधून २५ ते ३० वर्षे उलटली आहेत. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ते वरचेवर फुटत असतात. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये देखभाल दुरुस्तीसाठी कालवे बंद असतातच. शिवाय अधूनमधून कालवे फुटतात. गेल्या डिसेंबरमध्ये तिळारीच्या कालव्याचे गेट लॉक झाले. त्यामुळे पुणे येथून खास तंत्रज्ञ मागवावे लागले होते. पाच ते सहा तंत्रज्ञाना गेटचे लॉक उघडण्यासाठी सुमारे २० तास लागले होते. त्यानंतर तिळारीचे पाणी वाटेत कुठेही न वळवता थेट पर्वरी प्रकल्पाला सोडण्यात आले होते.

टंचाई भासणार नाही

जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'पर्वरी येथे जलकुंभात दोन दिवस पुरेल एवढे पाणी आहे. शिवाय पर्यायी व्यवस्था म्हणून आमठाणे येथून १०० एमएलडी पाणी आम्ही अस्नोडा प्रकल्पाला घेत असून, तेथून शुध्दीकरण करून थेट पर्वरीला पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पाण्याची कोणतीही टंचाई भासणार नाही. कालव्याच्या डागडुजीचे काम युध्दपातळीवर सुरू असून, दोन दिवसात पूर्ण होईल. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. मी पुन्हा आज, सोमवारी याचा आढावा घेणार आहे.'

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणी