शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

पाण्याची पर्यायी व्यवस्था करणार: जलस्रोतमंत्री, अस्नोडा प्रकल्पात अतिरिक्त जलशुद्धीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2024 09:07 IST

टंचाई भासणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पर्वरी पठारासह साळगाव, कांदोळी, कळंगुट, गिरी व हणजुण आदी भागांना पाणी टंचाईची झळ पोचू नये म्हणून जलस्रोत खात्याने अस्नोडा जलशुध्दीकरण प्रकल्पात अतिरिक्त दहा टक्के जलशुध्दीकरण प्रक्रिया सुरू करून ते पाणी थेट पर्वरीला देण्याची सोय केली आहे. तिळारीच्या कालव्याला शेजारी महाराष्ट्रात कुडासे येथे भगदाड पडल्याने या कालव्यातून पाणी पुरवठा बंद झाला आहे. पर्वरीतील जलशुध्दीकरण प्रकल्पाला तिळारीचे पाणी येते. या पाण्यावर अवलंबून असलेला पर्वरीतील हा प्रकल्प कालवे फुटल्यावर कोरडा पडतो आणि वरील भागातील लोकांचे प्रचंड हाल होतात.

तिळारीचे पाणी गोव्यासाठी बेभरवशाचे बनले आहे. कालवे बांधून २५ ते ३० वर्षे उलटली आहेत. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ते वरचेवर फुटत असतात. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये देखभाल दुरुस्तीसाठी कालवे बंद असतातच. शिवाय अधूनमधून कालवे फुटतात. गेल्या डिसेंबरमध्ये तिळारीच्या कालव्याचे गेट लॉक झाले. त्यामुळे पुणे येथून खास तंत्रज्ञ मागवावे लागले होते. पाच ते सहा तंत्रज्ञाना गेटचे लॉक उघडण्यासाठी सुमारे २० तास लागले होते. त्यानंतर तिळारीचे पाणी वाटेत कुठेही न वळवता थेट पर्वरी प्रकल्पाला सोडण्यात आले होते.

टंचाई भासणार नाही

जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'पर्वरी येथे जलकुंभात दोन दिवस पुरेल एवढे पाणी आहे. शिवाय पर्यायी व्यवस्था म्हणून आमठाणे येथून १०० एमएलडी पाणी आम्ही अस्नोडा प्रकल्पाला घेत असून, तेथून शुध्दीकरण करून थेट पर्वरीला पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पाण्याची कोणतीही टंचाई भासणार नाही. कालव्याच्या डागडुजीचे काम युध्दपातळीवर सुरू असून, दोन दिवसात पूर्ण होईल. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. मी पुन्हा आज, सोमवारी याचा आढावा घेणार आहे.'

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणी