शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पाण्याची पर्यायी व्यवस्था करणार: जलस्रोतमंत्री, अस्नोडा प्रकल्पात अतिरिक्त जलशुद्धीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2024 09:07 IST

टंचाई भासणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पर्वरी पठारासह साळगाव, कांदोळी, कळंगुट, गिरी व हणजुण आदी भागांना पाणी टंचाईची झळ पोचू नये म्हणून जलस्रोत खात्याने अस्नोडा जलशुध्दीकरण प्रकल्पात अतिरिक्त दहा टक्के जलशुध्दीकरण प्रक्रिया सुरू करून ते पाणी थेट पर्वरीला देण्याची सोय केली आहे. तिळारीच्या कालव्याला शेजारी महाराष्ट्रात कुडासे येथे भगदाड पडल्याने या कालव्यातून पाणी पुरवठा बंद झाला आहे. पर्वरीतील जलशुध्दीकरण प्रकल्पाला तिळारीचे पाणी येते. या पाण्यावर अवलंबून असलेला पर्वरीतील हा प्रकल्प कालवे फुटल्यावर कोरडा पडतो आणि वरील भागातील लोकांचे प्रचंड हाल होतात.

तिळारीचे पाणी गोव्यासाठी बेभरवशाचे बनले आहे. कालवे बांधून २५ ते ३० वर्षे उलटली आहेत. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ते वरचेवर फुटत असतात. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये देखभाल दुरुस्तीसाठी कालवे बंद असतातच. शिवाय अधूनमधून कालवे फुटतात. गेल्या डिसेंबरमध्ये तिळारीच्या कालव्याचे गेट लॉक झाले. त्यामुळे पुणे येथून खास तंत्रज्ञ मागवावे लागले होते. पाच ते सहा तंत्रज्ञाना गेटचे लॉक उघडण्यासाठी सुमारे २० तास लागले होते. त्यानंतर तिळारीचे पाणी वाटेत कुठेही न वळवता थेट पर्वरी प्रकल्पाला सोडण्यात आले होते.

टंचाई भासणार नाही

जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'पर्वरी येथे जलकुंभात दोन दिवस पुरेल एवढे पाणी आहे. शिवाय पर्यायी व्यवस्था म्हणून आमठाणे येथून १०० एमएलडी पाणी आम्ही अस्नोडा प्रकल्पाला घेत असून, तेथून शुध्दीकरण करून थेट पर्वरीला पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पाण्याची कोणतीही टंचाई भासणार नाही. कालव्याच्या डागडुजीचे काम युध्दपातळीवर सुरू असून, दोन दिवसात पूर्ण होईल. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. मी पुन्हा आज, सोमवारी याचा आढावा घेणार आहे.'

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणी