शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

एसटी समाज आरक्षणासाठी केंद्राला साकडे: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 16:23 IST

प्रश्न चार मतदारसंघांचा : सर्वपक्षीय शिष्टमंडळ शाहांना भेटणार

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गावडा, कुणबी, वेळीप आदी अनुसूचित जमातींना विधानसभेत राजकीय आरक्षण (राखीवता) मिळावी या मागणीसाठी लवकरच आमदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय कायदामंत्राच्या भेटीसाठी दिल्लीला नेले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली. त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत राखीवता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एसटी समाजाला विधानसभेत राखीव जागा मिळायला हव्यात, अशी मागणी करणारा आमदार गणेश गावकर यांचा खाजगी ठराव सभागृहात एकमताने संमत करण्यात आला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई व इतर पाचही विरोधी आमदारांनी या ठरावाला पाठिंबा दिला त्यामुळे तो एकमताने संमत झाला.

त्याआधी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी राखीवता न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा एसटी समाजाने जो इशारा दिलेला आहे, त्याकडे सरकारचे लक्ष वेधले. सरकारने ही गोष्ट गंभीरपणे घ्यावी व एसटी समाजाच्या लोकांना न्याय द्यावा. केंद्रातही भाजप सरकार असल्याने शिष्टमंडळ दिल्लीला नेल्यास हा प्रश्न सहजपणे सुटू शकेल असे ते म्हणाले.

विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी या ठरावाला पाठिंबा देताना अशी सूचना केली की, केवळ ठराव घेऊन भागणार नाही तर केंद्रात भाजप सरकार असल्याने राज्य सरकारने तेथे पाठपुरावा करावा.' काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा यांनीही समर्थन दिले. ते म्हणाले की, 'एसटी समाज हा मूळ गोवेकर आहे आणि अजूनही उपेक्षित राहिलेला आहे. त्यांना न्याय मिळायला हवा.'

आम आदमी पक्षाचे आमदार वेंझी व्हिएश व क्रुझ सिल्वा यांनीही विधानसभेत एसटींना राखीवता मिळायला हवी, अशी मागणी केली. कुठ्ठाळीचे अपक्ष आमदार आंतोन वास म्हणाले की, एसटी दर्जा मिळून वीस वर्षे उलटले तरी अजून विधानसभेत राखीवता नाही, हे योग्य नव्हे. केंद्र सरकारला अनेक निवेदने दिलेली आहेत. राज्य सरकारने या गोष्टीचा आता पाठपुरावा करावा.'

रिव्होल्यूशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर यांनी अद्याप अनुसूचित जमातींचे वास्तव्य असलेले विभाग अधिसूचित झालेले नाहीत, याकडे लक्ष वेधले. त्यावर तो स्वतंत्र विषय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ठराव मांडताना आमदार गणेश गावकर म्हणाले की, 'गोव्यातील हा समाज अजून मुख्य प्रवाहात आलेला नाही. १०.२३ टक्के लोकसंख्येप्रमाणे विधानसभेत जागा राखीव मिळायला हव्यात. सरकारने पुनर्रचना आयोग नेमण्यासाठी २४ मे रोजी केंद्राला पत्र पाठवले आहे, त्याचा पाठपुरावा करावा. '

केंद्राला पत्र लिहिले

मुख्यमंत्री म्हणाले की, राखीवतेआधी पुनर्रचना आयोग स्थापन करावा लागेल. त्यासाठी केंद्राला पत्र लिहिले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात एसटी समाजाची लोकसंख्या १ लाख ४९१ हजार एवढी आहे. हे प्रमाण २७५ ६०.२३ टक्के आहे. चार राखीव द्याव्या लागतील. २४ मे रोजी केंद्राला पत्र लिहून पुनर्रचना आयोग स्थापनेची विनंती केली आहे. विरोधकांनी लोकांना भडकावू नये' असे ते म्हणाले.

२००३ साली इतर राज्यांमध्ये ज्या समाजांना एसटीचा दर्जा मिळाला त्यांना तेथे राजकीय राखीवता मिळालेली आहे. जम्मू- काश्मीरमध्ये अलीकडेच पुनर्रचना आयोग नेमून तेथेही एसटीना राजकीय राखीवता देण्याचे सोपस्कार चालू आहेत. राज्य सरकारने ताबडतोब केंद्रीय गृहमंत्र्यांकडे शिष्टमंडळ नेऊन हा प्रश्न धसास लावावा. -रमेश तवडकर, सभापती

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाmonsoonमोसमी पाऊस