शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

कृषी योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च, तरीही भात उत्पादन घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 13:26 IST

राज्याचे कृषी धोरण योग्य दिशेने पुढे जात आहे का, याबाबत शंका उपस्थित होत आहे.

पणजी : भात आणि मासळीची आमटी ही अन्न संस्कृती असलेल्या गोव्यात भाताचे उत्पन्न मात्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. कृषी योजनांवर राज्य सरकार कोट्यवधी रूपये खर्च करूनही भातशेतीच्या बाबतीत ही उदासीन स्थिती आहे. सरकार वेगवेगळ्या कृषी योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असले तरी राज्यात भात उत्पादन मात्र घटत चालले आहे. 

राज्याचे कृषी धोरण योग्य दिशेने पुढे जात आहे का, याबाबत शंका उपस्थित होत आहे. राज्यात भात शेतीचे प्रमाण गेल्या सात वर्षात सुमारे ८ टक्क्यांनी घटले तर भात उत्पादन गेल्या पाच वर्षात २२ टक्क्यांनी घटले आहे.  ही घसरण चिंताजनक मानली जात आहे. काजू, आंबे, नारळ यांचे उत्पादन मात्र वाढल्याचे चित्र दिसते. गोवा आणि केंद्र सरकार तब्बल ७३ योजना कृषी क्षेत्रासाठी कार्यरत आहेत. शेतक-यांना भात बियाणी सबसिडीवर दिली जातात. कृषी खात्याचे संचालक माधव केळकर म्हणाले की, भात उत्पादन घटण्यास वेग वेगळी कारणे आहेत. मुख्य कारण म्हणजे वाढते शहरीकरण, गोव्यातील तिसवाडी बारदेस, सासष्टी या तालुक्यांचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे. खाजन शेतजमिनी नष्ट झाललल्या आहेत. शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. मिळाले तरी ते भरमसाट मजुरी घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मजूर घेणे परवडत नाही. केळकर पुढे म्हणाले की, भात लागवडीखालील क्षेत्र एकदम घटलेले आहे, असे म्हणता येणार नाही. हा परिणाम गेल्या तीस ते चाळीस वर्षांचा आहे. गेल्यावर्षी साधारणपणे ३५ हजार हेक्टरमध्ये जर खरिपाची लागवड झाली असेल तर यावर्षी ते किंचित घटले असेल, लक्षणीय घटले असे म्हणता येणार नाही.

दरम्यान, खरीप मोसमासाठी यंदा राज्यात २५० टन भातबियाणी वितरित करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘जया, ज्योती या पारंपरिक भात बियाण्यांबरोबरच महाराष्ट्राचे ‘कर्जत-३’ आदी बियाणी सबसिडीवर वितरित केलेली आहेत. जीआरएस-१ हे सुमारे १३ टन नवीन बियाणे शेतकºयांना मोफत दिलेले आहे. या बियाण्याची खासियत म्हणजे ते खाजन जमिनी पुनरुज्जीवित करण्यास फार उपयुक्त ठरलेले आहे. खाजन जमिनींमधील शेतीसाठीच ते वापरता येईल. याशिवाय दोन प्रकारची इंडो अमेरिकन संकरित बियाणीही वितरित करण्यात आलेली आहेत. खरीप मोसमात राज्यभरात सुमारे ३१ हजार हेक्टर जमिनीत भाताची लागवड होते. लागवड क्षेत्र वाढविण्याचे लक्ष्य असून त्यासाठी वेगवेगळे उपक्रमही हाती घेतले जात आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीgoaगोवा