शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

कृषी योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च, तरीही भात उत्पादन घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 13:26 IST

राज्याचे कृषी धोरण योग्य दिशेने पुढे जात आहे का, याबाबत शंका उपस्थित होत आहे.

पणजी : भात आणि मासळीची आमटी ही अन्न संस्कृती असलेल्या गोव्यात भाताचे उत्पन्न मात्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. कृषी योजनांवर राज्य सरकार कोट्यवधी रूपये खर्च करूनही भातशेतीच्या बाबतीत ही उदासीन स्थिती आहे. सरकार वेगवेगळ्या कृषी योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असले तरी राज्यात भात उत्पादन मात्र घटत चालले आहे. 

राज्याचे कृषी धोरण योग्य दिशेने पुढे जात आहे का, याबाबत शंका उपस्थित होत आहे. राज्यात भात शेतीचे प्रमाण गेल्या सात वर्षात सुमारे ८ टक्क्यांनी घटले तर भात उत्पादन गेल्या पाच वर्षात २२ टक्क्यांनी घटले आहे.  ही घसरण चिंताजनक मानली जात आहे. काजू, आंबे, नारळ यांचे उत्पादन मात्र वाढल्याचे चित्र दिसते. गोवा आणि केंद्र सरकार तब्बल ७३ योजना कृषी क्षेत्रासाठी कार्यरत आहेत. शेतक-यांना भात बियाणी सबसिडीवर दिली जातात. कृषी खात्याचे संचालक माधव केळकर म्हणाले की, भात उत्पादन घटण्यास वेग वेगळी कारणे आहेत. मुख्य कारण म्हणजे वाढते शहरीकरण, गोव्यातील तिसवाडी बारदेस, सासष्टी या तालुक्यांचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे. खाजन शेतजमिनी नष्ट झाललल्या आहेत. शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. मिळाले तरी ते भरमसाट मजुरी घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मजूर घेणे परवडत नाही. केळकर पुढे म्हणाले की, भात लागवडीखालील क्षेत्र एकदम घटलेले आहे, असे म्हणता येणार नाही. हा परिणाम गेल्या तीस ते चाळीस वर्षांचा आहे. गेल्यावर्षी साधारणपणे ३५ हजार हेक्टरमध्ये जर खरिपाची लागवड झाली असेल तर यावर्षी ते किंचित घटले असेल, लक्षणीय घटले असे म्हणता येणार नाही.

दरम्यान, खरीप मोसमासाठी यंदा राज्यात २५० टन भातबियाणी वितरित करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘जया, ज्योती या पारंपरिक भात बियाण्यांबरोबरच महाराष्ट्राचे ‘कर्जत-३’ आदी बियाणी सबसिडीवर वितरित केलेली आहेत. जीआरएस-१ हे सुमारे १३ टन नवीन बियाणे शेतकºयांना मोफत दिलेले आहे. या बियाण्याची खासियत म्हणजे ते खाजन जमिनी पुनरुज्जीवित करण्यास फार उपयुक्त ठरलेले आहे. खाजन जमिनींमधील शेतीसाठीच ते वापरता येईल. याशिवाय दोन प्रकारची इंडो अमेरिकन संकरित बियाणीही वितरित करण्यात आलेली आहेत. खरीप मोसमात राज्यभरात सुमारे ३१ हजार हेक्टर जमिनीत भाताची लागवड होते. लागवड क्षेत्र वाढविण्याचे लक्ष्य असून त्यासाठी वेगवेगळे उपक्रमही हाती घेतले जात आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीgoaगोवा