शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

प्रवेशासाठी धावपळ सुरूच

By admin | Updated: June 11, 2014 01:18 IST

पणजी : राज्यातील उच्च माध्यमिकमध्ये अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. चांगल्या निकालाची परंपरा असणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयांत प्रवेशासाठी विद्यार्थी प्रयत्नरत आहेत.

पणजी : राज्यातील उच्च माध्यमिकमध्ये अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. चांगल्या निकालाची परंपरा असणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयांत प्रवेशासाठी विद्यार्थी प्रयत्नरत आहेत. तसेच इच्छुक शाखेतील अपुऱ्या जागांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. यामुळे राजधानीतही काही ठरावीक विद्यालयांत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यालये सुरू झाली तरी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. राज्यात शाखानिहाय ठरावीक उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. तेथील शाखांच्या जागा मर्यादित असतात. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाही. त्यासाठी ८0-८५ टक्क्यांच्या वर गुण मिळणे आवश्यक बनले आहे. काही उच्च माध्यमिक विद्यालयांत तर ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येतो. नाव उघड न करण्याच्या अटीवर एका प्राचार्याने सांगितले, हल्ली शिक्षणाबाबत पालक आणि मुलांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ज्या शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर सहजतेने पुढील शिक्षण घेऊन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील अशा शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो. शहरातील काही प्रमुख खासगी हायर सेकंडरींचा निकाल शंभर टक्के लागला की त्याच विद्यालयात प्रवेश मिळविण्याची खटपट सुरूहोते. अनेक सरकारी हायर सेकंडरीत विविध शाखांत जागा शिल्लक असतात; पण विद्यार्थ्यांचा कल ठरावीक हायर सेकंडरीकडे असतो. विद्यार्थी व पालकांची ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. तसेच सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातून शिक्षण घेऊनही चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात याबाबत विश्वास निर्माण होण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच प्रवेशादरम्यान होणारा गोंधळ आणि विद्यार्थ्यांवरील मानसिक तणाव कमी होऊ शकतो. (प्रतिनिधी)