शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

गोव्यातील दहा-बारा नद्यांमधील गाळ उपसणार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 12:51 IST

गोव्यातील दहा ते बारा नद्यांमधील गाळ उपसण्याची गरज आहे. सरकार हे काम करून घेईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देगोव्यातील दहा ते बारा नद्यांमधील गाळ उपसण्याची गरज आहे - डॉ. प्रमोद सावंत सरकार नद्या उपसण्याचे काम विविध खात्यांकडून करून घेईल. सरकार कधीच म्हादई नदीबाबत तडजोड करणार नाही.

पणजी - गोव्यातील दहा ते बारा नद्यांमधील गाळ उपसण्याची गरज आहे. सरकार हे काम करून घेईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी (25 सप्टेंबर) सांगितले आहे. कलाकृती आयोजित गोवा पर्यावरण महोत्सवाला पर्वरी येथे आरंभ झाला आहे. महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलले. राज्यातील नद्या उपसल्या जातील. काहीजण नद्या उपसण्याच्या कामात अडथळे आणतात. काही एनजीओही आक्षेप घेतात. मात्र सरकार नद्या उपसण्याचे काम विविध खात्यांकडून करून घेईल. एनजीओंना त्याचे महत्त्व कळायला हवे.

मुख्यमंत्री म्हणाले, की नद्या जर आता उपसल्या नाहीत तर ते काम कधीच होणार नाही. आमच्या अनेक नद्या बुजत चालल्या आहेत. नद्या वाचविणो, पाणी वाचविणे याविषयी जागृती होण्याची गरज आहे. मी जलसंसाधन खाते व बंदर कप्तान खात्याशी बोललो आहे व त्यांना नद्या उपसण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. थोडा वेळ लागेल पण काम सुरू होईल.

पर्यावरण महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की पूर्वी तीन दिवस होणारा पर्यावरण महोत्सव आता एका दिवसापूरता मर्यादित करावा लागला हे ऐकून मला वाईट वाटले. समाजासाठी काम करणारे अनेक लोक असतात. कोणतेही सामाजिक काम जर अडत असेल तर माझ्याशी संपर्क साधा. मी निश्चितच मदत करीन. कारण समाजाचे काम करणारे एक प्रकारे सरकारला मदत करत असतात. पर्यावरण महोत्सवासारख्या सोहळ्यांची नितांत गरज आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, की विद्यार्थ्यांना पर्यावरण हितरणक्षणाची सवय लावायला हवी. आपण सगळेजण मानवी चुकांचे परिणाम भोगत आहोत. प्लास्टीकपासून ई-कचऱ्यापर्यंतची समस्या ही मानवनिर्मित आहे. प्लास्टीक पिशव्यांचा वापर टाळायलाच हवा. आम्ही पर्यावरणावर प्लास्टीक थोपले. त्याचे परिणाम सगळीकडे दिसून येत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी म्हादई नदीचाही उल्लेख केला. सरकार कधीच म्हादई नदीबाबत तडजोड करणार नाही. छोट्या छोट्या नद्या काहीजण बुजविण्याचा प्रयत्न करतात. या नद्या वाचवायला हव्यात. म्हापसा शहरातही मोठी नदी आहे. तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतriverनदी