शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

गोव्यातील दहा-बारा नद्यांमधील गाळ उपसणार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 12:51 IST

गोव्यातील दहा ते बारा नद्यांमधील गाळ उपसण्याची गरज आहे. सरकार हे काम करून घेईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देगोव्यातील दहा ते बारा नद्यांमधील गाळ उपसण्याची गरज आहे - डॉ. प्रमोद सावंत सरकार नद्या उपसण्याचे काम विविध खात्यांकडून करून घेईल. सरकार कधीच म्हादई नदीबाबत तडजोड करणार नाही.

पणजी - गोव्यातील दहा ते बारा नद्यांमधील गाळ उपसण्याची गरज आहे. सरकार हे काम करून घेईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी (25 सप्टेंबर) सांगितले आहे. कलाकृती आयोजित गोवा पर्यावरण महोत्सवाला पर्वरी येथे आरंभ झाला आहे. महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलले. राज्यातील नद्या उपसल्या जातील. काहीजण नद्या उपसण्याच्या कामात अडथळे आणतात. काही एनजीओही आक्षेप घेतात. मात्र सरकार नद्या उपसण्याचे काम विविध खात्यांकडून करून घेईल. एनजीओंना त्याचे महत्त्व कळायला हवे.

मुख्यमंत्री म्हणाले, की नद्या जर आता उपसल्या नाहीत तर ते काम कधीच होणार नाही. आमच्या अनेक नद्या बुजत चालल्या आहेत. नद्या वाचविणो, पाणी वाचविणे याविषयी जागृती होण्याची गरज आहे. मी जलसंसाधन खाते व बंदर कप्तान खात्याशी बोललो आहे व त्यांना नद्या उपसण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. थोडा वेळ लागेल पण काम सुरू होईल.

पर्यावरण महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की पूर्वी तीन दिवस होणारा पर्यावरण महोत्सव आता एका दिवसापूरता मर्यादित करावा लागला हे ऐकून मला वाईट वाटले. समाजासाठी काम करणारे अनेक लोक असतात. कोणतेही सामाजिक काम जर अडत असेल तर माझ्याशी संपर्क साधा. मी निश्चितच मदत करीन. कारण समाजाचे काम करणारे एक प्रकारे सरकारला मदत करत असतात. पर्यावरण महोत्सवासारख्या सोहळ्यांची नितांत गरज आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, की विद्यार्थ्यांना पर्यावरण हितरणक्षणाची सवय लावायला हवी. आपण सगळेजण मानवी चुकांचे परिणाम भोगत आहोत. प्लास्टीकपासून ई-कचऱ्यापर्यंतची समस्या ही मानवनिर्मित आहे. प्लास्टीक पिशव्यांचा वापर टाळायलाच हवा. आम्ही पर्यावरणावर प्लास्टीक थोपले. त्याचे परिणाम सगळीकडे दिसून येत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी म्हादई नदीचाही उल्लेख केला. सरकार कधीच म्हादई नदीबाबत तडजोड करणार नाही. छोट्या छोट्या नद्या काहीजण बुजविण्याचा प्रयत्न करतात. या नद्या वाचवायला हव्यात. म्हापसा शहरातही मोठी नदी आहे. तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतriverनदी