शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

नद्यांच्या राष्ट्रीयीकरणावर अभिभाषणात मौन, काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 20:47 IST

नद्यांचे राष्ट्रीयीकरण आणि प्रादेशिक आराखड्याच्या मुद्द्यावर राज्यपालांच्या अभिभाषणात काहीच उल्लेख नसल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक टीका केली आहे.

पणजी- नद्यांचे राष्ट्रीयीकरण आणि प्रादेशिक आराखड्याच्या मुद्द्यावर राज्यपालांच्या अभिभाषणात काहीच उल्लेख नसल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक टीका केली आहे. लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर सरकारकडून मौन राखले जात आहे हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.राज्यपालांच्या अभिभाषणात स्पष्टता दिसून येत नाही. काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्यच केलेले नाही, तर काही मुद्द्यांचा अगदी ओझरता उल्लेख करून विषय टाळला गेला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाल्याचेही त्यांनी सांगितले.नाईक म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणात सध्या ऐरणीवर आलेल्या ज्वलंत समस्यांच्या बाबतीत उल्लेख असेल, अशी अपेक्षा होती. परंतु जे जे महत्त्वाचे विषय होते त्यावर मौन राखले गेले. राज्यात प्रादेशिक आराखड्याचा मुद्दा हा सध्या गाजतो आहे. तसेच नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला लोकांचा विरोध आहे. कोळसा हाताळणी व त्यामुळे होणारे प्रदूषण याबाबत मुरगावात अजूनही वातावरण भीतीचे आहे. या मुद्द्यांचा उल्लेख झालेला नाही.मुख्यमंत्री आरोग्याच्या कारणामुळे विधानसभेत हजर राहू शकत नसल्यामुळे एकूण कामकाजाचे दिवस मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आले आहेत. केवळ ४ दिवसांचेच अधिवेशन ठरणार आहे. परंतु हे कमी करण्यात आलेले दिवस विधिमंडळपटूंना देण्यात यावेत. आता शक्य नसले तरी नंतरच्या अधिवेशनाचे दिवस वाढवून ते भरून काढण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजाराविषयी बोलताना नाईक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योग्य उपचार घेऊन लवकर बरे होवोत. तसेच उपचारांसाठी त्यांना विदेशात जरी नेण्याची गरज असेल तरी त्यांना नेण्यात यावे असे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेस