शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांच्या राष्ट्रीयीकरणावर अभिभाषणात मौन, काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 20:47 IST

नद्यांचे राष्ट्रीयीकरण आणि प्रादेशिक आराखड्याच्या मुद्द्यावर राज्यपालांच्या अभिभाषणात काहीच उल्लेख नसल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक टीका केली आहे.

पणजी- नद्यांचे राष्ट्रीयीकरण आणि प्रादेशिक आराखड्याच्या मुद्द्यावर राज्यपालांच्या अभिभाषणात काहीच उल्लेख नसल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक टीका केली आहे. लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर सरकारकडून मौन राखले जात आहे हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.राज्यपालांच्या अभिभाषणात स्पष्टता दिसून येत नाही. काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्यच केलेले नाही, तर काही मुद्द्यांचा अगदी ओझरता उल्लेख करून विषय टाळला गेला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाल्याचेही त्यांनी सांगितले.नाईक म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणात सध्या ऐरणीवर आलेल्या ज्वलंत समस्यांच्या बाबतीत उल्लेख असेल, अशी अपेक्षा होती. परंतु जे जे महत्त्वाचे विषय होते त्यावर मौन राखले गेले. राज्यात प्रादेशिक आराखड्याचा मुद्दा हा सध्या गाजतो आहे. तसेच नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला लोकांचा विरोध आहे. कोळसा हाताळणी व त्यामुळे होणारे प्रदूषण याबाबत मुरगावात अजूनही वातावरण भीतीचे आहे. या मुद्द्यांचा उल्लेख झालेला नाही.मुख्यमंत्री आरोग्याच्या कारणामुळे विधानसभेत हजर राहू शकत नसल्यामुळे एकूण कामकाजाचे दिवस मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आले आहेत. केवळ ४ दिवसांचेच अधिवेशन ठरणार आहे. परंतु हे कमी करण्यात आलेले दिवस विधिमंडळपटूंना देण्यात यावेत. आता शक्य नसले तरी नंतरच्या अधिवेशनाचे दिवस वाढवून ते भरून काढण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजाराविषयी बोलताना नाईक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योग्य उपचार घेऊन लवकर बरे होवोत. तसेच उपचारांसाठी त्यांना विदेशात जरी नेण्याची गरज असेल तरी त्यांना नेण्यात यावे असे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेस