शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सिद्धरामय्या-पंतप्रधान भेट गोव्यासाठी धोक्याची घंटा: आरजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 13:27 IST

काँग्रेस, भाजपकडून गोमंतकीयांचा विश्वासघात.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कळसा, भांडुरा प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी सर्व प्रकारचे साहाय्य करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी, तसेच आपल्या राजकीय स्वार्थासाठी हातमिळवणी करण्यासाठी गेले होते. काँग्रेस आणि भाजप हे पक्ष गोव्यातील जनतेचा विश्वासघात करीत आले आहेत. आता कळसा, भांडुरा प्रकल्पासाठी सिद्धरामय्या मोदी भेट ही गोवेकरांच्या सर्वनाशासाठीच असल्याची टीका आरजी पक्षाने पत्रकार परिषदेत केली. 

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजपने आपण म्हादई नदीचे पाणी कर्नाटकात वळवू देणार नसल्याचे सांगत मोठा गाजावाजा केला होता. त्यांनी सुरू केलेल्या म्हादई बचाव आंदोलनाला आरजी पक्षाने पाठिंबा न दिल्यामुळे बिनबुडाचे आरोप लावण्यात आले. आज कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे म्हादई पाण्यासाठी धाव घेतली आहे.

आज राज्यात मोठे संकट उभे राहिलेले असताना राज्यातील काँग्रेस सरकार गप्प आहे. आमदार युरी आलेमाव हे कर्नाटकमधील काँग्रेस पक्षाला जाब विचारण्याऐवजी भाजपला ट्रिटद्वारे प्रश्न विचारतात, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

जनतेची केली जातेय दिशाभूल : परब

मनोज परब म्हणाले, दोन्ही पक्ष म्हादईविषयी गंभीर नसून फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी गोव्यातील जनतेची दिशाभूल तसेच त्यांच्या भावनेशी खेळ खेळत आले आहेत. आम्ही म्हादई वाचविण्यासाठी हर एक प्रयल करू. आमचा आमदार येणाऱ्या अधिवेशनातसुद्धा हा विषय उचलून धरणार आहे. आज गोव्यातील तमाम जनतेने विचार करण्याची गरज आहे. गोवा आणि गोवेकरांचा विषय फक्त रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षच उचलून धरत आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गोवेकरांनी आरजी पक्षाला कॉल दिल्यास गोवा गोवेकरांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचणार आणि आमचे अस्तित्व कुठे तरी राखले गेले जाणार असल्याचे परब म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण