शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

श्रीरामाचं महिमागान आणि गोव्यातही परमानंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2024 10:25 IST

येत्या तीन वर्षांत १५,००० हून अधिक लोकांना अयोध्येला पाठवून अयोध्या आणि राममंदिराशी गोव्याच्या भावनिक जोडणीचे हे एक महत्त्वाचे प्रतीक ठरेल.

- विश्वजीत राणे

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर हे केवळ मंदिर नाही, तर जगभरातील अब्जावधी भारतीयांसाठी श्रद्धा, एकता आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. मंदिराचे बांधकाम ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. त्याच्या अभिषेकाने लोकांना एकत्र आणून एकता घट्ट केली आहे. आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले आहे. गोवावासीयांसाठी, हे सत्य, न्याय आणि धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक आहे.

प्रत्येक समाजात अभिमानाचा, गौरवाचा आणि कृतज्ञतेचा क्षण त्या वेळी उजाडतो जेव्हा लोकांची सर्वात महत्त्वाची इच्छा साकार होते. अयोध्येतील भव्य रामजन्मभूमी मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा जगभरातील हिंदू समुदायासाठी अविस्मरणीय क्षण आहे. हे मंदिर हिंदूच्या चिरस्थायी भावनेचे आणि प्रभू रामावरील अतूट श्रध्दा, भक्तीची साक्ष आहे. मंदिराचे बांधकाम भारतातील विविध लोकांना बांधून ठेवणारे सांस्कृतिक बंधन दर्शवते.

अयोध्येचं राम मंदिर हे भारतातील सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. मंदिराचे बांधकाम हा शांतताप्रिय आणि धर्माभिमानी हिंदू समुदायाचा प्रतीकात्मक विजय आहे, जे अनेक दशकांपासून ही रचना जिवंत होण्याच्या प्रतीक्षेत होते. एक पवित्र कर्तव्य आणि अविस्मरणीय तीर्थक्षेत्र म्हणून आयुष्यात एकदा तरी या विशेष स्थानाला भेट देणे भाविक आपले सांस्कृतिक कर्तव्य मानतात. जगभरातील शांतताप्रिय हिंदू समुदायासाठी, अयोध्या हे सर्वात महत्त्वाचे धार्मिक केंद्र म्हणून उदयास येणार आहे. अयोध्या शहर शरयू नदीच्या काठावरुन आणि पलीकडे सुशोभित झाल्यामुळे, विकासाच्या प्रक्रियेत अविश्वसनीय वाढ होते. हे मंदिर संपूर्ण भारत आणि जगभरातून लाखो भाविकांना आकर्षित करते.

अयोध्या हे प्रभू रामाचे जन्मस्थान म्हणून जगभरातील कोट्यवधी हिंदूच्या भक्तीचे केंद्र बनून राहिले आहे. ही जागा अविकसित असताना आणि वादाच्या केंद्रस्थानी असतानाही लोक या पवित्र ठिकाणी पूजेसाठी गर्दी करत होते. लोकांची इच्छा आणि आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे मंदिर उभारणीच्या संकल्पनेला अंतिम रूप देण्यात आले. भव्य मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे. गोव्यातील लोकांसाठी, हा एक बहुप्रतीक्षित क्षण आहे. संपूर्ण भारत आणि खरंच जगभरातील लोक शब्दांच्या पलीकडे आनंदित आहेत. आनंद आणि कृतज्ञतेची अभिव्यक्ती मात्र अविश्वसनीय आहे.

गोव्यापासून उत्तर प्रदेशातील अयोध्येपर्यंतचे अंतर महत्त्वाचे नाही. यापूर्वीही मंदिर उभारणीच्या चळवळीत राज्यातील लोकांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी या पवित्र संरचनेला आकार घेता यावा यासाठी मानवी संसाधनांपासून भौतिक संसाधनांपर्यंत सर्व शक्य मार्गानी योगदान दिले. आणि आता, अभिषेक झाल्यापासून पुढील तीन वर्षांपर्यंत, १५,००० हून अधिक लोकांना अयोध्येला पाठवण्याची योजना आहे. अयोध्या आणि राममंदिराशी गोव्याच्या भावनिक जोडणीचे हे एक लहान पण महत्त्वाचे प्रतीक आहे.

देशातील प्रत्येक व्यक्ती प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्ताचा साक्षीदार असेल, अयोध्येतील प्रभू रामाचे त्यांच्या घरी स्वागत करेल. भारतातील आणि जगातील इतरत्र लोकांसाठी हे शक्य करून दाखविण्याचे श्रेय माननीय पंतप्रधानांना दिले पाहिजे, प्रत्येक जण प्राणप्रतिष्ठेची वाट पाहत असताना, जगभरात भक्ती आणि श्रद्धेची लाट निर्माण झाली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. भक्तांना परमात्म्याशी जोडणाऱ्या या ऐतिहासिक प्रसंगी गोव्यातील जनतेच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो.

(लेखक गोवा सरकारमधील आरोग्य, शहरी विकास, महिला व बालकल्याण आणि वन मंत्री आहेत.)

टॅग्स :goaगोवा