शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

श्रीरामाचं महिमागान आणि गोव्यातही परमानंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2024 10:25 IST

येत्या तीन वर्षांत १५,००० हून अधिक लोकांना अयोध्येला पाठवून अयोध्या आणि राममंदिराशी गोव्याच्या भावनिक जोडणीचे हे एक महत्त्वाचे प्रतीक ठरेल.

- विश्वजीत राणे

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर हे केवळ मंदिर नाही, तर जगभरातील अब्जावधी भारतीयांसाठी श्रद्धा, एकता आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. मंदिराचे बांधकाम ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. त्याच्या अभिषेकाने लोकांना एकत्र आणून एकता घट्ट केली आहे. आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले आहे. गोवावासीयांसाठी, हे सत्य, न्याय आणि धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक आहे.

प्रत्येक समाजात अभिमानाचा, गौरवाचा आणि कृतज्ञतेचा क्षण त्या वेळी उजाडतो जेव्हा लोकांची सर्वात महत्त्वाची इच्छा साकार होते. अयोध्येतील भव्य रामजन्मभूमी मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा जगभरातील हिंदू समुदायासाठी अविस्मरणीय क्षण आहे. हे मंदिर हिंदूच्या चिरस्थायी भावनेचे आणि प्रभू रामावरील अतूट श्रध्दा, भक्तीची साक्ष आहे. मंदिराचे बांधकाम भारतातील विविध लोकांना बांधून ठेवणारे सांस्कृतिक बंधन दर्शवते.

अयोध्येचं राम मंदिर हे भारतातील सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. मंदिराचे बांधकाम हा शांतताप्रिय आणि धर्माभिमानी हिंदू समुदायाचा प्रतीकात्मक विजय आहे, जे अनेक दशकांपासून ही रचना जिवंत होण्याच्या प्रतीक्षेत होते. एक पवित्र कर्तव्य आणि अविस्मरणीय तीर्थक्षेत्र म्हणून आयुष्यात एकदा तरी या विशेष स्थानाला भेट देणे भाविक आपले सांस्कृतिक कर्तव्य मानतात. जगभरातील शांतताप्रिय हिंदू समुदायासाठी, अयोध्या हे सर्वात महत्त्वाचे धार्मिक केंद्र म्हणून उदयास येणार आहे. अयोध्या शहर शरयू नदीच्या काठावरुन आणि पलीकडे सुशोभित झाल्यामुळे, विकासाच्या प्रक्रियेत अविश्वसनीय वाढ होते. हे मंदिर संपूर्ण भारत आणि जगभरातून लाखो भाविकांना आकर्षित करते.

अयोध्या हे प्रभू रामाचे जन्मस्थान म्हणून जगभरातील कोट्यवधी हिंदूच्या भक्तीचे केंद्र बनून राहिले आहे. ही जागा अविकसित असताना आणि वादाच्या केंद्रस्थानी असतानाही लोक या पवित्र ठिकाणी पूजेसाठी गर्दी करत होते. लोकांची इच्छा आणि आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे मंदिर उभारणीच्या संकल्पनेला अंतिम रूप देण्यात आले. भव्य मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे. गोव्यातील लोकांसाठी, हा एक बहुप्रतीक्षित क्षण आहे. संपूर्ण भारत आणि खरंच जगभरातील लोक शब्दांच्या पलीकडे आनंदित आहेत. आनंद आणि कृतज्ञतेची अभिव्यक्ती मात्र अविश्वसनीय आहे.

गोव्यापासून उत्तर प्रदेशातील अयोध्येपर्यंतचे अंतर महत्त्वाचे नाही. यापूर्वीही मंदिर उभारणीच्या चळवळीत राज्यातील लोकांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी या पवित्र संरचनेला आकार घेता यावा यासाठी मानवी संसाधनांपासून भौतिक संसाधनांपर्यंत सर्व शक्य मार्गानी योगदान दिले. आणि आता, अभिषेक झाल्यापासून पुढील तीन वर्षांपर्यंत, १५,००० हून अधिक लोकांना अयोध्येला पाठवण्याची योजना आहे. अयोध्या आणि राममंदिराशी गोव्याच्या भावनिक जोडणीचे हे एक लहान पण महत्त्वाचे प्रतीक आहे.

देशातील प्रत्येक व्यक्ती प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्ताचा साक्षीदार असेल, अयोध्येतील प्रभू रामाचे त्यांच्या घरी स्वागत करेल. भारतातील आणि जगातील इतरत्र लोकांसाठी हे शक्य करून दाखविण्याचे श्रेय माननीय पंतप्रधानांना दिले पाहिजे, प्रत्येक जण प्राणप्रतिष्ठेची वाट पाहत असताना, जगभरात भक्ती आणि श्रद्धेची लाट निर्माण झाली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. भक्तांना परमात्म्याशी जोडणाऱ्या या ऐतिहासिक प्रसंगी गोव्यातील जनतेच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो.

(लेखक गोवा सरकारमधील आरोग्य, शहरी विकास, महिला व बालकल्याण आणि वन मंत्री आहेत.)

टॅग्स :goaगोवा