शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामाचं महिमागान आणि गोव्यातही परमानंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2024 10:25 IST

येत्या तीन वर्षांत १५,००० हून अधिक लोकांना अयोध्येला पाठवून अयोध्या आणि राममंदिराशी गोव्याच्या भावनिक जोडणीचे हे एक महत्त्वाचे प्रतीक ठरेल.

- विश्वजीत राणे

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर हे केवळ मंदिर नाही, तर जगभरातील अब्जावधी भारतीयांसाठी श्रद्धा, एकता आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. मंदिराचे बांधकाम ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. त्याच्या अभिषेकाने लोकांना एकत्र आणून एकता घट्ट केली आहे. आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले आहे. गोवावासीयांसाठी, हे सत्य, न्याय आणि धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक आहे.

प्रत्येक समाजात अभिमानाचा, गौरवाचा आणि कृतज्ञतेचा क्षण त्या वेळी उजाडतो जेव्हा लोकांची सर्वात महत्त्वाची इच्छा साकार होते. अयोध्येतील भव्य रामजन्मभूमी मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा जगभरातील हिंदू समुदायासाठी अविस्मरणीय क्षण आहे. हे मंदिर हिंदूच्या चिरस्थायी भावनेचे आणि प्रभू रामावरील अतूट श्रध्दा, भक्तीची साक्ष आहे. मंदिराचे बांधकाम भारतातील विविध लोकांना बांधून ठेवणारे सांस्कृतिक बंधन दर्शवते.

अयोध्येचं राम मंदिर हे भारतातील सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. मंदिराचे बांधकाम हा शांतताप्रिय आणि धर्माभिमानी हिंदू समुदायाचा प्रतीकात्मक विजय आहे, जे अनेक दशकांपासून ही रचना जिवंत होण्याच्या प्रतीक्षेत होते. एक पवित्र कर्तव्य आणि अविस्मरणीय तीर्थक्षेत्र म्हणून आयुष्यात एकदा तरी या विशेष स्थानाला भेट देणे भाविक आपले सांस्कृतिक कर्तव्य मानतात. जगभरातील शांतताप्रिय हिंदू समुदायासाठी, अयोध्या हे सर्वात महत्त्वाचे धार्मिक केंद्र म्हणून उदयास येणार आहे. अयोध्या शहर शरयू नदीच्या काठावरुन आणि पलीकडे सुशोभित झाल्यामुळे, विकासाच्या प्रक्रियेत अविश्वसनीय वाढ होते. हे मंदिर संपूर्ण भारत आणि जगभरातून लाखो भाविकांना आकर्षित करते.

अयोध्या हे प्रभू रामाचे जन्मस्थान म्हणून जगभरातील कोट्यवधी हिंदूच्या भक्तीचे केंद्र बनून राहिले आहे. ही जागा अविकसित असताना आणि वादाच्या केंद्रस्थानी असतानाही लोक या पवित्र ठिकाणी पूजेसाठी गर्दी करत होते. लोकांची इच्छा आणि आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे मंदिर उभारणीच्या संकल्पनेला अंतिम रूप देण्यात आले. भव्य मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे. गोव्यातील लोकांसाठी, हा एक बहुप्रतीक्षित क्षण आहे. संपूर्ण भारत आणि खरंच जगभरातील लोक शब्दांच्या पलीकडे आनंदित आहेत. आनंद आणि कृतज्ञतेची अभिव्यक्ती मात्र अविश्वसनीय आहे.

गोव्यापासून उत्तर प्रदेशातील अयोध्येपर्यंतचे अंतर महत्त्वाचे नाही. यापूर्वीही मंदिर उभारणीच्या चळवळीत राज्यातील लोकांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी या पवित्र संरचनेला आकार घेता यावा यासाठी मानवी संसाधनांपासून भौतिक संसाधनांपर्यंत सर्व शक्य मार्गानी योगदान दिले. आणि आता, अभिषेक झाल्यापासून पुढील तीन वर्षांपर्यंत, १५,००० हून अधिक लोकांना अयोध्येला पाठवण्याची योजना आहे. अयोध्या आणि राममंदिराशी गोव्याच्या भावनिक जोडणीचे हे एक लहान पण महत्त्वाचे प्रतीक आहे.

देशातील प्रत्येक व्यक्ती प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्ताचा साक्षीदार असेल, अयोध्येतील प्रभू रामाचे त्यांच्या घरी स्वागत करेल. भारतातील आणि जगातील इतरत्र लोकांसाठी हे शक्य करून दाखविण्याचे श्रेय माननीय पंतप्रधानांना दिले पाहिजे, प्रत्येक जण प्राणप्रतिष्ठेची वाट पाहत असताना, जगभरात भक्ती आणि श्रद्धेची लाट निर्माण झाली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. भक्तांना परमात्म्याशी जोडणाऱ्या या ऐतिहासिक प्रसंगी गोव्यातील जनतेच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो.

(लेखक गोवा सरकारमधील आरोग्य, शहरी विकास, महिला व बालकल्याण आणि वन मंत्री आहेत.)

टॅग्स :goaगोवा