शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

श्रीरामाचं महिमागान आणि गोव्यातही परमानंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2024 10:25 IST

येत्या तीन वर्षांत १५,००० हून अधिक लोकांना अयोध्येला पाठवून अयोध्या आणि राममंदिराशी गोव्याच्या भावनिक जोडणीचे हे एक महत्त्वाचे प्रतीक ठरेल.

- विश्वजीत राणे

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर हे केवळ मंदिर नाही, तर जगभरातील अब्जावधी भारतीयांसाठी श्रद्धा, एकता आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. मंदिराचे बांधकाम ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. त्याच्या अभिषेकाने लोकांना एकत्र आणून एकता घट्ट केली आहे. आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले आहे. गोवावासीयांसाठी, हे सत्य, न्याय आणि धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक आहे.

प्रत्येक समाजात अभिमानाचा, गौरवाचा आणि कृतज्ञतेचा क्षण त्या वेळी उजाडतो जेव्हा लोकांची सर्वात महत्त्वाची इच्छा साकार होते. अयोध्येतील भव्य रामजन्मभूमी मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा जगभरातील हिंदू समुदायासाठी अविस्मरणीय क्षण आहे. हे मंदिर हिंदूच्या चिरस्थायी भावनेचे आणि प्रभू रामावरील अतूट श्रध्दा, भक्तीची साक्ष आहे. मंदिराचे बांधकाम भारतातील विविध लोकांना बांधून ठेवणारे सांस्कृतिक बंधन दर्शवते.

अयोध्येचं राम मंदिर हे भारतातील सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. मंदिराचे बांधकाम हा शांतताप्रिय आणि धर्माभिमानी हिंदू समुदायाचा प्रतीकात्मक विजय आहे, जे अनेक दशकांपासून ही रचना जिवंत होण्याच्या प्रतीक्षेत होते. एक पवित्र कर्तव्य आणि अविस्मरणीय तीर्थक्षेत्र म्हणून आयुष्यात एकदा तरी या विशेष स्थानाला भेट देणे भाविक आपले सांस्कृतिक कर्तव्य मानतात. जगभरातील शांतताप्रिय हिंदू समुदायासाठी, अयोध्या हे सर्वात महत्त्वाचे धार्मिक केंद्र म्हणून उदयास येणार आहे. अयोध्या शहर शरयू नदीच्या काठावरुन आणि पलीकडे सुशोभित झाल्यामुळे, विकासाच्या प्रक्रियेत अविश्वसनीय वाढ होते. हे मंदिर संपूर्ण भारत आणि जगभरातून लाखो भाविकांना आकर्षित करते.

अयोध्या हे प्रभू रामाचे जन्मस्थान म्हणून जगभरातील कोट्यवधी हिंदूच्या भक्तीचे केंद्र बनून राहिले आहे. ही जागा अविकसित असताना आणि वादाच्या केंद्रस्थानी असतानाही लोक या पवित्र ठिकाणी पूजेसाठी गर्दी करत होते. लोकांची इच्छा आणि आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे मंदिर उभारणीच्या संकल्पनेला अंतिम रूप देण्यात आले. भव्य मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे. गोव्यातील लोकांसाठी, हा एक बहुप्रतीक्षित क्षण आहे. संपूर्ण भारत आणि खरंच जगभरातील लोक शब्दांच्या पलीकडे आनंदित आहेत. आनंद आणि कृतज्ञतेची अभिव्यक्ती मात्र अविश्वसनीय आहे.

गोव्यापासून उत्तर प्रदेशातील अयोध्येपर्यंतचे अंतर महत्त्वाचे नाही. यापूर्वीही मंदिर उभारणीच्या चळवळीत राज्यातील लोकांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी या पवित्र संरचनेला आकार घेता यावा यासाठी मानवी संसाधनांपासून भौतिक संसाधनांपर्यंत सर्व शक्य मार्गानी योगदान दिले. आणि आता, अभिषेक झाल्यापासून पुढील तीन वर्षांपर्यंत, १५,००० हून अधिक लोकांना अयोध्येला पाठवण्याची योजना आहे. अयोध्या आणि राममंदिराशी गोव्याच्या भावनिक जोडणीचे हे एक लहान पण महत्त्वाचे प्रतीक आहे.

देशातील प्रत्येक व्यक्ती प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्ताचा साक्षीदार असेल, अयोध्येतील प्रभू रामाचे त्यांच्या घरी स्वागत करेल. भारतातील आणि जगातील इतरत्र लोकांसाठी हे शक्य करून दाखविण्याचे श्रेय माननीय पंतप्रधानांना दिले पाहिजे, प्रत्येक जण प्राणप्रतिष्ठेची वाट पाहत असताना, जगभरात भक्ती आणि श्रद्धेची लाट निर्माण झाली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. भक्तांना परमात्म्याशी जोडणाऱ्या या ऐतिहासिक प्रसंगी गोव्यातील जनतेच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो.

(लेखक गोवा सरकारमधील आरोग्य, शहरी विकास, महिला व बालकल्याण आणि वन मंत्री आहेत.)

टॅग्स :goaगोवा