शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

श्रीरामाचं महिमागान आणि गोव्यातही परमानंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2024 10:25 IST

येत्या तीन वर्षांत १५,००० हून अधिक लोकांना अयोध्येला पाठवून अयोध्या आणि राममंदिराशी गोव्याच्या भावनिक जोडणीचे हे एक महत्त्वाचे प्रतीक ठरेल.

- विश्वजीत राणे

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर हे केवळ मंदिर नाही, तर जगभरातील अब्जावधी भारतीयांसाठी श्रद्धा, एकता आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. मंदिराचे बांधकाम ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. त्याच्या अभिषेकाने लोकांना एकत्र आणून एकता घट्ट केली आहे. आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले आहे. गोवावासीयांसाठी, हे सत्य, न्याय आणि धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक आहे.

प्रत्येक समाजात अभिमानाचा, गौरवाचा आणि कृतज्ञतेचा क्षण त्या वेळी उजाडतो जेव्हा लोकांची सर्वात महत्त्वाची इच्छा साकार होते. अयोध्येतील भव्य रामजन्मभूमी मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा जगभरातील हिंदू समुदायासाठी अविस्मरणीय क्षण आहे. हे मंदिर हिंदूच्या चिरस्थायी भावनेचे आणि प्रभू रामावरील अतूट श्रध्दा, भक्तीची साक्ष आहे. मंदिराचे बांधकाम भारतातील विविध लोकांना बांधून ठेवणारे सांस्कृतिक बंधन दर्शवते.

अयोध्येचं राम मंदिर हे भारतातील सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. मंदिराचे बांधकाम हा शांतताप्रिय आणि धर्माभिमानी हिंदू समुदायाचा प्रतीकात्मक विजय आहे, जे अनेक दशकांपासून ही रचना जिवंत होण्याच्या प्रतीक्षेत होते. एक पवित्र कर्तव्य आणि अविस्मरणीय तीर्थक्षेत्र म्हणून आयुष्यात एकदा तरी या विशेष स्थानाला भेट देणे भाविक आपले सांस्कृतिक कर्तव्य मानतात. जगभरातील शांतताप्रिय हिंदू समुदायासाठी, अयोध्या हे सर्वात महत्त्वाचे धार्मिक केंद्र म्हणून उदयास येणार आहे. अयोध्या शहर शरयू नदीच्या काठावरुन आणि पलीकडे सुशोभित झाल्यामुळे, विकासाच्या प्रक्रियेत अविश्वसनीय वाढ होते. हे मंदिर संपूर्ण भारत आणि जगभरातून लाखो भाविकांना आकर्षित करते.

अयोध्या हे प्रभू रामाचे जन्मस्थान म्हणून जगभरातील कोट्यवधी हिंदूच्या भक्तीचे केंद्र बनून राहिले आहे. ही जागा अविकसित असताना आणि वादाच्या केंद्रस्थानी असतानाही लोक या पवित्र ठिकाणी पूजेसाठी गर्दी करत होते. लोकांची इच्छा आणि आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे मंदिर उभारणीच्या संकल्पनेला अंतिम रूप देण्यात आले. भव्य मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे. गोव्यातील लोकांसाठी, हा एक बहुप्रतीक्षित क्षण आहे. संपूर्ण भारत आणि खरंच जगभरातील लोक शब्दांच्या पलीकडे आनंदित आहेत. आनंद आणि कृतज्ञतेची अभिव्यक्ती मात्र अविश्वसनीय आहे.

गोव्यापासून उत्तर प्रदेशातील अयोध्येपर्यंतचे अंतर महत्त्वाचे नाही. यापूर्वीही मंदिर उभारणीच्या चळवळीत राज्यातील लोकांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी या पवित्र संरचनेला आकार घेता यावा यासाठी मानवी संसाधनांपासून भौतिक संसाधनांपर्यंत सर्व शक्य मार्गानी योगदान दिले. आणि आता, अभिषेक झाल्यापासून पुढील तीन वर्षांपर्यंत, १५,००० हून अधिक लोकांना अयोध्येला पाठवण्याची योजना आहे. अयोध्या आणि राममंदिराशी गोव्याच्या भावनिक जोडणीचे हे एक लहान पण महत्त्वाचे प्रतीक आहे.

देशातील प्रत्येक व्यक्ती प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्ताचा साक्षीदार असेल, अयोध्येतील प्रभू रामाचे त्यांच्या घरी स्वागत करेल. भारतातील आणि जगातील इतरत्र लोकांसाठी हे शक्य करून दाखविण्याचे श्रेय माननीय पंतप्रधानांना दिले पाहिजे, प्रत्येक जण प्राणप्रतिष्ठेची वाट पाहत असताना, जगभरात भक्ती आणि श्रद्धेची लाट निर्माण झाली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. भक्तांना परमात्म्याशी जोडणाऱ्या या ऐतिहासिक प्रसंगी गोव्यातील जनतेच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो.

(लेखक गोवा सरकारमधील आरोग्य, शहरी विकास, महिला व बालकल्याण आणि वन मंत्री आहेत.)

टॅग्स :goaगोवा