शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ओखी वादळामुळे गोव्यात शॅक व्यवसायिकांचे नुकसान,  सरकारला दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 20:41 IST

ओखी वादळ गोव्याच्या किना-यावर धडकेल तसेच समुद्रातील पाण्याची पातळी अचानक वाढेल असा कोणताच इशारा सरकारच्या एकाही खात्याने दिला नव्हता.

पणजी - ओखी वादळ गोव्याच्या किना-यावर धडकेल तसेच समुद्रातील पाण्याची पातळी अचानक वाढेल असा कोणताच इशारा सरकारच्या एकाही खात्याने दिला नव्हता, असे सांगत राज्यातील शॅक व्यवसायिकांच्या संघटनेने शनिवारी सरकारला दोषी धरले आहे. हवामान खाते, दृष्टी यंत्रणा किंवा सरकारने कोणतीच कल्पना दिली नव्हती, असे शॅक व्यवसायिकांनी सांगितले.

शनिवारी पणजीत शॅक व्यवसायिकांची बैठक झाली. वादळामुळे समुद्रातील पाण्याची पातळी अचानक वाढली व शॅक व्यवसायिकांची हानी झाली. अनेकांची स्वयंपाकगृहे देखील वाहून गेली. सरकारने शॅक व्यवसायिकांना जलदगतीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शॅक व्यवसायिकांनी केली. कोणत्याच नैसर्गिक यंत्रणोला तोंड देण्यासारखी सरकारची स्थिती नाही. सरकारची पूर्वतयारीच नाही, अशा शब्दांत काही शॅक व्यवसायिकांनी प्रसार माध्यमांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. 

सरकारने सतर्कतेचा इशारा दिला नव्हता. आपले नुकसान झाले असल्याचे शॅक मालकांचे म्हणणो आहे. सीआरङोडने आम्हाला जी जागा शॅक उभे करण्यासाठी रेखून दिली होती, त्याच जागेत शॅक उभे करण्यात आले होते. त्या शॅकांची हानी झाली. भरती रेषेच्या ठिकाणीही शॅकसाठी जागा दिली गेली होती. ज्यांनी भरती रेषेजवळ शॅक उभे केले नाही, ते वाचले असेही काहीजणांनी सांगितले. सरकारने नुकसान भरपाई देण्यास विलंब लावू नये. प्रक्रियेचा घोळ घालू नये. 

आम्ही मोठया प्रमाणात परवाना शूल्क आणि अन्य शूल्क सरकारकडे जमा करत असतो. त्यामुळे आम्हाला सध्याच्या आपत्तीत सरकारने मदत करायलाच हवी, असे काही शॅक मालक म्हणाले. किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणालाही (जीसीङोडएमए) शॅक व्यवसायिकांनी दोष दिला आहे. शॅक मालकांनी सीआरङोडचे उल्लंघन केलेले नाही. संबंधित यंत्रणोने अजून किना:यांवर येऊन पाहणीच केलेली नाही असे त्यांचे म्हणणो आहे.

दरम्यान, सरकारी अधिका-यांनी लोकमतला सांगितले, की सध्या मामलेदार कार्यालय, सीआरङोड यंत्रणा आणि पर्यटन खाते यांनी मिळून संयुक्तपणो किना:यांवर सर्वेक्षण सुरू केले आहे. कुठच्या शॅकाची किती हानी झाली हे प्रत्यक्ष किना-यावर जाऊन पाहिले जात आहे. पाहणी काम संपल्यानंतर अहवाल येईल व त्यानंतरच सरकार किती प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी ते ठरवणार आहे. गोव्यातील 84 शॅकांचे वादळामुळे नुकसान झाले असल्याचे सरकारचे म्हणणो आहे. तसे अहवाल यापूर्वी दोन्ही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.