शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

गोव्यात शासकीय महामंडळाच्या कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग, परिपत्रक जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 20:04 IST

राज्यातील सर्व शासकीय महामंडळे, मंडळे आणि अन्य स्वायत्त संस्था यांच्या कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात व कर्मचा-यांसाठी नव्या वेतनश्रेणीविषयक व्यवस्थेचा प्रस्ताव महामंडळांनी सादर करावा, अशी सूचना करणारे परिपत्रक सरकारच्या अर्थ खात्याने जारी केले आहे.

पणजी : राज्यातील सर्व शासकीय महामंडळे, मंडळे आणि अन्य स्वायत्त संस्था यांच्या कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात व कर्मचा-यांसाठी नव्या वेतनश्रेणीविषयक व्यवस्थेचा प्रस्ताव महामंडळांनी सादर करावा, अशी सूचना करणारे परिपत्रक सरकारच्या अर्थ खात्याने जारी केले आहे.

महामंडळामधील कर्मचा-यांनाही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जातील, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेल्या विधानसभा अधिवेशनात जाहीर केले होते. त्यानुसार अर्थ खात्याने परिपत्रक जारी केले. मात्र, हे परिपत्रक म्हणजे कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतनश्रेणी लागू झाली, असा अर्थ होत नाही, हे या परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. महामंडळांमध्ये आणि अन्य स्वायत्त संस्थांमध्ये कर्मचा-यांची संख्या किती आहे याचा आढावा व्यवस्थापनाने घ्यावा. तसेच सध्याची कर्मचारी संख्या ही फ्रीज करावी आणि सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीविषयक व्यवस्थेचा प्रस्ताव अगोदर संबंधित महामंडळ किंवा स्वायत्त संस्थेच्या प्रशासकीय विभागाकडे मंजुरीसाठी सादर करावा, असे परिपत्रकातून सूचविण्यात आले आहे. यामुळे आता महामंडळे तयारी करू शकतील. राज्य सरकारी कर्मचा-यांचे वेतन सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर वाढले तरी, महामंडळाच्या कर्मचा-यांना मात्र सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू झाली नाही. 

सातव्या वेतन आयोगानुसार शिफारशी लागू करण्यासाठी कर्मचा-यांची संख्या महामंडळात किती आहे, महामंडळ कोणते उपक्रम राबवत असते तसेच वाढीव वेतनश्रेणी लावल्यानंतर खर्चाचा जो बोजा पडेल, तो पेलण्यासाठी महामंडळ महसुल प्राप्ती कशा प्रकारे करील याचाही आढावा प्रशासकीय विभागाला घ्यावा लागेल. सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतर अर्थ खात्याच्या आणि सरकारच्या मंजुरीसाठी प्रस्ताव दि. 31 जानेवारी 2018 पर्यंत सादर करावा असे परिपत्रकातून सूचविण्यात आले आहे. अर्थ खात्याकडून अंतिम आदेश जारी झाल्याशिवाय कुठचेच महामंडळ किंवा स्वायत्त संस्था सातव्या वेतन आयोगानुसार नवी वेतनश्रेणी कर्मचा-यांना लागू करू शकणार नाही हे देखील परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यापूर्वी महामंडळाच्या प्रशासकीय विभागाच्या प्रमुखाने स्वत: तो प्रस्ताव तपासून पाहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवा