शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

त्या उद्योजकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवा; मनोज परब यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 19:28 IST

‘गोव्यात स्थानिक बेरोजगार असतानाही परप्रांतीयांना रोजगार देणे चुकीचे आहे.

पणजी : भाजप सरकार हे स्थानिकांविरुद्ध आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे. सावंतवाडीतील भारतीय जनता युवा मोर्चाने आयोजित केलेल्या राेजगार मेळाव्यात गाेव्यातील ३० उद्योजकांनी सहभाग घेतला. या घटनेचा आम्ही विरोध करतो. सरकारने यात सहभागी झालेल्या ३० उद्योगांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवावी, अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष  मनोज परब यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

‘गोव्यात स्थानिक बेरोजगार असतानाही परप्रांतीयांना रोजगार देणे चुकीचे आहे. आम्ही अनेक वेळा बेराेजगारांचा मुद्धा उठवत असतो. गाेव्यात अनेक कंपन्या आहेत. औद्योगिक वसाहती आहेत. पण बिराेजगारांना रोजगार दिला जात नाही. या कंपन्यांमध्ये माेठ्या प्रमाणात परप्रांतीय लाेक आहेत. आता पुन्हा हा राेजगार मेळावा सावंतवाडीत होऊन यात गोमंतकीय स्थानिक युवकांना वगळले जात आहे, असा अराेप मनोज परब यांनी केला.    

हा बेरोजगारांवर अन्याय 

सावंतवाडीतील भाजयुमो आपल्या राज्यात रोजगार मिळावा भरविले याला आमचा  विरोध नाही. पण गोव्यात मोठ्या प्रमाणात बेराेजगारी असतानाही या मेळाव्यात राज्यातील ३० कंपन्या सहभागी झाल्या होत्या. याला आमचा विरोध आहे. राज्यात बी.फॉर्म, डी.फॉर्म, आयटीआय, डिप्लोमा, ऑटोमोबाईल अभियंते असे शिक्षण घेतलेले बेराेजगार आहेत पण अशा विविध जागांसाठी सावंतवाडीतील रोजगार मेळाव्यात ही जाहीरात या कंपन्यांनी दिली.  गोव्यातील युवकांना संधी देण्याऐवजी महाराष्ट्रातील युवकांना संधी दिली आहे. हा स्थानिक युवकांवर अन्याय आहे, असेही मनोज परब यांनी म्हटले.

गोमंतकीयांना सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे आता खासगी नोकऱ्याही हे सरकार बाहेरील लोकांना देत आहेत. सावंतवाडी येथे मेळाव्यात भरती झालेल्या कंपन्या गोव्यातील साधनसुविधा वापरत आहेत. असे असताना त्यांनी गोवेकरांनाच नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देणे गरजेचे आहे.  याआधी राज्य सरकारने राज्यातच रोजगार मेळावा घेतला होता. त्यामध्ये किती जणांना नोकऱ्या मिळाल्या, किती जणांना केवळ ऑफर लेटर दिले, पगार किती दिला, किती जणांना काढून टाकले याची माहिती सरकारने द्यावी, असेही मनोज परब यांनी म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवा