शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

दोघांचा मृतदेह शोधण्याची मोहिम सुरुच, कळंगुट बीचवर बुडाले होते पाच जण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 12:53 IST

पाचपैकी तिघांचा मृतदेह किनाऱ्यावर सापडला होता.

पणजी- गोव्यात फिरायला आलेल्या अकोल्याच्या १४ पैकी पाच जणांचा बूडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे गोव्यातच नव्हे तर विदर्भाताही हळहळ व्यक्त झाली. पाचपैकी तिघांचा मृतदेह किनाऱ्यावर सापडला होता. मंगळवारी दोघांचा मृतदेह  शोधण्याची मोहिम सुरुच होती. 

भारतीय नौसेना आणि जीवरक्षकांनी सकाळपासून समुद्रात खोलवर जाऊन मृतदेहाची शोधाशोध केली मात्र समुद्राच्या उसळलेल्या आणि वेगवान लाटा त्यामुळे जवानांनाही मोठी कसरत करावी लागली. दुपारपर्यंत मृतदेह हाती लागले नव्हते.  किरण ओमप्रकाश मस्के व शुभम गजानन वैद्य या दोघांचे मृतदेह सापडू शकले नाहीत. किरणचे नातेवाईकही गोव्यात दाखल झाले आहेत. तसेच इतर दहा जण कळंगुट येथील एका हॉटेलात थांबले असून ते प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. आपल्या मित्रांसोबत झालेल्या घटनेमुळे इतरही पूर्णपणे बिथरलेले असल्याचे किरणचे चुलतभाउ मनोज मस्के यांनी सांगितले.

जीवरक्षक आणि नौसेनेच्या जवानांनी सकाळपासून शोध मोहिम सुरु केली होती. त्यांचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. मात्र कळंगुट किनाऱ्यावर कुठेही दगड नाहीत. तसेच समुद्रही खवळलेला आहे. त्यामुळे शोधकार्यात अडथळे येत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. दोघांचेही मृतदेह मिळतील, या आशेत आम्ही आहोत, असे त्यांनी सांगितले.