शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

चार विद्यार्थी असले तरी शाळा सुरू ठेवतो: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2024 11:16 IST

शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी भरपाई देणार; कृषी कार्ड नसलेल्यांनाही लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: डिचोली व फोंडा तालुक्यातील सात शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या शाळांमध्ये एकही विद्यार्थी नव्हता. त्यामुळे त्या बंद कराव्या लागल्या. शेजारी खासगी सरकारी प्राथमिक शाळा असल्याने सरकारी शाळांवर परिणाम होतो. एखाद्या शाळेत चार देखील विद्यार्थी असले तरी ती शाळा आम्ही चालू ठेवतो, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजता केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान गोव्यातील शेतकरी, पंच, सरपंच सेल्फ हेल्प ग्रुप, स्वयंपूर्ण मित्र मिळून गोव्यातील एक लाख लोकांशी व्हर्चुअल संवाद साधणार आहेत. त्यासाठी राज्यभरात २१३ ठिकाणी सोय करण्यात आली आहे. चौहान यांचे मार्गदर्शन गोव्यातील शेतकऱ्यांना लाभणार असून त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. 

कृषी खात्याची सर्व विभागीय कार्यालये, साखळी, मडगाव, कुडचडे व अन्य ठिकाणची रवींद्र भवने, पेडणेतील बागायतदार हॉल, बार्देशमधील गोमंतक भंडारी समाजाचा हॉल तसेच इतर ठिकाणी सोय केलेली आहे. सर्व १९१ ग्राम पंचायतींचे पंच, सरपंच तसेच चौदाही पालिकांचे नगराध्यक्ष, नगरसेवक यात भाग घेतील.

चतुर्थीपूर्वी भरपाई 

या मोसमात मुसळधार पावसामुळे पिकाची हानी झालेल्या शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच दयानंद सामाजिक सुरक्षा, गृह आधार व इतर कल्याणकारी योजनांचे मानधनही चतुर्थीपूर्वीच दिले जाईल. कृषी खात्याकडून प्राप्त माहितीनुसार, चार कोटी रुपये या भरपाईपोटी शेतकऱ्यांना वितरित होणार आहे. कृषी कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

केंद्राला प्रस्ताव 

कृषी महाविद्यालयासाठी अनुदान तसेच केंद्राकडे अन्य मागण्यांचे प्रस्ताव मुख्यमंत्री म्हणाले की, खाजन शेती पुनरुज्जीवित करण्यासाठी तसेच बांधांची दुरुस्ती, नव्याने बांध उभारणे यासाठी निधी व कृषी महाविद्यालयासाठी अनुदान असे अनेक प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे ठेवले आहेत. केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या व्हर्चुअल संवादाचा कार्यक्रम झाल्यानंतर या प्रस्तावांचा सरकार पुन्हा पाठपुरावा करणार आहे. ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गतही अनेक प्रस्ताव विचाराधीन आहेत व ते मार्गी लावले जातील.

 

टॅग्स :goaगोवाSchoolशाळाPramod Sawantप्रमोद सावंतState Governmentराज्य सरकार