शहरं
Join us  
Trending Stories
1
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
2
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
3
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
4
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
5
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
6
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
7
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
8
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
9
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
10
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
11
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
12
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
13
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
15
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
16
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
17
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
18
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
19
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
20
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण गोव्यात भाजप संपला नाही! अपयशाबद्दल ख्रिस्ती धर्मगुरूंवर निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2024 13:46 IST

काँग्रेसचे प्रत्युत्तर.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दक्षिण गोव्यात भाजप संपलेला नाही, असा दावा करून पल्लवी धेंपे यांचा पराभव ख्रिस्ती धर्मगुरूंच्या हस्तक्षेपामुळेच झाला आहे, असा आरोप भाजपचे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केला.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, खिस्ती धर्मगुरूंनी भाजपविरोधात कारवाया केल्या. दक्षिण गोव्यात भाजप अजून संपलेला नाही. काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांना मिळालेली आघाडी शेखी मिरवण्यासारखी मुळीच नाही. राज्यभरात २७ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला मताधिक्य मिळालेले आहे. दक्षिण गोव्यातही अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये जिथे काँग्रेसला जास्त मते अपेक्षित होती तिथे ती बरीच कमी झालेली आहेत.

संकल्प आमोणकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या आधी चर्च संस्थेच्या बड्या प्रतिनिधींनी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना चर्चेसाठी बोलावले; परंतु बैठक संपल्यानंतर एकत्रपणे फोटो काढू, अशी विनंती तानावडे यांनी केली, तेव्हा या प्रतिनिधींनी फोटो काढण्यास नकार दिला. यावरून त्यांच्या मनात भाजपबद्दल असलेला गैर हेतू उघड होतो. भाजपची साथ देण्याचे मनात नव्हते, तर प्रदेशाध्यक्षांना बैठकीसाठी का बोलावले?, असा सवालही संकल्प यांनी केला.

आमदार संकल्प आमोणकर म्हणाले की, 'बिघाडी' सुरू झाल्यावर आता 'इंडिया वाले आरजीला सोबत घेऊ पाहत आहेत. मात्र, दुसरीकडे या पक्षाचे एकमेव आमदार वीरेश बोरकर यांचे भवितव्य धोक्यात असल्याच्या वावड्या हे विरोधकच उठवत असून त्यांनी काँग्रेसपासून सावध राहावे.

भाजपचा पराभव त्यांच्या केडरनेच केला

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, भाजपनेच खरे तर दक्षिणेतील पराभवावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. चर्चने प्रत्येक निवडणुकीत आपली भूमिका घेतलेली आहे. भाजपला चर्चच्या भूमिकेचा ज्यावेळी फायदा झाला तेव्हा नेते गप्प राहिले. आता दक्षिणेत पराभवाचे खापर ख्रिस्ती धर्मगुरूंचर फोडले जात आहे. प्रत्यक्षात भाजपचा पराभव त्यांच्या केडरनेच केला आहे. पसंतीचा उमेदवार न दिल्याने भाजप केडरने काँग्रेसला मते दिली. तसेच बहुजन समाजही काँग्रेससोबत राहिला, हे सत्य मान्य न करता खिस्ती धर्मगुरूंना दोष दिला जात आहे.

'बिघाडी' सुरू झालीय

'इंडिया' आघाडीवर टीका करताना आमोणकर म्हणाले की, आघाडीत आतापासूनच बिघाडी सुरु झाली आहे. बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत ती दिसून आली. रॉयला फर्नाडिस यांना वेगळी चूल मांडावी लागली. काँग्रेसमध्ये राजकीय भवितव्य घडवू इच्छिणाऱ्यांना आघाडीमुळे वाईट दिवस आले आहेत. इंडिया आघाडी यापुढे मुळीच टिकणार नाही, असे भाकीतही त्यांनी केले.

'इंडिया' आघाडीत आता काहीच आलबेल नाही...

भाजपचे प्रवक्त्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी विरोधक एकत्र असूनही उत्तर गोव्यात काँग्रेस उमेदवाराची मते २०१९ च्या १,६४,००० च्या तुलनेत यावेळी १,४१,००० पर्यंत खाली का आली? असा सवाल केला. इंडिया आघाडीमध्ये आलबेल राहिलेले नाही, अशी टीका त्यांनी केली, तसेच दक्षिण गोव्यात भाजपला ख्रिस्ती धर्मगुरूंमुळेच पराभव झाल्याचा आरोप करून ते म्हणाले की. अरुणाचल प्रदेशमध्ये ख्रिस्ती बहुसंख्य असूनही तेथे भाजपला दोन तृतियांश बहुमत मिळाले. केरळ, ओडिशातही हीच स्थिती आहे.

हा निव्वळ पलायनवाद...

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सुनील कवठणकर म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमधील भ्रष्टाचार, उद्दामपणा, पक्षांतरांना प्रोत्साहन देण्याच्या घटना तसेच संविधानविरोधी कृत्यांमुळे भाजपने दक्षिण गोव्याची जागा गमावली. या पराभवाची जबाबदारी न स्वीकारता भाजपने पलायनवादी वृत्ती आरंभली आहे. मात्र गोव्यात द्वेषाचे आणि फुटीरतेचे राजकारण चालत नाही हा धडा भाजप अजूनही शिकलेला नाही. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा