शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

संजीवनी साखर कारखान्याला ‘ग्रहण’, 3 दिवस कारखाना बंद असल्यानं ऊस उत्पादकांचं नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 13:17 IST

गोव्यातील सहकार क्षेत्रातील एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखान्यात तांत्रिक बिघाडाचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. या कारखान्याला जणू ‘ग्रहण’च लागले आहे.

पणजी : गोव्यातील सहकार क्षेत्रातील एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखान्यात तांत्रिक बिघाडाचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. या कारखान्याला जणू ‘ग्रहण’च लागले आहे. कंडेन्सर पंप निकामी झाल्याने तीन दिवस कारखाना बंद ठेवावा लागल्याने ऊस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कंडेन्सर पंप दुरुस्त करण्यास स्थानिक अभियंत्यांना अपयश आल्याने अखेर पुणे येथील वसंतदादा साखर कारखान्यातून तज्ञांना पाचारण करावे लागले. 

नोव्हेंबरमध्ये 20 दिवस कारखाना बंद होता त्यानंतर सलग दुस-यांना हा कारखाना बंद ठेवावा लागला. ऊस कापून कारखान्यासाठी पाठवला होता परंतु तो पडून राहिल्याने शेतक-यांचे नुकसान झाले. उन्हात ऊस कोरडा झाल्याने वजन घटले आणि त्यामुळे उत्पादकांना योग्य भाव मिळाला नाही. भर मोसमात कारखाना बंद ठेवावा लागला. ऊस भरलेले अनेक ट्रक आपला नंबर कधी लागतो याच्या प्रतीक्षेत असल्याचे ऊस उत्पादक राजेंद्र देसाई यांनी सांगितले. 

कारखान्याचे प्रशासक दामोदर मोरजकर यानी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून आलेले तज्ञ काही दिवस येथेच राहतील आणि कारखान्याच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवून असतील. यंदा मुळातच गळीत हंगाम उशिरा सुरु झाला. 71 दिवस गाळप आतापर्यंत झाले असून सुमारे 59,790 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झालेले आहे. यात 34,766 मेट्रिक टन ऊस गोव्याचा तर 26, 046 मेट्रिक टन ऊस शेजारी राज्यातील आहे. चालू मोसमात आतापयंंत 47,820 मेट्रिक टन सागर उत्पादन झालेले आहे. या गाळपातून सुमारे 8.10  टक्के इतका उतारा मिळाला. 

दरम्यान, कारखान्यातील यंत्रसामुग्री इतकी जुनी झाली आहे की त्याच्या देखभालीवरच वर्षाकाठी सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्च येतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. कारखान्याच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव आहे त्यासाठी नवी यंत्रसामुग्री आणली जाणार आहे. कोल्हापूर येथील साखरतज्ज्ञ बी. एन. पाटील यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा विचार आहे. पाटील यांनी साखर क्षेत्रात केवळ भारतातच नव्हे तर केनियासारख्या देशातही काम केलेले आहे. त्यांना या क्षेत्रात तब्बल 34 वर्षांचा अनुभव आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेgoaगोवा