शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गोव्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा उद्यापासून गळीत हंगाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 14:01 IST

गोव्यातील एकमेव सहकारी कारखाना : गत साली ४७,३८७ टन ऊस गाळप

पणजी : गोव्यात सहकार क्षेत्रातील एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम मंगळवारपासून (14 नोव्हेंबर) सुरू होत आहे. या वर्षी गोव्यातील ५0 हजार टन आणि शेजारी कर्नाटकातील १ लाख टन मिळून दीड लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखान्याचे प्रशासक उमेशचंद्र जोशी यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.

गेल्या वर्षी ४७,३८७ टन ऊस गाळप झाले होते व त्यातून ३९,७२८ क्विंटल साखर उत्पादन झाले. ७ हजार टन स्थानिक ऊस आणि सुमारे ४0 हजार टन शेजारी राज्यातील ऊसाचे गाळप झाले होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अलिकडेच कारखान्याचे आधुनिकीकरण लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते त्या पार्श्वभूमीवर कामेही सुरू झाली आहेत.

प्राप्त माहितीनुसार गत साली ऊस गाळपातून सुमारे ८.३८ टक्के इतका उतारा मिळाला आणि ३९,७२८ क्विंटल साखर उत्पादन झाले. यंदा रामनगर, हल्याळ, अळणावर, हेब्बाळ आदी भागांबरोबरच यावर्षी खानापूर येथूनही ऊस आयात करण्याचे ठरले आहे.

कोल्हापूरचे साखरतज्ज्ञ सल्लागार?सरकारने ऊस उत्पादकांना आधारभूत दर प्रती टन ५00 रुपयांनी वाढवून दिला आहे. कारखान्याकडून १२00 रुपये तर सरकारकडून १८00 रुपये असे एकूण ३ हजार रुपये प्रती टन उत्पादकांना आता मिळतील. यापूर्वी सरकारकडून १३00 रुपये आणि कारखान्याकडून १२00 रुपये मिळून अडीच हजार रुपये दिले जात असत. कारखान्याच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव आहे त्यासाठी नवी यंत्रसामुग्री आणली जाणार आहे. कोल्हापूर येथील साखरतज्ज्ञ बी. एन. पाटील यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा विचार आहे. पाटील यांनी साखर क्षेत्रात केवळ भारतातच नव्हे तर केनियासारख्या देशातही काम केलेले आहे.

त्यांना या क्षेत्रात तब्बल ३४ वर्षांचा अनुभव आहे. कारखान्यातील यंत्रसामुग्री इतकी जुनी झाली आहे की त्याच्या देखभालीवरच वर्षाकाठी सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्च येतो, अशी माहितीही जोशी यांनी दिली. इथॅनॉल, बायोगॅसची निर्मिती करुन कारखाना नफ्यात आणता येईल, असे गेल्या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांनी सूचविले आहे. कृषी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार २0१६-१७ च्या गळीत हंगामात राज्यात ४0,२३४ टन ऊस उत्पादन झाले आणि हा ऊस संजीवनी सहकारी साखर कारखान्याला पुरविण्यात आला. आधी अडीच हजार रुपये प्रति टन आधारभूत दर दिला जात होता त्यात आता ५00 रुपयांची भर पडली आहे.

शेजारी राज्यावरच अवलंबनसंजीवनी साखर कारखान्याची गरज गोव्यात उत्पादन होणा-या ऊसातून भागत नाही. त्यामुळे शेजारी कर्नाटक तसेच महाराष्ट्रातून ऊस मागवावा लागतो. गोव्यातील ऊस लागवड क्षेत्र गेल्या काही वर्षांच्या काळात स्थिर राहिलेले आहे. संजीवनी साखर कारखाना हा सहकार क्षेत्रातील एकमेव कारखाना आहे. मात्र या कारखान्याला पुरेसा ऊस मिळत नाही. ऊस उत्पादनवाढीसाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. नवीन जागा लागवडीखाली आणण्यासाठी प्रती हेक्टर १0 हजार रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाते. मजूर खर्चावर हेक्टरी ५0 टक्के किंवा १0 हजार रुपये जी रक्कम कमी असेल ती दिली जाते. गळीत हंगामाच्या उद्घाटनासाठी उद्या स्थानिक आमदार तथा साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पाऊसकर तसेच सांगेचे आमदार प्रसाद गांवकर उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा