शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

“गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 12:43 IST

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत गोवा दौऱ्यावर आहेत.

ठळक मुद्देशिवसेना २२ जागांवर निवडणूक लढणारशिवसेना आणि गोव्याचे भावनिक नातेविजय सरदेसाई, वेलिंगकर यांची भेट घेणार

पणजी: पुढील वर्षी अन्य पाच राज्यांप्रमाणे गोव्यातही विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकविध पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतगोवा दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशसह गोव्यातही निवडणुका लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. तसेच गोव्यात २२ जागांवर शिवसेना लढणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे. (sanjay raut says shiv sena will do good performance like maharashtra if form govt in goa)

शिवसेना २२ जागांवर निवडणूक लढणार आहे. आम्ही गोव्यातील निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. आम्हाला कोणत्याही युतीची गरज नाही. आमची पक्षबांधणी उत्तम आहे. तर कोलकात्यामधील तृणमूल गोव्यात निवडणूक लढवू शकते, तर गोवा महाराष्ट्राच्या शेजारीच आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये कशी कामगिरी केलीय हे तुम्ही पाहू शकता, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे चांगली कामगिरी करून दाखवू

शिवसेना आणि गोव्याचे भावनिक नाते आहे. विजय सरदेसाई, वेलिंगकर यांची भेट घेणार आहे. नवे आणि जुने पक्ष कार्यकर्ते या दौऱ्यात मला भेटणार आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना ज्या पद्धतीने काम करत आहे, आम्ही त्याच पद्धतीने गोव्यात काम करु, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्री तसेच युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे हेदेखील गोव्यात प्रचारासाठी येतील, अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली. गोव्यामधील कोणत्याही पक्षाने आमच्याकडे युतीसंदर्भात विचारणा केलेली नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. 

भाजपला धडा शिकवण्याची इच्छा जनतेची आहे 

संपूर्ण गोव्याला अंमली पदार्थांचा विळखा पडलेला आहे. गोव्यात कॅसिनोचा, जुगाराचा कहर आहे. त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करतच भाजप तिकडे सत्तेवर आली. मात्र, त्या सगळ्याला आता भाजपचा पाठिंबा आहे. कोरोनाकाळात गोव्याची अवस्था वाईट झाली आहे. ड्रग्समाफियांच्या ताब्यात गोवा अडकला आहे. भाजप फारच थापा मारत आहे. त्यासाठी तिकडे जाणे गरजेचे आहे. महाराष्ट्र आणि गोव्याची तुलना करता येणार नाही. भाजपने गोव्यात अनेकदा तोडफोड करत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची इच्छा जनतेची आहे आणि ते शिवसेनाच करू शकते, असे संजय राऊत यांनी यापूर्वी म्हटले होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणgoaगोवाShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत