शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

साळगावच्या कचरा प्रकल्पाची क्षमता होणार २०० टन; घन कचरा व्यवस्थापन महामंडळाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 12:23 IST

ज्या प्रकल्पामुळे गोव्यातील कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर झाली तसंच देशातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरलेला साळगाव येथील घन कचरा प्रकल्पाची क्षमता १२५ टन प्रती दिन वरुन २०० टन करण्यात येणार आहे.  

म्हापसा : ज्या प्रकल्पामुळे गोव्यातील कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर झाली तसंच देशातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरलेला साळगाव येथील घन कचरा प्रकल्पाची क्षमता १२५ टन प्रती दिन वरुन २०० टन करण्यात येणार आहे.  जर्मनीतील तंत्रज्ञानाचा वापर करून साळगाव पठारावर विक्रमी वेळेत तयार करुन दिड वर्षापूर्वी लोकार्पण करण्यात आलेल्या या प्रकल्पात सुरुवातीला दिवसा ५० टन कचऱअयावर प्रक्रिया करण्यात येत होती. नोव्हेंबर २०१४ मध्ये प्रकल्पाच्या कामाला शुभारंभ झालेला. तसेच त्यावर १४६ कोटी रुपये खर्च करण्यात आलेले. आता दिड वषार्नंतर दिवसाला १२५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत असून पुढील महिन्याभरात ती वाढवून २०० टन प्रती दिन करण्यात येणार असल्याची माहिती घन कचरा व्यवस्थापन महामंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो यांनी दिली. 

म्हापसा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असून देशातील अनेक राज्यांच्या प्रतिनिधींनी या प्रकल्पाची पहाणी केली आहे. सध्या या प्रकल्पातून तयार होणाऱ्या बायोगॅस इंधनाचा वापर बसगाड्यांसाठी प्रायोगीक तत्वावर करण्यात येत आहे. कदंब महामंडळाने स्वीडनच्या स्कॅनिया या कंपनीशी हातमिळवणी करुन देशातील पहिलाच अशा प्रकारचा उपक्रम येथील इंधन वापरुन ऑगस्ट महिन्यात सुरु केला होता. 

प्रकल्पाची क्षमता वाढवण्यापूर्वी त्याचे पर्यावरणीय प्रभाव मुल्यांकन करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेण्यात येणार असून परवानगी मिळाल्यानंतर क्षमता वाढवण्यात येणार आहे. सध्या प्रकल्पात एकाच पाळीवर कामगार काम करतात. ती वाढवून दिवसाला दिड पाळीवर काम करण्यात येणार असल्याची माहिती लोबो यांनी दिली.  या प्रकल्पामुळे उत्तर गोव्यातील किनारी भागातल्या कचरा प्रश्नावर तोडगा काढणे शक्य झाले आहे. किनाऱ्यावरील बऱ्याच भागात कचऱ्याची समस्या दूर झाली असली तरी काही ठिकाणी सुविधांच्या अभावी कचरा व्यवस्थित गोळा केला जात नसल्याचे ते म्हणाले. काही पंचायतींना सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच कचºयाच्या वर्गीकरणा संबंधी जागृती होणे आवश्यक असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. 

उत्तर गोव्यासाठी अशा प्रकारच्या आणखीन एका प्रकल्पाची गरज आहे. हा प्रकल्प झाल्यास उत्तर गोव्यातील कचºयाची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. राजधानी पणजीपासून जवळ असलेल्या बायंगिणी येथे नवीन प्रकल्प बांधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पामुळे तिसवाडी तालुक्यातील कचºयाची समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याची माहिती मायकल लोबो यांनी दिली.  

टॅग्स :goaगोवा