शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'त्या' गोमंतकीयांची सुखरुप सुटका, मणिपूरमधून परतले; मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 16:10 IST

मुख्यमंत्र्यांनी डीजीपी सिंग यांच्यामार्फत गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : हिंसाचाराचा आगडोंब उसळलेल्या मणिपूरमध्ये अडकलेला ११ वर्षीय अर्णव कलंगुटकर शिक्षणासाठी गेलेली सुविद्या नाईक हे सुखरूप गोव्यात पोहोचले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी तातडीने यंत्रणा गतिमान केल्यामुळे, या दोघांच्या सुरक्षित परतण्याचा मार्ग सुकर झाला.

पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्णव हा मणीपूर येथील बिश्नपूर या गावी आपल्या नातेवाइकांकडे सुट्टी घालविण्यासाठी गेला होता. मणीपूरमध्ये उसळलेला हिंसाचार हा या गावालाही बाधला असल्यामुळे, अर्णवच्या पालकांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे मदतीची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी डीजीपी सिंग यांच्यामार्फत अर्णवला गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.

गोवा पोलिसांनी त्या गावात असलेल्या सीआरपीएफला संपर्क करून, अर्णवला विमानतळावर सुरक्षित आणण्यासाठी मदत मागितली. मात्र, ते गावच हिंसाचारग्रस्त असल्यामुळे तेथून त्याला बाहेर काढणेही जोखमीचे होते. त्यामुळे अर्णवला काही काळ तिथेच राहू देण्याचा निर्णयही प्रारंभी झाला, परंतु पालक चिंता करू लागल्यामुळे त्याला आणायचे असे ठरले. सीआरपीएफच्या तुकडीनेच अर्णवला सुरक्षितपणे इंफाळमधील विमानतळापर्यंत नेले. तिथे एक अडकून पडलेल्या आणि गोव्यात येण्यासाठी निघालेल्या गोमंतकीयांच्या स्वाधीन त्याला करण्यात आले. इंफाळहून दिल्ली आणि दिल्लीहून गोवा असा प्रवास करून ते सुखरूप गोव्यात पोहोचले. सुविद्या नाईक हीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे सुरक्षितपणे गोव्यात पोहोचली.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत