शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

'त्या' गोमंतकीयांची सुखरुप सुटका, मणिपूरमधून परतले; मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 16:10 IST

मुख्यमंत्र्यांनी डीजीपी सिंग यांच्यामार्फत गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : हिंसाचाराचा आगडोंब उसळलेल्या मणिपूरमध्ये अडकलेला ११ वर्षीय अर्णव कलंगुटकर शिक्षणासाठी गेलेली सुविद्या नाईक हे सुखरूप गोव्यात पोहोचले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी तातडीने यंत्रणा गतिमान केल्यामुळे, या दोघांच्या सुरक्षित परतण्याचा मार्ग सुकर झाला.

पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्णव हा मणीपूर येथील बिश्नपूर या गावी आपल्या नातेवाइकांकडे सुट्टी घालविण्यासाठी गेला होता. मणीपूरमध्ये उसळलेला हिंसाचार हा या गावालाही बाधला असल्यामुळे, अर्णवच्या पालकांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे मदतीची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी डीजीपी सिंग यांच्यामार्फत अर्णवला गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.

गोवा पोलिसांनी त्या गावात असलेल्या सीआरपीएफला संपर्क करून, अर्णवला विमानतळावर सुरक्षित आणण्यासाठी मदत मागितली. मात्र, ते गावच हिंसाचारग्रस्त असल्यामुळे तेथून त्याला बाहेर काढणेही जोखमीचे होते. त्यामुळे अर्णवला काही काळ तिथेच राहू देण्याचा निर्णयही प्रारंभी झाला, परंतु पालक चिंता करू लागल्यामुळे त्याला आणायचे असे ठरले. सीआरपीएफच्या तुकडीनेच अर्णवला सुरक्षितपणे इंफाळमधील विमानतळापर्यंत नेले. तिथे एक अडकून पडलेल्या आणि गोव्यात येण्यासाठी निघालेल्या गोमंतकीयांच्या स्वाधीन त्याला करण्यात आले. इंफाळहून दिल्ली आणि दिल्लीहून गोवा असा प्रवास करून ते सुखरूप गोव्यात पोहोचले. सुविद्या नाईक हीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे सुरक्षितपणे गोव्यात पोहोचली.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत