शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
5
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
6
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
7
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
8
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
9
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
10
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
11
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
12
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
13
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
14
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
15
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
16
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
17
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
18
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
19
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
20
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे

रस्त्यांवरील खड्डे प्रकरण, 'आप'च्या सचिवाची याचिकेतून माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 21:07 IST

राजकीय लाभ उठविण्यासाठी जनहित याचिका घातल्याचा सरकारी दावा हायकोर्टाने धरला उचलून 

पणजी : गोव्यात रस्त्यांवरील खड्ड्यांच्या बाबतीत आम आदमी पक्षाचे सचिव प्रदीप पाडगांवकर यांनी सादर केलेली जनहित याचिका राजकीय लाभ उठविण्यासाठीच असल्याचा अ‍ॅडव्होकेट जनरलनी केलेला युक्तिवाद हायकार्टाने उचलून धरीत पाडगांवकर यांना याचिकेतून माघार घेण्याचे निर्देश दिले आणि त्यानुसार पाडगांवकर यांनी माघारही घेतली. आता अ‍ॅमिकस क्युरी ही याचिका पुढे चालविणार असून १८ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत काय स्थिती आहे याची माहिती अ‍ॅडव्होकेट जनरलनी १६ डिसेंबरपर्यंत अ‍ॅमिकस क्युरींना द्यावी, असे न्यायालयाने सांगितले आहे. 

पाडगांवकर यांनी या जनहित याचिकेत जे कोण रस्त्यांच्या दुर्दशेला जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्याआधी त्यांनी हायकोर्टाला साधे पत्र लिहून रस्त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले होते. या पत्रात त्यांनी रस्त्यांची नेमकी किती हानी झाली आहे याची खातरजमा करण्यासाठी आयुक्त नेमावा, कंत्राटदार जी रस्त्याची कामे करतात त्यावर दर्जाच्या दृष्टीने नियंत्रण ठेवावे, आदी मागण्या त्यांनी केल्या होत्या. दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी खास करुन महामार्ग बांधकामाच्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकाना बरीच कसरत करावी लागते. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. धारगळ, कोलवाळ, गिरी भागात तर वाहने मुंगीच्या गतीने चालवावी लागतात. 

टॅग्स :goaगोवाroad safetyरस्ते सुरक्षा