शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेतले तरच योग्य भवितव्य : मगोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 12:56 IST

गोव्यात देखील भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेऊन एकत्र काम केले तरच त्या पक्षाला योग्य भवितव्य असेल अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व मगो पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी मंगळवारी व्यक्त केली.

ठळक मुद्देभाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेऊन एकत्र काम केले तरच त्या पक्षाला योग्य भवितव्य असेल अशी प्रतिक्रिया दिपक ढवळीकर यांनी व्यक्त केली.गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत सत्ताधारी आघाडीचे मगोप आणि गोवा फॉरवर्ड हे दोन प्रमुख घटक आहेत. गोवा विधानसभा सध्या 38 सदस्यीय असून या दोन्ही पक्षांकडे एकूण सहा आमदार आहेत.

पणजी - देशातील पाचपैकी दोन-तीन राज्यांमध्ये भाजपाच्या वाट्याला जी स्थिती आली, ते पाहता भाजपाने सत्तेतील घटक पक्षांना विश्वासात घेणे गरजेचे आहे हे स्पष्ट होते. गोव्यात देखील भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेऊन एकत्र काम केले तरच त्या पक्षाला योग्य भवितव्य असेल अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व मगो पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी मंगळवारी व्यक्त केली.

गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत सत्ताधारी आघाडीचे मगोप आणि गोवा फॉरवर्ड हे दोन प्रमुख घटक आहेत. गोवा विधानसभा सध्या 38 सदस्यीय असून या दोन्ही पक्षांकडे एकूण सहा आमदार आहेत. भाजपाकडे चौदा व काँग्रेसकडेही चौदा आमदार आहेत. तिघे अपक्ष आहेत व त्या तीन अपक्षांपैकी दोन जण सध्या सरकारवर खूप नाराज आहेत. ते प्रशासन ठप्प झाल्याची टीकाही जाहीरपणे करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव हे तूर्त काँग्रेसच्याबाजूने आहेत. गोव्यातील मगो पक्षाने यापूर्वी भाजपावरील दबाव वाढवला होता. मुख्यमंत्री आजारी असल्याने व ते घराबाहेर पडू शकत नसल्याने मुख्यमंत्रीपदाचा ताबा मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे सोपविला जावा, अशी मागणी मगो पक्षाने यापूर्वी सातत्याने केली होती. खनिज खाणी जर 15 डिसेंबपर्यंत सुरू झाल्या नाही तर मगोपला वेगळा विचार करावा लागेल असाही इशारा मगोपने दिला होता.

दोन-तीन राज्यांमध्ये भाजपाच्या वाट्याला जी स्थिती आली, त्याविषयी लोकमतने प्रतिक्रिया विचारताच अध्यक्ष दिपक ढवळीकर म्हणाले, की गोव्यातही घटक पक्षांना भाजपाने विश्वासात घेतले नाही तर ते मुळीच योग्य होणार नाही असा संदेश देशभरातील वातावरणामधून मिळत आहे. भाजपाने मनमानी कारभार बंद करावा. सरकार चांगल्या प्रकारे चालण्यासाठी भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घ्यावे, तरच चांगले भवितव्य आहे हे आता अधिक स्पष्ट झाले आहे. मी जे काही बोलत होतो ते योग्य होते हेही आता कळून येत आहे. लोकांना गृहित धरता येत नाही.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकरPoliticsराजकारण