शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

आरजीची यावेळी विधानसभेत वेगळी चूल: आमदार वीरेश बोरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2024 13:37 IST

भू संवर्धन खाजगी विधेयक आणणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आरजीची यावेळी विधानसभा अधिवेशनात संयुक्त विरोधकांसोबत नसेल, असे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले. गेल्या अधिवेशनात कॉग्रेस, आप, गोवा फॉरवर्डसोबत संयुक्त विरोधकांमध्ये आरजीने सहभाग घेतला होता. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या इंडिया आघाडीसोबत न राहता आरजीने स्वतंत्र उमेदवार दिले व आता येत्या पावसाळी विधानसभा अधिवेशनातही ते वेगळी चूल मांडतील.

बोरकर म्हणाले की, मी यावेळी पुन्हा भू संवर्धन विधेयक आणणार आहे. गोव्यात परप्रांतियांना जमिनी विकण्यावर निर्बंध हवेच. या गोष्टीचा मी सातत्याने पाठपुरावा करीत राहीन स्थानिक गोमंतकीयांच्या हिताचे रक्षण व्हावे अशी भूमिका रिव्होल्यूशनरी गोवन्सने मांडली आहे. त्या अनुषंगाने आम्ही हे भू संवर्धन विधेयक मांडले आहे. जमिनी स्थानिकांकडेच राहाव्यात असे प्रयत्न आहेत.'

ते म्हणाले की, 'परप्रांतीय लोक लाखो रुपये खर्च करुन जमिनी विकत घेतात. त्यामुळ जमिनींचे दरही वाढलेले आहेत. पंचायती, कृषी, ग्रामीण विकास यंत्रणा आदी खात्यांबद्दलही मी विधानसभेत आवाज उठवणार आहे.

युरींचे पक्षांतरबंदीसह चार खासगी ठराव

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पक्षांतर बंदी कायदा, विधवा भेदभाव, जनमत कौल दिवस आणि अनुसूचित जातींसाठी राजकीय आरक्षणाबाबत चार खासगी ठराव सादर केले आहेत. सभापती रमेश तवडकर हे ठराव कामकाजात दाखल करून घेऊन चर्चेला आणतील, अशी अपेक्षा युरी यांनी व्यक्त केली. विधवा भेदभावाची अन्यायकारक प्रथा थांबविण्यास कायदा आणण्यासाठी सरकारने आजपर्यंत काहीही केले नाही याचे खूप वाईट वाटते, असे युरी म्हणाले.

पक्षांतर बंदी कायदा मजबूत करण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याची वेळ आली आहे. अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण देण्याची गरज आहे. विधानसभेच्या सर्व सदस्यांनी दोन्ही ठरावांना पाठिंबा द्यावा आणि यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे युरी यांनी सांगितले. ते म्हणाले की, जनमत कौल हा दिवस राज्य पातळीवर साजरा केला जात नाही. या दिवसाबाबत प्रत्येक आमदाराचे मत जाणून घेऊ.'

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण