शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गद्दारांना पुन्हा संधी नाहीच; पक्षाचे कार्य पुढे नेणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारीचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2024 12:52 IST

पक्षांतराविरोधात निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा :काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून येत भाजपात प्रवेश केलेल्या गद्दारांना भविष्यातही पक्षाची दारे बंद राहणार आहेत. त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. पक्ष संघटनेत सक्रियपणे सहभागी होऊन पक्षाचे कार्य पुढे नेणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यावर विचार केला जाईल. २०२७ च्या निवडणुकीत काँग्रेसला २७ जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. या पक्षांतराला शनिवारी दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त कळंगुट येथील डॉल्फिन सर्कलजवळ काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी पाटकर बोलत होते. त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा, उत्तर गोवाचे अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, कळंगुट, साळगाव तसेच शिवोली गट समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या नेत्यांनी हातात फलक घेऊन त्या आमदारांविरोधात घोषणा दिल्या तसेच प्रतीकात्मक पुतळ्याचेही दहन करून आमदारांचा निषेध व्यक्त केला. भविष्यात त्या आठही आमदारांना मतदार त्यांची जागा दाखवून देतील, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले. पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

१४ सप्टेंबर हा गोव्यातील राजकारणातील काळा दिवस असून भाजपात प्रवेश केलेल्या त्या सर्व केल्याचा आरोपही पाटकरांनी केला. ' भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर भूरूपांतरही केल्याचा आरोप केला. या गद्दारांना भविष्यात पक्षाची दारे कायमची बंद करण्यात आल्याचे ते म्हणाले.

भाजपात प्रवेश करताना सर्व आठही आमदारांनी विकासाच्या नावावर प्रवेश केल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात वैयक्तिक स्वार्थासाठी ते भाजपात गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सभापतींकडे प्रलंबित असलेल्या अपात्र याचिकेवर सभापतींनी ९० दिवसांत योग्य निर्णय घ्यावा, न पेक्षा सर्वोच्च न्यायालय त्यावर सुनावणी घेऊन निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयाकडून हे सर्व आमदार अपात्र ठरवले जातील, असाही दावा काँग्रेसकडून करण्यात आला.

लोबोंना पराभव दिसला होता : कालुर्स फेरेरा

आपण भाजपाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली तर आपला पराभव निश्चित असल्याचे मायकल लोबो यांना ज्ञात होते. त्यामुळे पराभव टाळण्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश मिळवला. प्रवेश करताना पुन्हा भाजपात प्रवेश करणार नसल्याची ग्वाही लोबो यांनी दिली होती. लोकांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचा घात करून ते पुन्हा भाजपात गेले, असे फेरेरा यावेळी म्हणाले.

लोकांसह देवाचाही विश्वासघात केला

काँग्रेस सोडून जाणार नसल्याचे देवासमोर वचन देऊनही 'त्या' ८ आमदारांनी ५०-५५ कोटी घेत भाजपात प्रवेश केल्याचा त्यांच्यावर आरोप होत असून त्यांनी लोकांचाच नव्हे, तर देवाचासुद्धा विश्वासघात केला आहे. काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या आमदारांनी पैसे घेऊन फक्त स्वतःचाच विकास केला. अशा नेत्यांवर लोकांनी विश्वास न ठेवता त्यांना लोकशाहीतून बाहेर ठेवण्याची गरज आहे, असे दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस म्हणाले.

दोन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. त्या पक्षांतराचा निषेध करण्यासाठी शनिवारी काँग्रेस नेत्यांनी मुरगाव नगरपालिकेसमोर एकत्र येत त्या आठ आमदारांविरुद्ध घोषणा देत निषेध व्यक्त केला. काँग्रेस सोडून भाजपात गेलेले मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या प्रतिमेचेही दहन करण्यात आले. खासदार फर्नांडिस म्हणाले की, दोन वर्षापूर्वी काँग्रेसच्या त्या' आठ आमदारांनी लोकशाहीचा खून केला. भाजपात जाण्यासाठी त्या आमदारांनी पैसे घेतले, असा आरोप त्यांच्यावर होत आहे. आता त्या' आमदारांना भाजप खंडणी वसूल करण्यासाठी वापरत आहे. त्यामुळे विकासासाठी काम न करता ते धमकी देण्याचा प्रकार करतात. यावेळी काँग्रेसचे नेते नितीन चोपडेकर, ओलेन्सियो सीमोईस, ओरवील दोरादो आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

पूर्वी मुख्यसचिव, नंतर पोलिस महासंचालक आणि आता मत्स्यपालन विभागाच्या संचालकांनी चुकीचे काम केल्यानंतर त्यांच्यावर योग्य कारवाई न करता त्यांची करण्यात आली. लष्करात जसे कोर्ट मार्शल करून जाते. त्याचप्रमाणे करणाऱ्या कारवाई केली चुकीचे काम अधिकाऱ्यांवरही योग्य कारवाई केली पाहिजे, असे खासदार फर्नाडिस म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस