शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

परतीच्या पावसाने भात पीक आडवे, शेतकऱ्यांवर संकट; भरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2024 07:26 IST

बळीराजाला यंदा अतिवृष्टीने हैराण केले. सतत पडलेल्या पावसामुळे सुरुवातीला शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: ऐरवी शेतात चांगले पीक यावे म्हणून पावसासाठी देवाला साकडे घालणाऱ्या बळीराजाला यंदा मात्र अतिवृष्टीने हैराण केले. सतत पडलेल्या पावसामुळे सुरुवातीला शेतकऱ्याला भातशेतीत दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर मोठ्या कष्टाने पिकवलेले पीक काढणीला आले असता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने ते आडवे झाले. आता शेतात आडवे झालेल्या भाताला पुन्हा कोंब येऊ लागले आहेत. त्यामुळे यंदा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

यंदाच्या हंगामात पावसाला सुरुवात झाल्यापासून आनंदित झालेल्या शेतकऱ्याने लागवड लवकर पूर्ण व्हावी यावर भर दिला. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्याने पेरणी केलेले बियाणे वाहून गेल्याने दुबार पेरणी पुन्हा करणे भाग पडले. तर, काही शेतकऱ्यांनी केलेली लागवड पाण्याखाली गेल्याने झालेल्या परिणामातून पुन्हा लागवड करावी लागली.

दुबार केलेल्या लागवडीतून सतत बऱ्याच शेतात चांगले पीक आले होते. त्यामुळे तो आनंदित झालेला. काही शेती पिकण्याच्या मार्गावर असल्याने त्यांनी कापणीची तयारी सुरू केली होती. पण, परतीच्या पावसाने धडाका लावल्याने काढणीला आलेली शेती आडवी झाली आहे. शेतात पाणी साचून त्यातच भाताचे पीक आडवे झाल्याने त्याला कोंब येऊ लागले आहेत. बार्देश तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

राज्यात पावसाने संपूर्ण हंगामात मुसळधार हजेरी लावली. पेरणीच्यावेळी पावसाने शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. मात्र, त्यानंतर जोर वाढल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी करून मोठ्या कष्टाने आलेले पीक परतीच्या पावसाने वाहून नेल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. नानोडा येथील शेतकरी कृष्णा गावस, गुरु गावस यांच्यासह गावातील १० हून अधिक शेतकऱ्यांच्या भात पिकाचे नुकसान झाले आहे.

डोळ्यादेखत पीक गेले 

कृषी विभागीय कार्यालयातून पिकलेल्या शेतींची कापणी व्हावी यासाठी कापणी यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. पण, पडणाऱ्या पावसामुळे भात कापणी करणे शक्य होत नसल्याने तसेच ओल्या शेत जमिनीतून मशीनचा वापर करणे अडचणीचे ठरत असल्याने परिणामात भर पडली आहे. तसेच हळदोणा, मयडे, शिवोली, सुकूर सारख्या भागातील शेती खराब होऊन त्यांना कोंब फुटू लागले आहेत.

नुकसान भरपाई द्या...

नास्नोळा फार्मर्स क्लबचे अध्यक्ष विठ्ठल नाईक यांनी सांगितले की, पहिल्या पावसामुळे पेरणी वाया गेली. आता काढणीला आलेले पीक परतीच्या पावसाने वाहून नेले. भातशेती आडवी झाल्याने आता पिकाला कोंब येऊ लागले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने याची दखल घेऊन शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी.

पावसातून पिकलेली शेती खराब होण्याच्या काही तक्रारी विभागीय कार्यालयात आल्या आहेत. अद्यापपर्यंत सुमारे ४ शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी करणारे अर्ज दाखल केले आहेत. - संपती धारगळकर, कृषी विभागीय अधिकारी

 

टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरीfarmingशेतीState Governmentराज्य सरकार