शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

परतीच्या पावसाने भात पीक आडवे, शेतकऱ्यांवर संकट; भरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2024 07:26 IST

बळीराजाला यंदा अतिवृष्टीने हैराण केले. सतत पडलेल्या पावसामुळे सुरुवातीला शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: ऐरवी शेतात चांगले पीक यावे म्हणून पावसासाठी देवाला साकडे घालणाऱ्या बळीराजाला यंदा मात्र अतिवृष्टीने हैराण केले. सतत पडलेल्या पावसामुळे सुरुवातीला शेतकऱ्याला भातशेतीत दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर मोठ्या कष्टाने पिकवलेले पीक काढणीला आले असता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने ते आडवे झाले. आता शेतात आडवे झालेल्या भाताला पुन्हा कोंब येऊ लागले आहेत. त्यामुळे यंदा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

यंदाच्या हंगामात पावसाला सुरुवात झाल्यापासून आनंदित झालेल्या शेतकऱ्याने लागवड लवकर पूर्ण व्हावी यावर भर दिला. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्याने पेरणी केलेले बियाणे वाहून गेल्याने दुबार पेरणी पुन्हा करणे भाग पडले. तर, काही शेतकऱ्यांनी केलेली लागवड पाण्याखाली गेल्याने झालेल्या परिणामातून पुन्हा लागवड करावी लागली.

दुबार केलेल्या लागवडीतून सतत बऱ्याच शेतात चांगले पीक आले होते. त्यामुळे तो आनंदित झालेला. काही शेती पिकण्याच्या मार्गावर असल्याने त्यांनी कापणीची तयारी सुरू केली होती. पण, परतीच्या पावसाने धडाका लावल्याने काढणीला आलेली शेती आडवी झाली आहे. शेतात पाणी साचून त्यातच भाताचे पीक आडवे झाल्याने त्याला कोंब येऊ लागले आहेत. बार्देश तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

राज्यात पावसाने संपूर्ण हंगामात मुसळधार हजेरी लावली. पेरणीच्यावेळी पावसाने शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. मात्र, त्यानंतर जोर वाढल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी करून मोठ्या कष्टाने आलेले पीक परतीच्या पावसाने वाहून नेल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. नानोडा येथील शेतकरी कृष्णा गावस, गुरु गावस यांच्यासह गावातील १० हून अधिक शेतकऱ्यांच्या भात पिकाचे नुकसान झाले आहे.

डोळ्यादेखत पीक गेले 

कृषी विभागीय कार्यालयातून पिकलेल्या शेतींची कापणी व्हावी यासाठी कापणी यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. पण, पडणाऱ्या पावसामुळे भात कापणी करणे शक्य होत नसल्याने तसेच ओल्या शेत जमिनीतून मशीनचा वापर करणे अडचणीचे ठरत असल्याने परिणामात भर पडली आहे. तसेच हळदोणा, मयडे, शिवोली, सुकूर सारख्या भागातील शेती खराब होऊन त्यांना कोंब फुटू लागले आहेत.

नुकसान भरपाई द्या...

नास्नोळा फार्मर्स क्लबचे अध्यक्ष विठ्ठल नाईक यांनी सांगितले की, पहिल्या पावसामुळे पेरणी वाया गेली. आता काढणीला आलेले पीक परतीच्या पावसाने वाहून नेले. भातशेती आडवी झाल्याने आता पिकाला कोंब येऊ लागले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने याची दखल घेऊन शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी.

पावसातून पिकलेली शेती खराब होण्याच्या काही तक्रारी विभागीय कार्यालयात आल्या आहेत. अद्यापपर्यंत सुमारे ४ शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी करणारे अर्ज दाखल केले आहेत. - संपती धारगळकर, कृषी विभागीय अधिकारी

 

टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरीfarmingशेतीState Governmentराज्य सरकार