शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

परतीच्या पावसाने भात पीक आडवे, शेतकऱ्यांवर संकट; भरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2024 07:26 IST

बळीराजाला यंदा अतिवृष्टीने हैराण केले. सतत पडलेल्या पावसामुळे सुरुवातीला शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: ऐरवी शेतात चांगले पीक यावे म्हणून पावसासाठी देवाला साकडे घालणाऱ्या बळीराजाला यंदा मात्र अतिवृष्टीने हैराण केले. सतत पडलेल्या पावसामुळे सुरुवातीला शेतकऱ्याला भातशेतीत दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर मोठ्या कष्टाने पिकवलेले पीक काढणीला आले असता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने ते आडवे झाले. आता शेतात आडवे झालेल्या भाताला पुन्हा कोंब येऊ लागले आहेत. त्यामुळे यंदा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

यंदाच्या हंगामात पावसाला सुरुवात झाल्यापासून आनंदित झालेल्या शेतकऱ्याने लागवड लवकर पूर्ण व्हावी यावर भर दिला. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्याने पेरणी केलेले बियाणे वाहून गेल्याने दुबार पेरणी पुन्हा करणे भाग पडले. तर, काही शेतकऱ्यांनी केलेली लागवड पाण्याखाली गेल्याने झालेल्या परिणामातून पुन्हा लागवड करावी लागली.

दुबार केलेल्या लागवडीतून सतत बऱ्याच शेतात चांगले पीक आले होते. त्यामुळे तो आनंदित झालेला. काही शेती पिकण्याच्या मार्गावर असल्याने त्यांनी कापणीची तयारी सुरू केली होती. पण, परतीच्या पावसाने धडाका लावल्याने काढणीला आलेली शेती आडवी झाली आहे. शेतात पाणी साचून त्यातच भाताचे पीक आडवे झाल्याने त्याला कोंब येऊ लागले आहेत. बार्देश तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

राज्यात पावसाने संपूर्ण हंगामात मुसळधार हजेरी लावली. पेरणीच्यावेळी पावसाने शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. मात्र, त्यानंतर जोर वाढल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी करून मोठ्या कष्टाने आलेले पीक परतीच्या पावसाने वाहून नेल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. नानोडा येथील शेतकरी कृष्णा गावस, गुरु गावस यांच्यासह गावातील १० हून अधिक शेतकऱ्यांच्या भात पिकाचे नुकसान झाले आहे.

डोळ्यादेखत पीक गेले 

कृषी विभागीय कार्यालयातून पिकलेल्या शेतींची कापणी व्हावी यासाठी कापणी यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. पण, पडणाऱ्या पावसामुळे भात कापणी करणे शक्य होत नसल्याने तसेच ओल्या शेत जमिनीतून मशीनचा वापर करणे अडचणीचे ठरत असल्याने परिणामात भर पडली आहे. तसेच हळदोणा, मयडे, शिवोली, सुकूर सारख्या भागातील शेती खराब होऊन त्यांना कोंब फुटू लागले आहेत.

नुकसान भरपाई द्या...

नास्नोळा फार्मर्स क्लबचे अध्यक्ष विठ्ठल नाईक यांनी सांगितले की, पहिल्या पावसामुळे पेरणी वाया गेली. आता काढणीला आलेले पीक परतीच्या पावसाने वाहून नेले. भातशेती आडवी झाल्याने आता पिकाला कोंब येऊ लागले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने याची दखल घेऊन शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी.

पावसातून पिकलेली शेती खराब होण्याच्या काही तक्रारी विभागीय कार्यालयात आल्या आहेत. अद्यापपर्यंत सुमारे ४ शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी करणारे अर्ज दाखल केले आहेत. - संपती धारगळकर, कृषी विभागीय अधिकारी

 

टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरीfarmingशेतीState Governmentराज्य सरकार