शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

परतीच्या पावसाने भात पीक आडवे, शेतकऱ्यांवर संकट; भरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2024 07:26 IST

बळीराजाला यंदा अतिवृष्टीने हैराण केले. सतत पडलेल्या पावसामुळे सुरुवातीला शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: ऐरवी शेतात चांगले पीक यावे म्हणून पावसासाठी देवाला साकडे घालणाऱ्या बळीराजाला यंदा मात्र अतिवृष्टीने हैराण केले. सतत पडलेल्या पावसामुळे सुरुवातीला शेतकऱ्याला भातशेतीत दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर मोठ्या कष्टाने पिकवलेले पीक काढणीला आले असता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने ते आडवे झाले. आता शेतात आडवे झालेल्या भाताला पुन्हा कोंब येऊ लागले आहेत. त्यामुळे यंदा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

यंदाच्या हंगामात पावसाला सुरुवात झाल्यापासून आनंदित झालेल्या शेतकऱ्याने लागवड लवकर पूर्ण व्हावी यावर भर दिला. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्याने पेरणी केलेले बियाणे वाहून गेल्याने दुबार पेरणी पुन्हा करणे भाग पडले. तर, काही शेतकऱ्यांनी केलेली लागवड पाण्याखाली गेल्याने झालेल्या परिणामातून पुन्हा लागवड करावी लागली.

दुबार केलेल्या लागवडीतून सतत बऱ्याच शेतात चांगले पीक आले होते. त्यामुळे तो आनंदित झालेला. काही शेती पिकण्याच्या मार्गावर असल्याने त्यांनी कापणीची तयारी सुरू केली होती. पण, परतीच्या पावसाने धडाका लावल्याने काढणीला आलेली शेती आडवी झाली आहे. शेतात पाणी साचून त्यातच भाताचे पीक आडवे झाल्याने त्याला कोंब येऊ लागले आहेत. बार्देश तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

राज्यात पावसाने संपूर्ण हंगामात मुसळधार हजेरी लावली. पेरणीच्यावेळी पावसाने शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. मात्र, त्यानंतर जोर वाढल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी करून मोठ्या कष्टाने आलेले पीक परतीच्या पावसाने वाहून नेल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. नानोडा येथील शेतकरी कृष्णा गावस, गुरु गावस यांच्यासह गावातील १० हून अधिक शेतकऱ्यांच्या भात पिकाचे नुकसान झाले आहे.

डोळ्यादेखत पीक गेले 

कृषी विभागीय कार्यालयातून पिकलेल्या शेतींची कापणी व्हावी यासाठी कापणी यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. पण, पडणाऱ्या पावसामुळे भात कापणी करणे शक्य होत नसल्याने तसेच ओल्या शेत जमिनीतून मशीनचा वापर करणे अडचणीचे ठरत असल्याने परिणामात भर पडली आहे. तसेच हळदोणा, मयडे, शिवोली, सुकूर सारख्या भागातील शेती खराब होऊन त्यांना कोंब फुटू लागले आहेत.

नुकसान भरपाई द्या...

नास्नोळा फार्मर्स क्लबचे अध्यक्ष विठ्ठल नाईक यांनी सांगितले की, पहिल्या पावसामुळे पेरणी वाया गेली. आता काढणीला आलेले पीक परतीच्या पावसाने वाहून नेले. भातशेती आडवी झाल्याने आता पिकाला कोंब येऊ लागले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने याची दखल घेऊन शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी.

पावसातून पिकलेली शेती खराब होण्याच्या काही तक्रारी विभागीय कार्यालयात आल्या आहेत. अद्यापपर्यंत सुमारे ४ शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी करणारे अर्ज दाखल केले आहेत. - संपती धारगळकर, कृषी विभागीय अधिकारी

 

टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरीfarmingशेतीState Governmentराज्य सरकार