शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या अपात्रता याचिकेवर तीन महिन्यांत निकाल द्या, सभापतींना काँग्रेसची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 17:41 IST

काँग्रेसचे जे दहा आमदार गेल्यावर्षी भाजपमध्ये गेले, त्यांच्याविरुद्ध सादर झालेल्या अपात्रता याचिकेवर तीन महिन्यांत निवाडा दिला जावा, अशी विनंती काँग्रेस पक्षाने आपल्या वकिलाद्वारे गुरुवारी सभापतींना केली आहे.

पणजी - काँग्रेसचे जे दहा आमदार गेल्यावर्षी भाजपमध्ये गेले, त्यांच्याविरुद्ध सादर झालेल्या अपात्रता याचिकेवर तीन महिन्यांत निवाडा दिला जावा, अशी विनंती काँग्रेस पक्षाने आपल्या वकिलाद्वारे गुरुवारी सभापतींना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निवाडय़ाद्वारे सभापतींना तीन महिन्यांत निवाडा देणे बंधनकारक झाले आहे, असा मुद्दा वकिलानी सभापतींसमोर मांडला आहे.बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेसचे दहा आमदार गेल्यावर्षी काँग्रेसमधून बाहेर पडले व त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या दहाजणांनी आमदारकीचे राजीनामे दिले नाहीत. आता दहापैकी काहीजण विद्यमान सरकारमध्ये मंत्री आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांच्याविरुद्ध अपात्रता याचिका सादर केलेली आहे. या याचिकेवर अजून सुनावणी सुरू आहे.गुरुवारी सुनावणी पार पडली. त्यावेळी दहा आमदारांच्या वकिलाने आपले उत्तर सादर करण्यासाठी वेळ दिला जावा अशी विनंती सभापतींना केली. काँग्रेसतर्फे वकील अभिजित गोसावी यांनी बाजू मांडली. केशाम मेघचंद्र सिंग विरुद्ध मणिपूर विधानसभेचे सभापती यांच्याविषयीच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 21 जानेवारी रोजी निवाडा दिला आहे. शक्य तो तीन महिन्यांत सभापतींनी अपात्रता याचिका निकालात काढायला हवी अशा प्रकारचा तो निवाडा आहे. त्याचा संदर्भ अॅड. गोसावी यांनी सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर ठेवला व काँग्रेसची याचिका सादर झाल्यानंतर आतार्पयत तीन महिने होऊन गेले तरी, न्यायालयीन निवाड्यानंतरचे तीन महिने आता विचारात घेऊन निवाडा दिला जावा अशी विनंती केली. दहा आमदारांना त्यांचे म्हणणो सादर करण्यासाठी वेळ देतानाच एकूण तीन महिन्यांची मुदत टळून जाणार नाही याची काळजी घेऊन त्यानुसार सुनावणीचे व्यवस्थापन केले जावे, अशी विनंती त्यांनी केली. आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ाची नोंद घेईन, असे सभापतींनी काँग्रेसच्या वकिलास सांगितले. त्यांनी प्रतिवादींना म्हणणे सादर करण्यास चार आठवडय़ांची मुदत दिली आहे. पण पुढील सुनावणी कोणत्या दिवशी घ्यावी ते अजून निश्चित झालेले नाही.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा