शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

विरोधकांवर आरक्षणास्त्र

By admin | Updated: January 24, 2015 01:53 IST

जिल्हा पंचायत निवडणूक : २५ मतदारसंघांमध्ये ओबीसी, एसटींसाठी ८, तर महिलांसाठी १७

पणजी : जिल्हा पंचायतींसाठी एका बाजूने निधी नाही व दुसऱ्या बाजूने अधिकारही नाहीत, अशी स्थिती असताना जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत या वेळी मोठी चुरस निर्माण झाली आहे. तशातच सरकार पक्षाने विरोधकांवर आरक्षणास्त्र उगारले असून आरक्षणाच्या माध्यमातून विरोधकांची आणखी राजकीय कोंडी केली जाणार आहे. जिल्हा पंचायतीचे या वेळी कोणते २५ मतदारसंघ नेमके कशा प्रकारे आरक्षित केले जातात, हे अधिसूचना जारी झाल्यानंतरच कळून येणार आहे. दोन्ही जिल्हा पंचायतींचे मिळून एकूण ५0 पैकी २५ मतदारसंघ हे विविध घटकांसाठी आरक्षित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजून आरक्षणाबाबतची अधिसूचना जारी झालेली नाही; पण महिलांसाठी १७ व ओबीसी आणि अनुसूचित जमातींसाठी (एसटी) प्रत्येकी चार मतदारसंघ आरक्षित होणार आहेत. मतदारसंघ फेररचना करताना प्रत्येक मतदारसंघ हा सरासरी १७ ते १८ हजार मतदारांचा करण्यात आला आहे. मतदारसंघांचे आरक्षण कसे करावे, हे ढोबळमानाने ठरले आहे. जिल्हा पंचायतीचे विद्यमान सदस्य तसेच काही आजी-माजी आमदारांना याची कल्पना आली आहे. कळंगुट येथे झालेल्या भाजपच्या दोन दिवसांच्या चिंतन बैठकीवेळी जिल्हा पंचायत निवडणुकांबाबतच जास्त चर्चा झाली होती व त्या वेळीच राजकीयदृष्ट्या कुणाचा पत्ता कसा कापावा, हे ठरले होते. मगोशी युती न करता स्वबळावर भाजपने जिल्हा पंचायत निवडणुका लढवाव्यात, हेही त्या वेळीच ठरले आहे. मतदारसंघ फेररचना व आरक्षणाला न्यायालयीन आव्हान देण्यास वेळ मिळू नये म्हणून ऐनवेळी अधिसूचना जारी केल्या जातील, असे अनेकांना वाटते. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक १५ मार्च रोजी घेण्याची तयारी ठेवली आहे; पण पंचायत खाते जोपर्यंत अधिसूचना जारी करत नाही व पक्षीय पातळीवर निवडणुका घेण्यासाठी सरकार जोपर्यंत कायदा दुरुस्त करत नाही, तोपर्यंत आयोग काहीही करू शकणार नाही. दोन्ही जिल्हा पंचायत क्षेत्रांत मिळून सुमारे साडेसात लाख मतदार आहेत. २०१० साली झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी सांताक्रुझ, कुंभारजुवे, नगरगाव, शिरोडा, दवर्ली व बाळ्ळी हे मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी आरक्षित होते. ओबीसी महिलांसाठी त्या वेळी धारगळ, हळदोणा, चोडण, मये, सांकवाळ, धारबांदोडा हे मतदारसंघ आरक्षित होते. बाळ्ळी व दवर्ली हे एसटी महिलांसाठी आरक्षित होते. ओबीसींसाठी (पुरुष व महिला) रेईश मागूश, तिवरे, वेळ्ळी, शेल्डे हे मतदारसंघ आरक्षित करण्यात आले होते. विविध समाजघटकांतील महिलांसाठी मांद्रे, धारगळ, थिवी, हळदोणा, चिंबल, चोडण, लाटंबार्से, मये, कुर्टी, धारबांदोडा, सांकवाळ, दवर्ली, कुडतरी, गिरदोली, चिंचिणी, धारबांदोडा, बाळ्ळी हे मतदारसंघ आरक्षित होते. आता आरक्षण बदलणार आहे. ते नेमके कशा प्रकारे बदलले गेले आहे, ते प्रत्यक्ष अधिसूचना जारी होईल, तेव्हाच स्पष्ट होणार आहे. (खास प्रतिनिधी)