शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

विरोधकांवर आरक्षणास्त्र

By admin | Updated: January 24, 2015 01:53 IST

जिल्हा पंचायत निवडणूक : २५ मतदारसंघांमध्ये ओबीसी, एसटींसाठी ८, तर महिलांसाठी १७

पणजी : जिल्हा पंचायतींसाठी एका बाजूने निधी नाही व दुसऱ्या बाजूने अधिकारही नाहीत, अशी स्थिती असताना जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत या वेळी मोठी चुरस निर्माण झाली आहे. तशातच सरकार पक्षाने विरोधकांवर आरक्षणास्त्र उगारले असून आरक्षणाच्या माध्यमातून विरोधकांची आणखी राजकीय कोंडी केली जाणार आहे. जिल्हा पंचायतीचे या वेळी कोणते २५ मतदारसंघ नेमके कशा प्रकारे आरक्षित केले जातात, हे अधिसूचना जारी झाल्यानंतरच कळून येणार आहे. दोन्ही जिल्हा पंचायतींचे मिळून एकूण ५0 पैकी २५ मतदारसंघ हे विविध घटकांसाठी आरक्षित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजून आरक्षणाबाबतची अधिसूचना जारी झालेली नाही; पण महिलांसाठी १७ व ओबीसी आणि अनुसूचित जमातींसाठी (एसटी) प्रत्येकी चार मतदारसंघ आरक्षित होणार आहेत. मतदारसंघ फेररचना करताना प्रत्येक मतदारसंघ हा सरासरी १७ ते १८ हजार मतदारांचा करण्यात आला आहे. मतदारसंघांचे आरक्षण कसे करावे, हे ढोबळमानाने ठरले आहे. जिल्हा पंचायतीचे विद्यमान सदस्य तसेच काही आजी-माजी आमदारांना याची कल्पना आली आहे. कळंगुट येथे झालेल्या भाजपच्या दोन दिवसांच्या चिंतन बैठकीवेळी जिल्हा पंचायत निवडणुकांबाबतच जास्त चर्चा झाली होती व त्या वेळीच राजकीयदृष्ट्या कुणाचा पत्ता कसा कापावा, हे ठरले होते. मगोशी युती न करता स्वबळावर भाजपने जिल्हा पंचायत निवडणुका लढवाव्यात, हेही त्या वेळीच ठरले आहे. मतदारसंघ फेररचना व आरक्षणाला न्यायालयीन आव्हान देण्यास वेळ मिळू नये म्हणून ऐनवेळी अधिसूचना जारी केल्या जातील, असे अनेकांना वाटते. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक १५ मार्च रोजी घेण्याची तयारी ठेवली आहे; पण पंचायत खाते जोपर्यंत अधिसूचना जारी करत नाही व पक्षीय पातळीवर निवडणुका घेण्यासाठी सरकार जोपर्यंत कायदा दुरुस्त करत नाही, तोपर्यंत आयोग काहीही करू शकणार नाही. दोन्ही जिल्हा पंचायत क्षेत्रांत मिळून सुमारे साडेसात लाख मतदार आहेत. २०१० साली झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी सांताक्रुझ, कुंभारजुवे, नगरगाव, शिरोडा, दवर्ली व बाळ्ळी हे मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी आरक्षित होते. ओबीसी महिलांसाठी त्या वेळी धारगळ, हळदोणा, चोडण, मये, सांकवाळ, धारबांदोडा हे मतदारसंघ आरक्षित होते. बाळ्ळी व दवर्ली हे एसटी महिलांसाठी आरक्षित होते. ओबीसींसाठी (पुरुष व महिला) रेईश मागूश, तिवरे, वेळ्ळी, शेल्डे हे मतदारसंघ आरक्षित करण्यात आले होते. विविध समाजघटकांतील महिलांसाठी मांद्रे, धारगळ, थिवी, हळदोणा, चिंबल, चोडण, लाटंबार्से, मये, कुर्टी, धारबांदोडा, सांकवाळ, दवर्ली, कुडतरी, गिरदोली, चिंचिणी, धारबांदोडा, बाळ्ळी हे मतदारसंघ आरक्षित होते. आता आरक्षण बदलणार आहे. ते नेमके कशा प्रकारे बदलले गेले आहे, ते प्रत्यक्ष अधिसूचना जारी होईल, तेव्हाच स्पष्ट होणार आहे. (खास प्रतिनिधी)