शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

विरोधकांवर आरक्षणास्त्र

By admin | Updated: January 24, 2015 01:53 IST

जिल्हा पंचायत निवडणूक : २५ मतदारसंघांमध्ये ओबीसी, एसटींसाठी ८, तर महिलांसाठी १७

पणजी : जिल्हा पंचायतींसाठी एका बाजूने निधी नाही व दुसऱ्या बाजूने अधिकारही नाहीत, अशी स्थिती असताना जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत या वेळी मोठी चुरस निर्माण झाली आहे. तशातच सरकार पक्षाने विरोधकांवर आरक्षणास्त्र उगारले असून आरक्षणाच्या माध्यमातून विरोधकांची आणखी राजकीय कोंडी केली जाणार आहे. जिल्हा पंचायतीचे या वेळी कोणते २५ मतदारसंघ नेमके कशा प्रकारे आरक्षित केले जातात, हे अधिसूचना जारी झाल्यानंतरच कळून येणार आहे. दोन्ही जिल्हा पंचायतींचे मिळून एकूण ५0 पैकी २५ मतदारसंघ हे विविध घटकांसाठी आरक्षित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजून आरक्षणाबाबतची अधिसूचना जारी झालेली नाही; पण महिलांसाठी १७ व ओबीसी आणि अनुसूचित जमातींसाठी (एसटी) प्रत्येकी चार मतदारसंघ आरक्षित होणार आहेत. मतदारसंघ फेररचना करताना प्रत्येक मतदारसंघ हा सरासरी १७ ते १८ हजार मतदारांचा करण्यात आला आहे. मतदारसंघांचे आरक्षण कसे करावे, हे ढोबळमानाने ठरले आहे. जिल्हा पंचायतीचे विद्यमान सदस्य तसेच काही आजी-माजी आमदारांना याची कल्पना आली आहे. कळंगुट येथे झालेल्या भाजपच्या दोन दिवसांच्या चिंतन बैठकीवेळी जिल्हा पंचायत निवडणुकांबाबतच जास्त चर्चा झाली होती व त्या वेळीच राजकीयदृष्ट्या कुणाचा पत्ता कसा कापावा, हे ठरले होते. मगोशी युती न करता स्वबळावर भाजपने जिल्हा पंचायत निवडणुका लढवाव्यात, हेही त्या वेळीच ठरले आहे. मतदारसंघ फेररचना व आरक्षणाला न्यायालयीन आव्हान देण्यास वेळ मिळू नये म्हणून ऐनवेळी अधिसूचना जारी केल्या जातील, असे अनेकांना वाटते. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक १५ मार्च रोजी घेण्याची तयारी ठेवली आहे; पण पंचायत खाते जोपर्यंत अधिसूचना जारी करत नाही व पक्षीय पातळीवर निवडणुका घेण्यासाठी सरकार जोपर्यंत कायदा दुरुस्त करत नाही, तोपर्यंत आयोग काहीही करू शकणार नाही. दोन्ही जिल्हा पंचायत क्षेत्रांत मिळून सुमारे साडेसात लाख मतदार आहेत. २०१० साली झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी सांताक्रुझ, कुंभारजुवे, नगरगाव, शिरोडा, दवर्ली व बाळ्ळी हे मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी आरक्षित होते. ओबीसी महिलांसाठी त्या वेळी धारगळ, हळदोणा, चोडण, मये, सांकवाळ, धारबांदोडा हे मतदारसंघ आरक्षित होते. बाळ्ळी व दवर्ली हे एसटी महिलांसाठी आरक्षित होते. ओबीसींसाठी (पुरुष व महिला) रेईश मागूश, तिवरे, वेळ्ळी, शेल्डे हे मतदारसंघ आरक्षित करण्यात आले होते. विविध समाजघटकांतील महिलांसाठी मांद्रे, धारगळ, थिवी, हळदोणा, चिंबल, चोडण, लाटंबार्से, मये, कुर्टी, धारबांदोडा, सांकवाळ, दवर्ली, कुडतरी, गिरदोली, चिंचिणी, धारबांदोडा, बाळ्ळी हे मतदारसंघ आरक्षित होते. आता आरक्षण बदलणार आहे. ते नेमके कशा प्रकारे बदलले गेले आहे, ते प्रत्यक्ष अधिसूचना जारी होईल, तेव्हाच स्पष्ट होणार आहे. (खास प्रतिनिधी)