शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

प्रादेशिक पक्षांनी विचारधारा स्पष्ट करावी: माणिकराव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 08:26 IST

'इंडिया' आघाडीच्या बाबतीत गोवा फॉरवर्डला उद्देशून टोला

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यातील प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसच्या विचारधारेने चालणार की भाजपच्या याबाबत आधी आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतरच 'इंडिया' आघाडीत समावेशाबद्दल बोलता येईल, असे काँग्रेसचेगोवा प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले.

पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. आरजीने उमेदवार जाहीर केले आहेत, परंतु गोवा फॉरवर्डची भूमिका अजून स्पष्ट नाही. त्यामुळे ठाकरे यांनी हे विधान फॉरवर्डला उद्देशूनच केल्याचा अर्थ निघतो.

ठाकरे म्हणाले की, 'इंडिया आघाडीतील राष्ट्रीय पक्ष ठरले आहेत. प्रादेशिक पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल.'आम आदमी पक्ष दक्षिण गोव्यात तिकीट मागत असल्याने त्याबद्दल विचारले असता असा कोणताही प्रस्ताव अजून माझ्याकडे तरी त्या पक्षाकडून आलेला नाही. आरजीने उमेदवार जाहीर केल्याने त्याबद्दल विचारले असता त्या पक्षाला किती महत्त्व द्यायचे हा प्रश्न आहे.

राज्यात काँग्रेससाठी लोकसभेसाठी चांगली स्थिती असल्याचे नमूद करून ते म्हणाले की, 'मला विश्वास आहे की आम्ही पक्ष संघटना आणखी मजबूत करू. मी पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्याही बैठका घेतल्या. आमच्याकडे चांगले केडर आणि नेते आहेत. आम्ही उत्साहाने पुढे जाऊ आणि निवडणुका जिंकू.'

डबल इंजिनचे सरकार भ्रष्टाचारात गुंतले असून, सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारचे अपयश लोकांपर्यंत पोहोचवू बरोबर काय आणि चुकीचे काय हे लोकांना पटवून देऊ. भाजप लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे हे लोकांना माहीत आहे.

'त्यांना' जनताच धडा शिकवेल

आमदारांच्या पक्षांतराबद्दल बोलताना ते म्हणाले की, याचा अर्थ असा नाही की जेव्हा नेते पक्षांतर करतात, तेव्हा निष्ठावंत समर्थकदेखील बदलतात. आम्ही कार्यकर्त्यांशी, लोकांशी बोललो आणि त्यांना माहीत आहे की पक्षांतर लोकशाहीला कसे हानी पोहोचवत आहे. पक्षांतर करणाऱ्यांना धडा शिकवतील. तेलंगणातही लोकांनी हे दाखवून दिले आहे.' ठाकरे म्हणाले की, भाजप धर्मावरून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे राहुल गांधींनी 'भारत जोडो यात्रा' काढली. "आता आम्ही मणिपूरमधून सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी 'न्याय यात्रा' सुरू करणार आहोत.

अपात्रता प्रकरणी राजकीय निर्णय

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असा जो निवाडा अपात्रता याचिका निकालात काढताना दिला आहे त्याबद्दल विचारले असता ठाकरे म्हणाले की, 'या अपात्रता याचिकांच्या बाबतीत राजकीय निर्णय होणार. न्याय मिळणार नाही, हे सर्वानाच ठावुक होते. या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे गट घेईल.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManikrao Thakareमाणिकराव ठाकरेManikrao Thackreyमाणिकराव ठाकरे