शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

व्याघ्रक्षेत्र आदेश स्थगितीला नकार; सर्वोच्च न्यायालयाने केंद्रासह गोवा फाउंडेशनला दिली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 12:35 IST

राज्य सरकार राखीव व्याघ्रक्षेत्र अधिसूचित करण्यास राजी नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: राखीव व्याघ्रक्षेत्र प्रकरणी हायकोर्टाने दिलेल्या आदेशास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. गोवा सरकारने सादर केलेली आव्हान याचिका कामकाजात दाखल करून घेताना प्रतिवादी केंद्र सरकार व गोवा फाउंडेशन संघटनेला कोर्टाने नोटीस बजावल्या आहेत. म्हादई अभयारण्य तीन महिन्यांच्या आत राखीव व्याघ्रक्षेत्र म्हणून अधिसूचित करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गेल्या २४ जुलै रोजी दिला होता. राज्य सरकार राखीव व्याघ्रक्षेत्र अधिसूचित करण्यास राजी नाही.

वाळपईचे आमदार वनमंत्री विश्वजित राणे तसेच त्यांची पत्नी पर्येच्या आमदार दिव्या राणे यांचा राखीव व्याघ्रक्षेत्र अधिसूचित करण्यास विरोध आहे. अनेक निर्बंध येतील, त्यामुळे लोकांना मुक्तपणे वावरता येणार नाही. अभयारण्यातील लोकांचे पुनर्वसन करावे लागेल. एवढी जमीनही उपलब्ध नाही, असे या दोघांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे म्हादई राखीव व्याघ्रक्षेत्र अधिसूचित झाल्यास कर्नाटकला म्हादईवर कोणतेच बांधकाम करता येणार नाही. गोव्याची जीवनदायनी म्हादई नदी यामुळे वाचेल, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिकेवर गोव्याच्या वतीने नामांकित वकील अॅड. मुकुल रोहतगी यांनी तर गोवा फाउंडेशनच्या वतीने अॅड. इंदिरा जयसिंग यांनी बाजू मांडली.

सरकार म्हणतेय....

अभयारण्याची अंतिम अधिसूचना काढण्याआधी व्याघ्र प्रकल्प अधिसूचित करणे बेकायदा ठरेल. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम २६ (अ) नुसार अभयारण्याची अंतिम अधिसूचना काढणे आवश्यक आहे. अभयारण्यात निवास करणाऱ्यांचे वन हक्क दावे निकालात काढलेले नाहीत. हे कामही बाकी आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे कलम ३८ (व्ही) गोव्यासाठी अनिवार्य नाही, आदी युक्तिवाद सुनावणीवेळी करण्याची तयारी राज्य सरकारने ठेवली आहे. 

टॅग्स :goaगोवाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयState Governmentराज्य सरकारHigh Courtउच्च न्यायालय