शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाच्या दिवसांत कपात; विरोधकांचे सरकारवर जोरदार टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 13:22 IST

२१ जुलै ते ८ ऑगस्टपर्यंतच चालणार विधानसभा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १८ दिवसांवरून १५ दिवस केल्यामुळे विरोधी आमदारांनी सरकारांवर जोरदार टीका केली आहे. सरकारचा कारभार सभागृहात उघडा पडेल याच भीतीने अधिवेशनाचे तीन दिवस कमी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आता २१ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन होणार आहे.

तीन दिवस कमी करून सरकारने त्यासाठी अधिसूचनाही जारी केली आहे. मागील पावसाळी अधिवेशन हे १८ दिवसांचे घेण्यात आले होते. त्यावेळीही विरोधकांकडून दिवस कमी केल्याची टीका करण्यात आली होती. आता केवळ १५ दिवसांचेच अधिवेशन बोलविल्यामुळे विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही केली जात आहे.

भाजप सरकारने पावसाळी अधिवेशन फक्त १५ दिवसांचे करुन राज्यातील लोकांचे ज्वलंत विषय दाबण्याचा प्रयत्न केला आहे. या सरकारला विरोधकांना सामोरे जायचे नाही आहे. म्हणून अधिवेशनाचा काळ कमी केला आहे. राज्यात अनेक विषय गाजत आहेत. लोकांनी आम्हाला आपले विविध विषय अधिवेशनात मांडायला दिले आहेत. पण आता अधिवेशन १५ दिवसांचे असल्याने सर्व विषय मांडता येणार नाहीत. भाजप सरकार विरोधकांना घाबरत असल्याने त्यांनी तीन दिवस कपात केल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

सरकारकडून जबाबदारी झटकण्याचे काम

अधिवेशनाचे दिवस कमी केले तरी सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही. सरकारचे सर्व गैरकारभार सभागृहात गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई उघडे पाडतील. लोकांच्या ज्वलंत प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले जाईल, असे गोवा फॉरवर्डचे महासचिव दुर्गादास कामत यांनी म्हटले आहे.

सरकारमध्ये धाडस नाही : युरी

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, प्रत्येकवेळी सरकारकडून पावसाळी अधिवेशनाचे दिवस कमी केले जात आहेत. स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी आणि अकार्यक्षमता लपविण्यासाठी सरकारकडून हे केले जात आहे. राज्याची ढासळलेली आर्थिक स्थिती, वाढलेली बेरोजगारी या मुद्द्यावरून सभागृहात घेरले जाऊ याची कल्पना असल्यामुळेच कमीत कमी दिवसात अधिवेशन आटोपते घेण्याचा सरकारचा हा बेत आहे असे ते म्हणाले.

मनमानी कारभार : वीरेश

विरोधकाना सभागृहात बोलायला कमी दिवस मिळावेत आणि कमी वेळ मिळावा हाच दिवस कपात करण्यामागचा हेतू आहे. अजून सभागृह कामकाज समितीची बैठकही झालेली नाही. त्यामुळे अधिवेशनाचे स्वरूप कसे काय असणार? या बद्दल कुणाला काहीही ठावूक नाही. हे सरकार सर्वानाबरोबर घेऊन जाण्याची भाषा करते. परंतु प्रत्यक्षात आपल्याला हवे तेच केले जाते, असा टोला आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी लगावला.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार