शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

अधिवेशनाच्या दिवसांत कपात; विरोधकांचे सरकारवर जोरदार टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 13:22 IST

२१ जुलै ते ८ ऑगस्टपर्यंतच चालणार विधानसभा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १८ दिवसांवरून १५ दिवस केल्यामुळे विरोधी आमदारांनी सरकारांवर जोरदार टीका केली आहे. सरकारचा कारभार सभागृहात उघडा पडेल याच भीतीने अधिवेशनाचे तीन दिवस कमी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आता २१ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन होणार आहे.

तीन दिवस कमी करून सरकारने त्यासाठी अधिसूचनाही जारी केली आहे. मागील पावसाळी अधिवेशन हे १८ दिवसांचे घेण्यात आले होते. त्यावेळीही विरोधकांकडून दिवस कमी केल्याची टीका करण्यात आली होती. आता केवळ १५ दिवसांचेच अधिवेशन बोलविल्यामुळे विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही केली जात आहे.

भाजप सरकारने पावसाळी अधिवेशन फक्त १५ दिवसांचे करुन राज्यातील लोकांचे ज्वलंत विषय दाबण्याचा प्रयत्न केला आहे. या सरकारला विरोधकांना सामोरे जायचे नाही आहे. म्हणून अधिवेशनाचा काळ कमी केला आहे. राज्यात अनेक विषय गाजत आहेत. लोकांनी आम्हाला आपले विविध विषय अधिवेशनात मांडायला दिले आहेत. पण आता अधिवेशन १५ दिवसांचे असल्याने सर्व विषय मांडता येणार नाहीत. भाजप सरकार विरोधकांना घाबरत असल्याने त्यांनी तीन दिवस कपात केल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

सरकारकडून जबाबदारी झटकण्याचे काम

अधिवेशनाचे दिवस कमी केले तरी सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही. सरकारचे सर्व गैरकारभार सभागृहात गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई उघडे पाडतील. लोकांच्या ज्वलंत प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले जाईल, असे गोवा फॉरवर्डचे महासचिव दुर्गादास कामत यांनी म्हटले आहे.

सरकारमध्ये धाडस नाही : युरी

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, प्रत्येकवेळी सरकारकडून पावसाळी अधिवेशनाचे दिवस कमी केले जात आहेत. स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी आणि अकार्यक्षमता लपविण्यासाठी सरकारकडून हे केले जात आहे. राज्याची ढासळलेली आर्थिक स्थिती, वाढलेली बेरोजगारी या मुद्द्यावरून सभागृहात घेरले जाऊ याची कल्पना असल्यामुळेच कमीत कमी दिवसात अधिवेशन आटोपते घेण्याचा सरकारचा हा बेत आहे असे ते म्हणाले.

मनमानी कारभार : वीरेश

विरोधकाना सभागृहात बोलायला कमी दिवस मिळावेत आणि कमी वेळ मिळावा हाच दिवस कपात करण्यामागचा हेतू आहे. अजून सभागृह कामकाज समितीची बैठकही झालेली नाही. त्यामुळे अधिवेशनाचे स्वरूप कसे काय असणार? या बद्दल कुणाला काहीही ठावूक नाही. हे सरकार सर्वानाबरोबर घेऊन जाण्याची भाषा करते. परंतु प्रत्यक्षात आपल्याला हवे तेच केले जाते, असा टोला आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी लगावला.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार