शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

साखळी नगराध्यक्षपदासाठी रश्मी देसाई प्रमुख दावेदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 14:48 IST

मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने होणार निर्णय : उपनगराध्यक्षपदासाठी चुरस

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: भाजपने साखळी पालिकेत बारापैकी अकरा जागा जिंकत मोठे यश संपादन केले आहे. आता नगराध्यक्षपदासाठीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. 'टूगेदर फॉर साखळी'चे नेते धर्मश सागलानी यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेल्या, ज्येष्ठ नगरसेविका रश्मी देसाई या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. तर उपनगराध्यक्ष पदाबाबतही उत्सुकता आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री प्रमोद सावंत कर्नाटकात प्रचारात व्यस्त आहेत. मंगळवारी ते गोव्यात परतणार आहेत. त्यानंतर भाजप नेते व नगरसेवकांची संयुक्त बैठक घेऊन नावांची निश्चिती होणार आहे. नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे.

भाजपमधून सहा महिला निवडून आल्या असून पहिला मान कुणाला याची उत्सुकता आहे. रश्मी देसाई या पहिल्या मानकरी ठरतील, अशी शक्यता आहे. देसाई यांनी प्रभाग चारमधून माजी नगराध्यक्ष व टूगेदर फॉर साखळीचे नेते धर्मेश सागलानी यांचा पराभव केला. त्यामुळे साखळीत विरोधकांची ताकद पूर्णपणे कमी झाली आहे. राजकीय समीकरणेही बदलली आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदाचा पहिला मान देसाई यांना मिळणार असल्याची चर्चा आहे.

इच्छुक जादा असल्याने हे पद रोटेशन पद्धतीनेही दिले जाऊ शकते तसे झाल्यास देसाई यांच्यानंतर सिद्धी पोरोब नीकिता नाईक, दीपा जल्मी, अंजना कामत, विनंती पार्सेकर यांना संधी मिळू शकते. मात्र, मुख्यमंत्री यासंदर्भात निर्णय घेतील. तो निर्णय सर्वांना मान्य असेल, असेही सांगण्यात आले.

उपनगराध्यक्ष पदासाठी दयानंद बोर्येकर, रियाज खान, आनंद काणेकर, यशवंत माडकर, ब्रम्हा देसाई यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. हे पदही रोटेशन पद्धतीने दिले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात नगरसेवक आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर यांना विचारले असता, त्यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीचा निर्णय मुख्यमंत्री सावंत, आमचे नगरसेवक व पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील, असे सांगितले. पालिकेवर भाजपची पूर्णपणे सत्ता आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

भाजपला यश मिळवून देण्यात सावंत यांची महत्त्वाची भूमिका आहे. पालिकेत बहुमताने सत्ता आली. आता विकासातील इतर अडथळे दूर झाले असल्याचे काणेकर, बोर्येकर, पार्सेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सांगितले.

या विकासकामांचे आव्हान

यापूर्वी साखळी शहरात अनेक विकासकामे सुरु झाली. मास्टर प्लॅनप्रमाणे उर्वरित योजना आखणे, मल:निस्सारण प्रकल्पाची पूर्तता करणे, पार्किंग सुविधा, चांगल्या क्रीडा सुविधा यासह अनेक नवे प्रकल्प राबविण्याची गरज आहे. सध्या सुरु असलेली कामे करण्यासह नव्या कामांचे नियोजन हे आव्हान नवीन पालिका मंडळासमोर असेल. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण