शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रिकाम्या सीटवर बसण्याठी धावला अन् रेल्वेतून खाली पडला; सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2024 12:21 IST

इमर्जन्सी खिडकी उघडी राहिल्याने घडली दुर्दैवी घटना, ०१ सप्टेंबर रोजी वाढदिवस केला साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: शिर्डीहून देवदर्शन करून गोव्यात परतत असताना अचानक रेल्वेच्या आपत्कालिन (इमर्जन्सी) खिडकीतून बाहेर पडलेल्या आराध्य राजेश मांद्रेकर (७) या मुलाचा लोणी-पुणे येथे उपचारावेळी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताचा त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

सविस्तर वृत्त असे की, पेड, मडगाव येथील तीन कुटुंबिय शुक्रवार, १३ रोजी शिर्डीला गेले होते. तिथे देवदर्शन घेतल्यानंतर सोमवार, १६ रोजी ते गोवा एक्सप्रेसने परतीच्या प्रवासाला निघाले. रात्री जेवणानंतर सर्वजण झोपण्याच्या तयारीत होते. आई झोपण्यासाठी बॅगेतील अंतरूण काढत असताना समोर रिकाम्या सीटवर बसण्यासाठी धावत गेलेल्या आराध्य अचानक इमरजन्सी खिडकीतून बाहेर फेकला गेला. त्याचवेळी त्याच्या आईने आरडाओरड केली असताना सहप्रवाशांनी रेल्वेची चेन खेचली. घटनास्थळापासून साधारणः १ किमी अंतरावर रेल्वे थांबली.

त्यानंतर आराध्यचे कुटुंबिय त्याला शोधण्यासाठी गेले असता झुडपात तो निपचित पडल्याचे दिसून आले. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याला पुढील स्टेशनवर थांबवून इस्पितळात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार सुरू करून लोणी येथे नेण्यात आले. मात्र, बुधवारी दुपारी त्याची प्राणज्योत मालवली. दौंड येथे आराध्य रेल्वेतून खाली पडला होता. वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मित्रांसोबत वाढदिवस.... 

आराध्यचा १ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. आपल्या वाढदिवसाला सर्व मित्रांना बोलवण्याचा हट्ट त्याने कुटुंबीयांकडे केला होता. त्यानुसार त्याच्या कुटुंबीयांनी मित्र परिवारासमवेत मडगावातील एका हॉटेलमध्ये त्याचा थाटामाटात वाढदिवस साजरा केला, नियतीने त्याचा हा आनंद फार काळ टिकू दिला नाही. आराध्य मडगावातील लॉयोला हायस्कूलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकत होता. या घटनेने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमके काय घडले... 

आराध्य आपल्या कुटुंबीयांसह शिर्डीहून गोव्याकडे येण्यासाठी निघाला होता. ते ज्या रेल्वेच्या डब्यात बसले होते, त्यांच्या समोरच्या सीटवर इतर प्रवासीही होते. थोड्या वेळाने ते प्रवासी त्यांच्या थांब्यावर उतरले. काही वेळाने त्या रिकाम्या झालेल्या सीटवर बसण्यासाठी आराध्य त्या दिशेने धावला. तत्पूर्वीच त्या सीटवर असणारी इमर्जन्सी खिडकी कोणीतरी उघडी ठेवली होती. चालू रेल्वेत आराध्य सीटवर बसत असताना अचानक तो त्या खिडकीतून बाहेर फेकला गेला आणि पडला. यातच्या त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 

टॅग्स :goaगोवाIndian Railwayभारतीय रेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वे