शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवस पावसाचे!

By admin | Updated: September 9, 2015 02:09 IST

पणजी : मान्सूनला परतीचे वेध लागलेले असतानाच गोव्यासह केरळ आणि कर्नाटकातील काही भागांत मंगळवारी जोरदार पाऊस पडला. केरळ व

पणजी : मान्सूनला परतीचे वेध लागलेले असतानाच गोव्यासह केरळ आणि कर्नाटकातील काही भागांत मंगळवारी जोरदार पाऊस पडला. केरळ व कर्नाटक जवळील भागात कमी दाबसदृश पट्टा (ट्रॉग) निर्माण झाल्यामुळे हा पाऊस पडल्याचे हवामान खात्याने म्हटले असून आणखी चार दिवस संततधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातून मान्सून माघारी परतू लागला असून पंजाब, हरयाणा व राजस्थानमधून मान्सून परतल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. मात्र, अचानक नैऋत्य मान्सून सक्रिय होण्याची प्रक्रिया दक्षिण-पश्चिम भारतात घडली आहे. कर्नाटक, केरळ व गोव्यात पावसाच्या सरी कोसळल्या. गोव्यात मडगाव, सांगे, काणकोण, वाळपई, साखळी या भागांत अधिक पाऊस पडला, तर पणजीत हलक्या सरी कोसळल्या. पणजीत केवळ १२ मिलीमीटर पाऊस पडला. हवामान खात्याचे शास्त्रज्ञ एच. हरिदासन यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, लक्षद्विप ते मराठवाडा आणि कर्नाटकमधील अंतर्गत भागात ‘ट्रॉग’ची निर्मिती झाली असून त्यामुळे या भागात पाऊस पडत आहे. गोव्यात पडलेला पाऊस हा कर्नाटकमधील ‘ट्रॉग’चा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. आणखी चार दिवस हा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. एका बाजूने ‘ट्रॉग’च्या प्रभावाने गोव्यात पाऊस मिळाला, तर दुसऱ्या बाजूने बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचाही गोव्याला फायदा होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पट्ट्यामुळे आंध्र किनारपट्टीला पावसाने झोडपले आहे. आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी पुराची स्थिती आहे. त्यामुळे मान्सून सक्रिय होऊन केरळ व गोव्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हरिदासन यांनी सांगितले. रविवार व सोमवारी गरमीच्या दाहामुळे होरपळल्यासारखी परिस्थिती होती, तर मंगळवारी दिवसभर गारवा राहिला. तापमान २५ अंश सेल्सीएसपर्यंत खाली आले होते, तर कमाल तापमान ३१ इंच सेल्सीअस एवढे होते. आर्द्रता ८९ टक्के एवढी होती. राज्यातील ग्रामीण भागात सकाळी खूपच वृष्टी झाली. सकाळी साडेअकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत उत्तर गोव्यातील बहुतांश ग्रामीण भागांना पावसाने झोडपून काढले. खूप दिवसांनी विजेचा लखलखाटही अनुभवास आला. दीड-दोन तासांत एवढा पाऊस गेले काही दिवस पडलाच नव्हता, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. काही रस्ते पाण्याखाली गेले होते. सकाळपासूनच वातावरण बदलले होते. पाऊस पडणार अशी चिन्हे दिसत होती. मग जोरदार वृष्टी झाली. राजधानी पणजीपेक्षा राज्यातील अन्य भागांत जास्त पाऊस पडला. गेले काही दिवस पाऊस गायब झाल्यामुळे चिंतीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)