शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
4
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
5
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
6
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
7
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
8
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
9
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
10
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
11
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
12
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
13
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
14
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
15
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
16
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
17
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
18
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
19
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
20
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!

चार दिवस पावसाचे!

By admin | Updated: September 9, 2015 02:09 IST

पणजी : मान्सूनला परतीचे वेध लागलेले असतानाच गोव्यासह केरळ आणि कर्नाटकातील काही भागांत मंगळवारी जोरदार पाऊस पडला. केरळ व

पणजी : मान्सूनला परतीचे वेध लागलेले असतानाच गोव्यासह केरळ आणि कर्नाटकातील काही भागांत मंगळवारी जोरदार पाऊस पडला. केरळ व कर्नाटक जवळील भागात कमी दाबसदृश पट्टा (ट्रॉग) निर्माण झाल्यामुळे हा पाऊस पडल्याचे हवामान खात्याने म्हटले असून आणखी चार दिवस संततधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातून मान्सून माघारी परतू लागला असून पंजाब, हरयाणा व राजस्थानमधून मान्सून परतल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. मात्र, अचानक नैऋत्य मान्सून सक्रिय होण्याची प्रक्रिया दक्षिण-पश्चिम भारतात घडली आहे. कर्नाटक, केरळ व गोव्यात पावसाच्या सरी कोसळल्या. गोव्यात मडगाव, सांगे, काणकोण, वाळपई, साखळी या भागांत अधिक पाऊस पडला, तर पणजीत हलक्या सरी कोसळल्या. पणजीत केवळ १२ मिलीमीटर पाऊस पडला. हवामान खात्याचे शास्त्रज्ञ एच. हरिदासन यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, लक्षद्विप ते मराठवाडा आणि कर्नाटकमधील अंतर्गत भागात ‘ट्रॉग’ची निर्मिती झाली असून त्यामुळे या भागात पाऊस पडत आहे. गोव्यात पडलेला पाऊस हा कर्नाटकमधील ‘ट्रॉग’चा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. आणखी चार दिवस हा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. एका बाजूने ‘ट्रॉग’च्या प्रभावाने गोव्यात पाऊस मिळाला, तर दुसऱ्या बाजूने बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचाही गोव्याला फायदा होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पट्ट्यामुळे आंध्र किनारपट्टीला पावसाने झोडपले आहे. आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी पुराची स्थिती आहे. त्यामुळे मान्सून सक्रिय होऊन केरळ व गोव्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हरिदासन यांनी सांगितले. रविवार व सोमवारी गरमीच्या दाहामुळे होरपळल्यासारखी परिस्थिती होती, तर मंगळवारी दिवसभर गारवा राहिला. तापमान २५ अंश सेल्सीएसपर्यंत खाली आले होते, तर कमाल तापमान ३१ इंच सेल्सीअस एवढे होते. आर्द्रता ८९ टक्के एवढी होती. राज्यातील ग्रामीण भागात सकाळी खूपच वृष्टी झाली. सकाळी साडेअकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत उत्तर गोव्यातील बहुतांश ग्रामीण भागांना पावसाने झोडपून काढले. खूप दिवसांनी विजेचा लखलखाटही अनुभवास आला. दीड-दोन तासांत एवढा पाऊस गेले काही दिवस पडलाच नव्हता, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. काही रस्ते पाण्याखाली गेले होते. सकाळपासूनच वातावरण बदलले होते. पाऊस पडणार अशी चिन्हे दिसत होती. मग जोरदार वृष्टी झाली. राजधानी पणजीपेक्षा राज्यातील अन्य भागांत जास्त पाऊस पडला. गेले काही दिवस पाऊस गायब झाल्यामुळे चिंतीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)