शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
2
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
3
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
4
लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
5
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
6
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
7
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
8
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
9
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
10
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
11
जिद्दीला सलाम ! डोळ्याला इन्फेक्शन... तरीही गॉगल लावून मैदानात उतरला अन् पठ्ठाने शतकच ठोकलं
12
सनी देओल रुपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज, या दिवशी रिलीज होणार 'बॉर्डर २'चा टीझर
13
आसिम मुनीर यांची ताकद वाढली; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे 'हे' ५ मोठे अधिकार संपुष्टात!
14
पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
15
Matthew Hayden: 'कपडे काढून धावेन' म्हणणारा मॅथ्यू हेडन जो रूटच्या शतकानंतर काय म्हणाला?
16
"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
17
एआय: महासत्ता की महासंकट?, गरीब-श्रीमंतांमधील...; 'संयुक्त राष्ट्र संघा'ने या तंत्रज्ञानाबद्दल दिला गंभीर इशारा
18
टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन
19
इन्स्टावरच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला पोहोचला तरुण; वरातही वाजत निघाली अन् अचानक मुलगी फोनच उचलेना..
20
BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीसाठी काळा दिवस; भारत जोडो यात्रेच्या यशाला घाबरूनच भाजपची कृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 08:52 IST

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी गोवा काँग्रेसची भाजपवर सडकून टीका.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या यशाला घाबरूनच भाजप सरकारने नेते राहुल गांधी यांची खासदारकी अपात्र ठरवली. आजचा दिवस हा लोकशाहीसाठीचा काळा दिवस आहे. सदर घटनेचा तीव्र शब्दांत निषेध असल्याची टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पत्रकार परिषदेत केली.

राजकीय भाषण केले म्हणून अशा प्रकारे खासदारकी रद्द करणे हा लोकशाहीचा खून आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकार आहे. अदानी तसेच अन्य महत्त्वाच्या मुद्दयांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपने हे सर्व केले आहे. सदर प्रकार हा लोकशाहीला घातक आहे. राहुल गांधी यांनी भाजप जोडो यात्रेदरम्यान सरकारला उघडे पाडले. या यात्रेला मिळालेले यश पाहून सरकार घाबरल्यानेच हे सर्व झाल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, राहुल यांच्यावर भाजप नेत्यांनी कुठलेही तथ्य जाणून न घेताच चुकीचे आरोप केला. अशा प्रकारे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल यांची खासदारकी अपात्र ठरवणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे. त्यांचा आवाज दाबण्यासाठीच हे सर्व केले आहे.

केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा म्हणाले की, काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठीची याचिका चार वर्षे झाली तरी प्रलंबित आहे. त्यावर अजूनही निर्णय होत नाही. मात्र, राहुल यांची खासदारकी ताबडतोब अपात्र ठरवली. हा प्रकार निषेधार्ह आहे. हळदोणेचे आमदार अॅड. कार्लस फेरेरा उपस्थित होते.

कायदेशीर निर्णय: अॅड. यतीश नायक

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा कायदेशीर निर्णय आहे. कॉंग्रेस ज्या प्रकारे याचा गाजावाजा करत आहे की, भाजप लोकशाहीचा खून करत आहे किंवा भाजप राहुल गांधींना भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, यामध्ये काहीच तथ्य नाही, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते अॅड. यतीश नायक यांनी पत्रकार परिषदेत दिली. राहुल गांधी यांच्याविरोधात २०१९ मध्ये पुर्निश मोदी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर काही टिप्पणी केली होती, या पार्श्वभूमीवर ही तक्रार होती. त्या खटलाचा निकाल न्यायालयाने आता दिला असून, गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जर एखाद्या खासदाराला शिक्षा झाली आहे, तर त्यांचे खासदारकी रद्द करण्याचा कायदा आहे. या कायद्याअंतर्गत लोकसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली आहे, असे अॅड. नायक यांनी यावेळी सांगितले. सर्वकाही कायद्यानुसारच होत आहे, आणि कायदा सर्वांसाठी एकच आहे, असेही अॅड. नायक यांनी पुढे सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा