शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राफेल व्यवहारात महाघोटाळा झालाय- प्रियंका चतुर्वेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 22:47 IST

संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेला राफेल विमान खरेदीचा व्यवहार हा देशाच्या सुरक्षेशी तडजोड करून करण्यात आलेला महाघोटाळा असल्याचे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या संवाद निमंत्रक प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

पणजी-  संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेला राफेल विमान खरेदीचा व्यवहार हा देशाच्या सुरक्षेशी तडजोड करून करण्यात आलेला महाघोटाळा असल्याचे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या संवाद निमंत्रक प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. गरज नसताना राफाल विमानांची खरेदीची किंमत वाढवून घेण्याचे काम करण्यात आले आहे. शिवाय विमानांची संख्या कमी करून देशाच्या सुरक्षेशी तडजोड करण्यात आली आहे. 526 रुपये कोटींचे विमान 1670 रुपये कोटींना विकत घेऊन जनतेच्या पैशांचे 41,205 रुपये कोटी नुकसान करण्यात आले आहे, असा आरोप चतुर्वेदी यांनी कॉंग्रेस हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.राफेल विमानांसाठी 12 डिसेंबर 2012 रोजी आंतरराष्ट्रीय निविदा यूपीए-काँग्रेस सरकारच्या कालावधीत 126 विमाने खरेदी करण्यासाठी जारी झाली. त्यावेळी प्रत्येक विमानासाठी 526.10 रुपये कोटी किंमत ठरली होती. यातील 18 विमाने फ्रान्समधून तयार करून येणार होती तर 108 विमाने तंत्रज्ञान हस्तांतरण प्रक्रियेद्वारे भारतात हिंदुस्तान एरोनोटिक्स या सार्वजनिक आस्थापनाद्वारे तयार केली जाणार होती. या निविदेप्रमाणे त्यावेळी 36 विमानांची किंमत रुपये 18,940 कोटी होणार होती. पण 10 एप्रिल 2015 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तातडीची गरज भासवून पेरिसमध्ये 7.5 अब्ज युरो किंमतीत (प्रत्येक विमानासाठी रुपये 1670.70 कोटी किंमत) 36 विमाने विकत घ्यायचा निर्णय घेतला. या 36 विमानांची भारतीय चलनांतील किंमत रुपये 60,145 कोटी एवढी होती. डेसोल्ट एव्हीएशनचा वार्षिक अहवाल 2016 व रिलायन्स डिफेन्स लिमिटेड कंपनीच्या प्रसिद्धी पत्रकातून ते स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.या 36 विमानांतले पहिले विमान सप्टेंबर 2019 मध्ये तर शेवटचे विमान 2022 मध्ये यायचे आहे. म्हणजेच एप्रिल 2015 मध्ये करार केल्यानंतर आठ वर्षाच्या कालावधीनंतर. तेही भारताला चीन व पाकिस्तानकडून सुरक्षेचा धोका असताना. देशाच्या सुरक्षेकडे केलेली ही तडजोड नव्हे का? आणि ह्यतांतडीने खरेदी प्रक्रिया तत्वाच्या विरोधी व्यवहार नव्हे का असा प्रश्नही त्यांनी केला आहे. पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांनी याचे स्पष्टीकरण देण्याची मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेस