शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

सेंद्रीय कृषी विद्यापीठाचा प्रस्ताव मार्गी लागेल - बाबू कवळेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 13:30 IST

सेंद्रीय कृषी विद्यापीठ प्रकल्प उभा करण्यासाठी आम्ही दक्षिण गोव्यात जमिनही पाहिली आहे. पाच लाख चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जमिनीत हा प्रकल्प कशा प्रकारे उभा करावा याविषयी चर्चा झाली आहे.

पणजी - गोव्यात पहिले सेंद्रीय कृषी विद्यापीठ साकारणार आहे. मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात नियोजित विद्यापीठाविषयीचा प्रस्ताव थोडा मागे राहिला पण आता हा प्रस्ताव मार्गी लागेल. त्याविषयीच्या विविध निर्णयांची अंमलबजावणी यापुढील काळात होईल, असे गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी गुरुवारी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले. कवळेकर यांच्याकडेच कृषी खातेहीआहे.सेंद्रीय कृषी विद्यापीठ प्रकल्प उभा करण्यासाठी आम्ही दक्षिण गोव्यात जमिनही पाहिली आहे. पाच लाख चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जमिनीत हा प्रकल्प कशा प्रकारे उभा करावा याविषयी चर्चा झाली आहे. कृषी विद्यापीठ क्षेत्रतील तज्ज्ञांशी सल्लामसलत झाली, असे कवळेकर यांनी सांगितले. महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डीन डॉ. मदन गोपाल वर्षणो यांनी विद्यापीठ उभे करण्यासाठी मार्गदर्शन करून आराखडा ठरवावा म्हणून त्यांची नियुक्तीही झालेली आहे, असे कवळेकर यांनी नमूद केले. वर्षणो हे गुजरातच्या आनंद विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.जमिनीविषयी कायदेशीर सोपस्कार पार पाडणो व अन्य तत्सम प्रक्रिया झाली आहे. लॉकडाऊनमुळे काही तज्ज्ञांचे गोव्यात येणो अडून राहिले होते. आता लॉकडाऊन संपुष्टात आल्यामुळे टप्प्याटप्प्याने पुढील कामे पार पडतील. सेंद्रीय शेतीला गोवा सरकार प्राधान्य देत आहे. नव्या युवकांनी सेंद्रीय शेतीच्या क्षेत्रत उतरावे असे आम्हाला वाटते. शेतीला उद्योग म्हणून तरुणांनी पहायला हवे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण खूप कमी होण्यास मदत होईल. गोव्यातील नियोजित विद्यापीठासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा म्हणून आपण केंद्रीय मंत्र्यांशीही चर्चा केली आहे. सुमारे साडेपाचशे कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. सेंद्रीय कृषी विद्यापीठाची कल्पना ही आपणच पुढे आणली व त्या कल्पनेचा पाठपुरावाही केला. मुख्यमंत्रीही खूप अनुकूल आहेत, असे कवळेकर यांनी सांगितले. विद्यापीठाचे स्वप्न साकार होईल असा विश्वास कवळेकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :goaगोवा