शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

देशाबरोबर संगीत क्षेत्रातही प्रगती; अभिषेकीबुवांचा आपल्यावर प्रभाव: अशोक पत्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 13:24 IST

पार्श्वसंगीतासाठी फारसे कोणी खर्च करत नाही, अशी खंत पत्की यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव: नवीन तंत्रज्ञानामुळे नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. देशाची प्रगती झाली तशीच संगीताचीही प्रगती झाली. आता घराघरांतून संगीत वाजवले जाते आणि गायक गात राहतात, ही गोष्ट पटत नसली तरी स्वीकारावी लागते, असे नामवंत संगीतकार अशोक पत्की यांनी सांगितले.

मडगावातील निकेतनच्या गोमंत विद्या विचारवेध व्याख्यानमालेत रविवारी 'जनप्रिय त्यांची मुलाखत प्रख्यात सूत्रनिवेदक अजय वैद्य यांनी घेतली. जितेंद्र अभिषेकीबुवांचा प्रभाव आपल्यावर आहे. ते म्हणायचे, मुखडा सणसणीत झाला पाहिजे. ७० गाणी प्रशांत दामलेसोबत केली, असे सांगून पत्की यांनी 'सुख म्हणजे काय असतं' तसेच या गाण्याचे दुसरे रूप सादर करून दाखवले. 'मोरूची मावशी या नाटकातील गाणीही त्यांनी सादर केली. पार्श्वसंगीतासाठी फारसे कोणी खर्च करत नाही, अशी खंत पत्की यांनी व्यक्त केली.

अनेक पारितोषिके प्राप्त झाली. पुढे काम करण्याची पद्धत बदलत गेली. मूडभोवती सगळे फिरत असते. 'काल रात्री स्वप्नामध्ये' हे गाणे रचले, मुखडा तयार केला. त्यामुळे अर्धवट कवी असे नाव पडले. त्यानंतर सुरेश वाडकर यांच्यामुळे पूर्ण कवी झालो. स्वप्निल बांदोडकर यांनी आपल्याकडून गाणे रचून घेतले ते म्हणजे 'राधा ही बावरी' अवधूत गुप्ते यांनीही त्याला दाद दिली आणि आज १२-१३ वर्षे झाली, तरी हे गाणे खूप चालत आहे, असे त्यांनी आपल्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितले आज गाणी दुरुस्त करायला येतात, असे ते म्हणाले. 

'हाजी हाजी करायला गेलो नाही' कामे चालत आली. त्यामुळे हिंदीमध्ये हाजी हाजी करतं गेलो नाही आणि ते करणे आवडतही नाही, असे पत्की यांनी सांगितले.' 'ब्रहाचारी'मधील यमुना जळी खेळ खेळू हे जुने आणि नवे गाणे त्यांनी यावेळी सादर केले. पालखी उतरूनी ठेवा'चा किस्सा सांगत गाणे सादर केले.

'शीर्षकगीते पुढे जाणार'

शीर्षकगीते देण्यास ७२ साली सुरुवात झाली. हिंदी गाण्यांतून सुरुवात केली. बीज अंकुरे अंकुरे, आभाळ माय, वादळवाट यांचा त्यात समावेश राहिला. भातुकलीच्या खेळामधली...अधुरी एक कहाणी या गाण्याची चाल बदलायला लावली होती. तेव्हा अरुण दाते यांनी मिठी मारून दाद दिली. अजूनही 'झी'वर शीर्षकगीते देतो, पण पुढे ती बंद होणार. आर्थिक बदल यास कारणीभूत ठरणार आहे, असे पत्की यांनी सांगितले.

जिंगल्समध्ये वेळ महत्त्वाची

जिंगल्स ५००० हून अधिक रचलेली आहेत. हिंदी जिंगल्सचाही समावेश आहे, यामध्ये वेळ खूप महत्वाची असते. उदाहरणार्थ १०, २० सेकंद हाती असतात. पूर्वीची कित्येक जिंगल्स आजही आठवतात, पण आताची आठवणीत राहत नाही. कारण व्यवहार झालेला आहे, असे पत्की म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाAshok Patkiअशोक पत्की