शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

देशाबरोबर संगीत क्षेत्रातही प्रगती; अभिषेकीबुवांचा आपल्यावर प्रभाव: अशोक पत्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 13:24 IST

पार्श्वसंगीतासाठी फारसे कोणी खर्च करत नाही, अशी खंत पत्की यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव: नवीन तंत्रज्ञानामुळे नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. देशाची प्रगती झाली तशीच संगीताचीही प्रगती झाली. आता घराघरांतून संगीत वाजवले जाते आणि गायक गात राहतात, ही गोष्ट पटत नसली तरी स्वीकारावी लागते, असे नामवंत संगीतकार अशोक पत्की यांनी सांगितले.

मडगावातील निकेतनच्या गोमंत विद्या विचारवेध व्याख्यानमालेत रविवारी 'जनप्रिय त्यांची मुलाखत प्रख्यात सूत्रनिवेदक अजय वैद्य यांनी घेतली. जितेंद्र अभिषेकीबुवांचा प्रभाव आपल्यावर आहे. ते म्हणायचे, मुखडा सणसणीत झाला पाहिजे. ७० गाणी प्रशांत दामलेसोबत केली, असे सांगून पत्की यांनी 'सुख म्हणजे काय असतं' तसेच या गाण्याचे दुसरे रूप सादर करून दाखवले. 'मोरूची मावशी या नाटकातील गाणीही त्यांनी सादर केली. पार्श्वसंगीतासाठी फारसे कोणी खर्च करत नाही, अशी खंत पत्की यांनी व्यक्त केली.

अनेक पारितोषिके प्राप्त झाली. पुढे काम करण्याची पद्धत बदलत गेली. मूडभोवती सगळे फिरत असते. 'काल रात्री स्वप्नामध्ये' हे गाणे रचले, मुखडा तयार केला. त्यामुळे अर्धवट कवी असे नाव पडले. त्यानंतर सुरेश वाडकर यांच्यामुळे पूर्ण कवी झालो. स्वप्निल बांदोडकर यांनी आपल्याकडून गाणे रचून घेतले ते म्हणजे 'राधा ही बावरी' अवधूत गुप्ते यांनीही त्याला दाद दिली आणि आज १२-१३ वर्षे झाली, तरी हे गाणे खूप चालत आहे, असे त्यांनी आपल्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितले आज गाणी दुरुस्त करायला येतात, असे ते म्हणाले. 

'हाजी हाजी करायला गेलो नाही' कामे चालत आली. त्यामुळे हिंदीमध्ये हाजी हाजी करतं गेलो नाही आणि ते करणे आवडतही नाही, असे पत्की यांनी सांगितले.' 'ब्रहाचारी'मधील यमुना जळी खेळ खेळू हे जुने आणि नवे गाणे त्यांनी यावेळी सादर केले. पालखी उतरूनी ठेवा'चा किस्सा सांगत गाणे सादर केले.

'शीर्षकगीते पुढे जाणार'

शीर्षकगीते देण्यास ७२ साली सुरुवात झाली. हिंदी गाण्यांतून सुरुवात केली. बीज अंकुरे अंकुरे, आभाळ माय, वादळवाट यांचा त्यात समावेश राहिला. भातुकलीच्या खेळामधली...अधुरी एक कहाणी या गाण्याची चाल बदलायला लावली होती. तेव्हा अरुण दाते यांनी मिठी मारून दाद दिली. अजूनही 'झी'वर शीर्षकगीते देतो, पण पुढे ती बंद होणार. आर्थिक बदल यास कारणीभूत ठरणार आहे, असे पत्की यांनी सांगितले.

जिंगल्समध्ये वेळ महत्त्वाची

जिंगल्स ५००० हून अधिक रचलेली आहेत. हिंदी जिंगल्सचाही समावेश आहे, यामध्ये वेळ खूप महत्वाची असते. उदाहरणार्थ १०, २० सेकंद हाती असतात. पूर्वीची कित्येक जिंगल्स आजही आठवतात, पण आताची आठवणीत राहत नाही. कारण व्यवहार झालेला आहे, असे पत्की म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाAshok Patkiअशोक पत्की