शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

झोन बदलाद्वारे गोव्याची विक्री, निवडणूक निधी गोळा करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 18:15 IST

राज्यातील जमिनींचा झोन बदलण्याची अधिसूचना सरकारने जारी करून गोव्यातील उरल्यासुरल्या छोट्या जमिनींची आता किरकोळ पद्धतीने विक्री चालवली आहे.

ठळक मुद्देराज्यातील जमिनींचा झोन बदलण्याची अधिसूचना सरकारने जारी करून गोव्यातील उरल्यासुरल्या छोट्या जमिनींची आता किरकोळ पद्धतीने विक्री चालवली आहे.ओडीपींमध्ये घोटाळे केल्यानंतर सरकारमधील मंत्री, आमदारांनी आता निवडणूक निधी गोळा करण्यासाठी झोन बदलाचा शॉर्ट कट शोधून काढला.छोट्या छोट्या ऑर्चड जमिनीही रुपांतरित करून दिल्या जातील, असे फर्नाडिस म्हणाले.

पणजी - राज्यातील जमिनींचा झोन बदलण्याची अधिसूचना सरकारने जारी करून गोव्यातील उरल्यासुरल्या छोट्या जमिनींची आता किरकोळ पद्धतीने विक्री चालवली आहे. ओडीपींमध्ये घोटाळे केल्यानंतर सरकारमधील मंत्री, आमदारांनी आता निवडणूक निधी गोळा करण्यासाठी झोन बदलाचा शॉर्ट कट शोधून काढला, अशी जोरदार टीका काँग्रेसचे प्रवक्ते आग्नेल फर्नाडिस यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच काँग्रेसचा यास आक्षेप असल्याचे स्पष्ट केले.

मोठमोठ्या जमिनी अगोदरच दिल्ली व अन्य भागातील बिल्डरांसाठी रुपांतरित करून दिल्या गेल्या. आता झोन बदलाची कल्पना सरकारने पुढे आणली. गोव्याच्या भावी पिढीला जमिनीच शिल्लक ठेवायच्या नाहीत असे मंत्री, आमदारांनी ठरवून टाकले आहे. ओडीपींमध्ये घोटाळे झाल्याने कायद्याच्या कसोटीवर ते टीकणार नाहीत हे राजकारण्यांना ठाऊक आहे. विशेषत: कळंगुटच्या लोकप्रतिनिधीला तर ते पूर्ण ठाऊक आहे. यामुळे ऑचर्ड जमिनींच सेटलमेन्टमध्ये व मग औद्योगिक वापरासाठी म्हणून रुपांतरित करण्याची कल्पना सरकारने शोधून काढली. ओडीपींमध्ये श्रीमंत बिल्डरांना लाभ देण्यासाठी सरकारमधील घटकांनी पैसे घेतले. आता छोट्या छोट्या ऑर्चड जमिनीही रुपांतरित करून दिल्या जातील, असे फर्नाडिस म्हणाले.

परप्रांतीय बिल्डरांना लाभ

गोमंतकीय माणूस हा डोंगर व टेकड्यांवर जमीन घेत नाही. कारण तिथे बांधकाम करता येत नाही अशी भीती त्याच्या मनात असते. गोव्याबाहेर बिल्डरांनी मात्र गोव्यातील डोंगरांवर जमिनी खरेदी केल्या आहेत. हिरव्या जमिनी आता सेटलमेंटमध्ये रुपांतरित केल्या जातील. झोन बदलासाठी शूल्क लागू करून तशी अधिसूचना ही परप्रांतीय बिल्डरांच्याच हितासाठी आणली गेली आहे, असे फर्नाडिस म्हणाले. गोव्यावर सत्ताधाऱ्यांनी बलात्कार चालवला आहे, हे गोंयकारपण नव्हे, अशी टीका फर्नाडिस यांनी केली.

किनाऱ्यांवर कचरा

दरम्यान, सरकारमधील काही मंत्री प्रशासन ठप्प झाले असे म्हणतात तर काहीजण निषेध म्हणून सचिवालयातच जात नाही. किनाऱ्यांवर कचरा साठला आहे. पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे, असे फर्नाडिस म्हणाले. अगोदर रशियामधून आठवडय़ाला 12 चार्टर विमाने येत होती. आता फक्त चारच विमाने येतात. लंडनमधून आठवड्याला आठ विमाने येत होती. आताही तेवढीच येतात, त्यांची संख्या वाढली नाही. गोव्यात केवळ ट्रॅक्स व अन्य वाहनांमधून कमी खर्च करणारे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. शेतात जाऊन स्वयंपाक करणारे पर्यटक येत आहेत, असे फर्नाडिस म्हणाले. साळगावच्या कचरा प्रकल्पापासून चार किलोमीटर अंतरावरील परिसरात खूप दुर्गंधी येते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस