शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

झोन बदलाद्वारे गोव्याची विक्री, निवडणूक निधी गोळा करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 18:15 IST

राज्यातील जमिनींचा झोन बदलण्याची अधिसूचना सरकारने जारी करून गोव्यातील उरल्यासुरल्या छोट्या जमिनींची आता किरकोळ पद्धतीने विक्री चालवली आहे.

ठळक मुद्देराज्यातील जमिनींचा झोन बदलण्याची अधिसूचना सरकारने जारी करून गोव्यातील उरल्यासुरल्या छोट्या जमिनींची आता किरकोळ पद्धतीने विक्री चालवली आहे.ओडीपींमध्ये घोटाळे केल्यानंतर सरकारमधील मंत्री, आमदारांनी आता निवडणूक निधी गोळा करण्यासाठी झोन बदलाचा शॉर्ट कट शोधून काढला.छोट्या छोट्या ऑर्चड जमिनीही रुपांतरित करून दिल्या जातील, असे फर्नाडिस म्हणाले.

पणजी - राज्यातील जमिनींचा झोन बदलण्याची अधिसूचना सरकारने जारी करून गोव्यातील उरल्यासुरल्या छोट्या जमिनींची आता किरकोळ पद्धतीने विक्री चालवली आहे. ओडीपींमध्ये घोटाळे केल्यानंतर सरकारमधील मंत्री, आमदारांनी आता निवडणूक निधी गोळा करण्यासाठी झोन बदलाचा शॉर्ट कट शोधून काढला, अशी जोरदार टीका काँग्रेसचे प्रवक्ते आग्नेल फर्नाडिस यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच काँग्रेसचा यास आक्षेप असल्याचे स्पष्ट केले.

मोठमोठ्या जमिनी अगोदरच दिल्ली व अन्य भागातील बिल्डरांसाठी रुपांतरित करून दिल्या गेल्या. आता झोन बदलाची कल्पना सरकारने पुढे आणली. गोव्याच्या भावी पिढीला जमिनीच शिल्लक ठेवायच्या नाहीत असे मंत्री, आमदारांनी ठरवून टाकले आहे. ओडीपींमध्ये घोटाळे झाल्याने कायद्याच्या कसोटीवर ते टीकणार नाहीत हे राजकारण्यांना ठाऊक आहे. विशेषत: कळंगुटच्या लोकप्रतिनिधीला तर ते पूर्ण ठाऊक आहे. यामुळे ऑचर्ड जमिनींच सेटलमेन्टमध्ये व मग औद्योगिक वापरासाठी म्हणून रुपांतरित करण्याची कल्पना सरकारने शोधून काढली. ओडीपींमध्ये श्रीमंत बिल्डरांना लाभ देण्यासाठी सरकारमधील घटकांनी पैसे घेतले. आता छोट्या छोट्या ऑर्चड जमिनीही रुपांतरित करून दिल्या जातील, असे फर्नाडिस म्हणाले.

परप्रांतीय बिल्डरांना लाभ

गोमंतकीय माणूस हा डोंगर व टेकड्यांवर जमीन घेत नाही. कारण तिथे बांधकाम करता येत नाही अशी भीती त्याच्या मनात असते. गोव्याबाहेर बिल्डरांनी मात्र गोव्यातील डोंगरांवर जमिनी खरेदी केल्या आहेत. हिरव्या जमिनी आता सेटलमेंटमध्ये रुपांतरित केल्या जातील. झोन बदलासाठी शूल्क लागू करून तशी अधिसूचना ही परप्रांतीय बिल्डरांच्याच हितासाठी आणली गेली आहे, असे फर्नाडिस म्हणाले. गोव्यावर सत्ताधाऱ्यांनी बलात्कार चालवला आहे, हे गोंयकारपण नव्हे, अशी टीका फर्नाडिस यांनी केली.

किनाऱ्यांवर कचरा

दरम्यान, सरकारमधील काही मंत्री प्रशासन ठप्प झाले असे म्हणतात तर काहीजण निषेध म्हणून सचिवालयातच जात नाही. किनाऱ्यांवर कचरा साठला आहे. पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे, असे फर्नाडिस म्हणाले. अगोदर रशियामधून आठवडय़ाला 12 चार्टर विमाने येत होती. आता फक्त चारच विमाने येतात. लंडनमधून आठवड्याला आठ विमाने येत होती. आताही तेवढीच येतात, त्यांची संख्या वाढली नाही. गोव्यात केवळ ट्रॅक्स व अन्य वाहनांमधून कमी खर्च करणारे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. शेतात जाऊन स्वयंपाक करणारे पर्यटक येत आहेत, असे फर्नाडिस म्हणाले. साळगावच्या कचरा प्रकल्पापासून चार किलोमीटर अंतरावरील परिसरात खूप दुर्गंधी येते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस