शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

सिद्धांत शिरोडकरना राष्ट्रपती पदक जाहीर; डिसोझा, वेर्णेकरना उत्कृष्ट सेवा पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2024 09:11 IST

बुडणाऱ्या भावंडांना जीवदान देणाऱ्या साहिलचा होणार सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : वाहतूक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांना उत्कृष्ट सेवेसाठी 'राष्ट्रपती सेवा पदक' जाहीर झाले आहे. तसेच एमटी विभागाचे पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोझा आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षक विभागाचे पोलिस उपअधीक्षक तुषार वेर्णेकर यांना 'उत्कृष्ट सेवा पदक' जाहीर करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २६ रोजी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात शिरोडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

देशभरात एकूण १,१३२ पोलिस, अग्निशमन दल, गृहरक्षक आणि नागरी सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रपती पदक १०२ जणांना तर ७५३ जणांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रपती पदकासाठी प्रत्येक राज्यातून अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली जाते. गोव्यातूनही त्याप्रमाणे शिफारस करण्यात येत असते.

दरम्यान, गोव्यातून पोलिस आणि अग्निशमन दलातील जवानांच्या नावाची यादी राष्ट्रपती पदकासाठी शिफारस केली जाते; परंतु गृहरक्षक दलाच्या जवानांची म्हणजेच होमगार्डची मात्र फार कमी वेळा शिफारस केली जात आहे. त्यामुळे गोव्यातील होमगार्डना क्वचितच राष्ट्रपती पदके जाहीर होतात.

'जी-२०' साठी आणि राष्ट्रीय स्पर्धेवेळी सुरक्षा व्यवस्थेत चांगली कामगिरी बजावल्यामुळे पोलिस अधीक्षक बोसुएट सिल्वा, किरण पोडुवाल, सुर्नीता सावंत यांच्यासह ११ अधिकाऱ्यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. इतर अधिकान्यांत सुचेता देसाई, उपअ- धीक्षक जिवबा दळवी, सिद्धांत शिरोडकर, प्रबोध शिरवईकर, मनोज म्हार्दोळकर, निरीक्षक जॉन फर्नाडिस, चेतन सावलेकर आणि दितेश नाईक यांचा समावेश आहे. गोवा विद्यापीठ मैदानावर २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात त्यांना ही प्रशस्तिपत्रे दिली जातील.

बुडणाऱ्या भावंडांना जीवदान देणाऱ्या साहिलचा होणार सन्मान

वाळपई येथील नाणूस- बेतकेकरवाड्यावरील साहिल भिसो लाड युवकाला राष्ट्रीय स्तरावरील 'उत्तम जीवन रक्षा पदक' जाहीर झाले आहे. म्हादई नदीत बुडणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना स्वतःचा जीव धोक्यात घालून साहिल याने जीवदान दिले. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन त्याचा सन्मान करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात त्याला हे पदक प्रदान करण्यात येणार आहे. ९ नोव्हेंबर २०२१ रोजी इम्रान (१३), रेहान (१०) आणि असिफ शेख (१६) ही तीन भावंडे आंघोळीसाठी नदीत उतरली होती. अचानक हे तिघेजण गटांगळ्या खाऊ लागल्याने १७ वर्षांच्या साहिलने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नदीत उडी घेत या तिघांना वाचविले. त्यामुळेच वाळपई येथील नागरिकांनी त्याला शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्याची विनंती राज्य सरकारकडे केली होती. आता त्याच्या या शौर्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव होणार आहे.

साहिलला राष्ट्रीय स्तरावरील 'उत्तम जीवन रक्षा पदक' जाहीर झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करताना मला आनंद होत आहे. आव्हानांनी भरलेल्या या जगात साहिलसारख्या युवकांनी दाखवलेले शौर्य हे इतरांसाठी प्रेरणादायी आहे. - विश्वजित राणे, नगर नियोजन मंत्री. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस