शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

सिद्धांत शिरोडकरना राष्ट्रपती पदक जाहीर; डिसोझा, वेर्णेकरना उत्कृष्ट सेवा पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2024 09:11 IST

बुडणाऱ्या भावंडांना जीवदान देणाऱ्या साहिलचा होणार सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : वाहतूक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांना उत्कृष्ट सेवेसाठी 'राष्ट्रपती सेवा पदक' जाहीर झाले आहे. तसेच एमटी विभागाचे पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोझा आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षक विभागाचे पोलिस उपअधीक्षक तुषार वेर्णेकर यांना 'उत्कृष्ट सेवा पदक' जाहीर करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २६ रोजी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात शिरोडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

देशभरात एकूण १,१३२ पोलिस, अग्निशमन दल, गृहरक्षक आणि नागरी सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रपती पदक १०२ जणांना तर ७५३ जणांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रपती पदकासाठी प्रत्येक राज्यातून अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली जाते. गोव्यातूनही त्याप्रमाणे शिफारस करण्यात येत असते.

दरम्यान, गोव्यातून पोलिस आणि अग्निशमन दलातील जवानांच्या नावाची यादी राष्ट्रपती पदकासाठी शिफारस केली जाते; परंतु गृहरक्षक दलाच्या जवानांची म्हणजेच होमगार्डची मात्र फार कमी वेळा शिफारस केली जात आहे. त्यामुळे गोव्यातील होमगार्डना क्वचितच राष्ट्रपती पदके जाहीर होतात.

'जी-२०' साठी आणि राष्ट्रीय स्पर्धेवेळी सुरक्षा व्यवस्थेत चांगली कामगिरी बजावल्यामुळे पोलिस अधीक्षक बोसुएट सिल्वा, किरण पोडुवाल, सुर्नीता सावंत यांच्यासह ११ अधिकाऱ्यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. इतर अधिकान्यांत सुचेता देसाई, उपअ- धीक्षक जिवबा दळवी, सिद्धांत शिरोडकर, प्रबोध शिरवईकर, मनोज म्हार्दोळकर, निरीक्षक जॉन फर्नाडिस, चेतन सावलेकर आणि दितेश नाईक यांचा समावेश आहे. गोवा विद्यापीठ मैदानावर २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात त्यांना ही प्रशस्तिपत्रे दिली जातील.

बुडणाऱ्या भावंडांना जीवदान देणाऱ्या साहिलचा होणार सन्मान

वाळपई येथील नाणूस- बेतकेकरवाड्यावरील साहिल भिसो लाड युवकाला राष्ट्रीय स्तरावरील 'उत्तम जीवन रक्षा पदक' जाहीर झाले आहे. म्हादई नदीत बुडणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना स्वतःचा जीव धोक्यात घालून साहिल याने जीवदान दिले. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन त्याचा सन्मान करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात त्याला हे पदक प्रदान करण्यात येणार आहे. ९ नोव्हेंबर २०२१ रोजी इम्रान (१३), रेहान (१०) आणि असिफ शेख (१६) ही तीन भावंडे आंघोळीसाठी नदीत उतरली होती. अचानक हे तिघेजण गटांगळ्या खाऊ लागल्याने १७ वर्षांच्या साहिलने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नदीत उडी घेत या तिघांना वाचविले. त्यामुळेच वाळपई येथील नागरिकांनी त्याला शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्याची विनंती राज्य सरकारकडे केली होती. आता त्याच्या या शौर्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव होणार आहे.

साहिलला राष्ट्रीय स्तरावरील 'उत्तम जीवन रक्षा पदक' जाहीर झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करताना मला आनंद होत आहे. आव्हानांनी भरलेल्या या जगात साहिलसारख्या युवकांनी दाखवलेले शौर्य हे इतरांसाठी प्रेरणादायी आहे. - विश्वजित राणे, नगर नियोजन मंत्री. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस