शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'प्रवाह'चे अधिकारी म्हादई खोऱ्यात येणार; मंत्री शिरोडकर यांची माहिती, ५ व ६ जुलै रोजी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2024 13:26 IST

जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हादई नदीच्या प्रश्नावर केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या 'प्रवाह' प्राधिकरणाचे अधिकारी ५ व ६ जुलैला गोव्याला भेट देणार आहेत. म्हादई खोऱ्यात पावसाळ्यातील पाण्याचा प्रवाह, तसेच इतर गोष्टी तपासणार आहेत. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

४ जुलैला हे पथक महाराष्ट्राला भेट देईल, तर ७ जुलैला कर्नाटकातील कळसा - भंडुरा प्रकल्पाला भेट देणार आहे. तिन्ही राज्यांमधून म्हादई नदीच्या पाण्याचा होणारा प्रवाह तपासला जाईल. जलस्रोतमंत्री शिरोडकर म्हणाले की, 'पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह तपासणे महत्त्वाचे होते. कारण कर्नाटकने गोव्याचे पाणी वळविल्याचे त्यातून स्पष्ट होईल.'

म्हादईवर कर्नाटकने पाटबंधारे प्रकल्प बांधण्याचे काम सुरू करून पाणी वळविल्याने गोवा व कर्नाटक यांच्यात पाणीतंटा निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवरच 'प्रवाह' प्राधिकरण स्थापन करण्यात आलेले आहे. प्राधिकरणाचे कार्यालय गोव्यातच आहे. म्हादई पाणी तंटा लवादाने, तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याची योग्यरीत्या अंमलबजावणी केली जात आहे की नाही हे पाहण्यासाठी हे प्राधिकरण नेमलेले आहे.

दरम्यान, ७ जुलैला हे पथक बेळगावला रवाना होणार असून, कणकुंबी, कळसा-भंडुरा येथे कर्नाटकने म्हादई नदीवर केलेल्या बांधकामाची पाहणी करणार आहे. ही पाहणी केल्यानंतर प्रवाहची दुसरी बैठक ८ जुलैला बंगळुरू येथे होणार आहे. पत्रकार परिषदेस जलस्रोत खात्याचे सचिव सुभाष चंद्रा, तसेच मुख्य अभियंता प्रमोद बदामी उपस्थित होते

असा असेल गोवा दौरा

शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ५ व ६ रोजी रोजी हे पथक सुर्ला येथील धबधबा, त्यानंतर अंजुणे धरण, वाळवंटी नदी, म्हादईच्या वेगवेगळ्या शाखा एकत्र येतात ते उस्ते, गांजे, केरी, लाडकें वझर येथे भेट देईल. वाळवंटी नदीवरील प्रकल्पांबाबत माहिती घेईल.

१०० बंधारे पूर्ण करणार

दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना मंत्री शिरोडकर यांनी अशी माहिती दिली की, प्रस्तावित ३७४ बंधाऱ्यांपैकी १०० बंधारे २०२५ अखेरपर्यंत (पुढील वर्षी) बांधून पूर्ण केले जातील.

 

टॅग्स :goaगोवाriverनदी