शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

Goa Election 2022: हरण्यासाठीही निवडणुका असतात; गोव्यात पहिल्यांदा पराभूत झाले, ते पुढे मुख्यमंत्री झाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 16:40 IST

जे पहिल्या निवडणुकीत पराभूत झाले, ते पुढे मुख्यमंत्री झाले अशी अनेक उदाहरणे आहेत. एक निवडणूक हरले म्हणजे सगळे काही संपले असा त्याचा अर्थ मुळीच नसतो.

सदगुरू पाटील

निवडणुका फक्त जिंकण्यासाठीच असतात, असे एक सर्वसाधारण विधान राजकीय पक्षांकडून केले जाते. राजकीय विश्लेषकांनाही तसेच वाटते. जिंकण्यासाठीच लढायचे असते, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण, काहीवेळा निवडणुका हरण्यासाठी देखील असतात हे लक्षात घ्यायला हवे. याच अनुषंगाने हा विश्लेषणाचा एक प्रयत्न.

गेल्या पंचवीस वर्षांत जे आमदार राज्यात निवडून आले, त्यापैकी अनेकजण कोणत्या ना कोणत्या निवडणुकीत पराभूत झाले. अनेकजण पहिल्याच प्रयत्नात पराभूत झाल्याचे दाखले पाहायला मिळतात. मनात जिंकण्याचा निर्धार हवा, पण आपण जिंकणार नाही असे वाटत असले तरी, निवडणुका लढणाराच फायटर असतो. अशा प्रकारचा उमेदवार लोकांना आवडतो व दुसऱ्या प्रयत्नावेळी लोक अशा उमेदवारांना निवडून देतात. काही उदाहरणे म्हणून प्रसाद गावकर, गोविंद गावडे, माथानी साल्ढाणा, रवी नाईक, माधव बीर आदी अनेक आमदारांची नावे सांगता येतील. आयुष्यातील पहिली निवडणूक काही नेते हरलेच होते. काहीजण मग दुसऱ्यांदा निवडून आले, तर काहीजण तिसऱ्यांदा. काहीजण मंत्री, आमदार होऊन मग पराभूत झाले व पुन्हा जिंकून आले. 

रवी नाईक १९८० च्या निवडणुकीत फोंड्यात मगो पक्षाच्या तिकिटावर पराभूत झाले होते. प्रसाद, गोविंद गावडे, किरण कांदोळकर हे त्यांच्या कारकिर्दीतील पहिली निवडणूक पराभूत झाले होते. पण ते हरले तरी, त्यांनी आपला प्रभाव दाखवून दिला होता. खूप मते मिळवली होती. १९८० साली फोंड्यात जॉईल्द आगियार अर्स काँग्रेसवर जिंकले तेव्हा आगियार यांना ६७०० मते मिळाली होती. रवींना त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे ६००९ मते प्राप्त झाली होती. तेच रवी मग दहा वर्षांनी राज्यात मुख्यमंत्री झाले. मनोहर पर्रीकर आयुष्यातील पहिली लोकसभा निवडणूक हरले होते. विधानसभा निवडणूक ते जिंकले व पुढे तेच पर्रीकर सहा वर्षांत मुख्यमंत्री झाले. माथानी साल्ढाणा तर अनेकदा हरायचे. पण, नंतर ते मंत्री झाले. अनुभवातून खरे व गंभीर खाचखळगे राजकारणी शिकतात. म्हणून पुढे ते यशस्वी होतात. आपण पराभूत होणार हे ठाऊक असून देखील रिंगणात उतरतात व धाडसाने प्रतिस्पर्ध्याला टक्कर देऊ पाहतात, अशा उमेेदवारांना पुढे संधी मिळतेच. भाऊसाहेब बांदोडकर यांनाही कदाचित पहिल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीवेळी भीती वाटत होती. लोकप्रियता असली तरी, आपण जिंकणार की नाही याविषयी कदाचित शंका असावी व त्यामुळे ते पहिली निवडणूक लढले नव्हते, मग त्यांनी पोटनिवडणूक जिंकली हा भाग वेगळा.

गोवा मुक्तीनंतर झालेल्या काही निवडणुकांमध्ये मोठमोठी प्रस्थे पराभूत झाली होती. काही खाण मालक, अन्य उद्योगपती हरले होते. म्हणून काही निवडणूक लढवायचीच नाही? थेट पहिल्याच प्रयत्नात जिंकलो, असे सर्वांबाबत होत नसते. १९८४ साली गोवा काँग्रेसच्या तिकिटावर विली डिसोझा हरले होते. त्यावेळी मगोपचे श्रीकांत मळीक हे विलींविरुद्ध कळंगुटमध्ये जिंकले होते. मळीक पुढे सीएम वगैरे झाले नाही, पण विली डिसोझा झाले. लांब पल्ल्याचे घोडे हे पराभवाने खचत नसतात. उत्पल पर्रीकर यांनाही कदाचित ह्या इतिहासाची कल्पना असावी. त्यामुळेच ते माघार घेणार नाहीत, याचा पूर्ण विश्वास पणजीतील सध्याच्या उत्पल समर्थक कार्यकर्त्यांना आहे. चर्चिल आलेमांव हे १९८४ च्या निवडणुकीत बाणावली मतदारसंघात पराभूत झाले होते. माँत क्रुझ जिंकले होते, पण चर्चिलना साडेपाच हजार मते त्यावेळीही मिळाली होती, हे लक्षात घ्यायला हवे. तेच चर्चिल पुढे ९०च्या दशकात १९ दिवस तरी मुख्यमंत्री झाले. नंतर अनेकदा मंत्रीही झाले. माँत क्रुझ मुख्यमंत्री कधी झाले नाही. १९८० साली सुरेंद्र सिरसाट म्हापशात पराभूत झाले होते. श्यामसुंदर नेवगी तेव्हा  जिंकले होते. शशिकलाताई त्यावेळी हरल्या होत्या. 

संघर्ष करणारे नेते एकदा पराभूत झाले तर पुढे जिंकत असतात. रोहन खंवटे पणजीत नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी एका वार्डात पराभूत झाले होते. त्यावेळी ताळगावचे स्व. सोमनाथ जुवारकर हे पणजीतही बडे प्रस्थ होते. मात्र खंवटे पुढे विधानसभेत दोनवेळा पोहोचले व राज्याचे मंत्रीही झाले. पर्वरी मतदारसंघ त्यांनी पूर्णपणे आपल्या प्रभावाखाली आणला आहे. विनोद पालयेकर यांचे बंधू, स्व. उदय पालयेकर यांचे बंधू शिवोली मतदारसंघात हरत होते. पण विनोद मात्र पहिल्याच प्रयत्नात जिंकले. राजकीय स्थिती कधी अनुकूल तर कधी प्रतिकुल होत असते. 

उत्पल यावेळी जर पणजीत अपक्ष देखील उभे राहिले तरी, बाबूश मोेन्सेरात यांना घाम काढला जाऊ शकतो. दोन महिन्यांपूर्वी पणजीत तशी स्थिती नव्हती, आता भावनिक वातावरण तयार होऊ लागलेय. तुम्ही पर्रीकरांच्या मुलाला तुच्छ लेखता म्हणजे काय? असा प्रश्न पणजीतील काही ख्रिस्ती मतदार भाजपच्या काही नेत्यांना विचारतात तेव्हा आश्चर्य वाटते. 

विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे विधानसभेची पहिली पोटनिवडणूक पराभूत झाले होते, पण नंतर जिंकून ते सभापती झाले व नंतर मुख्यमंत्रीही झाले. लक्ष्मीकांत पार्सेकरांचे तर डिपॉझिटही पहिल्या दोन निवडणुकांत जप्त झाले होते. पण, तेही नंतर मंत्री, मुख्यमंत्री झाले. हा सगळा ताजा राजकीय इतिहास राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनीही विविध दृष्टीकोनांतून अभ्यासायला हवा. त्याचे अधिक तपशीलाने विश्लेषण व्हायला हवे. अचानक आले, जिंकले व मंत्री, सीएम झाले असे होत नाही. ठोकर खावी लागते. श्रीपाद नाईक मडकईत हरल्यानंतर जे खासदार झाले, ते अजून खासदारकी व केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवत आहेत. १९८९ साली दिगंबर कामत आयुष्यातील पहिली विधानसभा निवडणूक लढले होते. त्यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर मडगावमध्ये उभे राहूनही कामत यांना पराभव पाहावा लागला होता. त्या निवडणुकीत बाबू नायक यांनी पाचशे मतांच्या फरकाने कामत यांना पराभवाचे पाणी पाजले होते. स्व. बाबू नायक अपक्ष लढले होते. कामत तेव्हा वयाच्या पस्तीशीत होते. तेच कामत पुढे २००७ साली गोव्याचे मुख्यमंत्री झाले. कामत यांच्या स्वभावात गोडवा आहे. गर्व नाही. सीएम झाले तरी ते अहंकारी झाले नव्हते. त्यामुळेच ते सातत्याने निवडून आले. कुणाही नव्या राजकारण्याने यशस्वी होण्यासाठी कामत यांचा निदान हा गुण तरी स्वीकारायला हवा. मनोहर पर्रीकर यांचा स्वभाव वेगळा होता. विली डिसोझा हे वेगळे होते. दयानंद नार्वेकर तर नमणारेच नव्हते. १९८९ साली हळदोणेत नार्वेकरांना लोकांनी पराभूत करून रत्नाकर चोपडेकर यांना मगोपच्या तिकिटावर निवडून दिले होते. नंतरच्या काळात नार्वेकरांनी पुन्हा मुसंडी मारून अनेक वर्षे मंत्रीपदही अनुभवले. गुरुदास गावस हे काँग्रेसतर्फे पूर्वीच्या पाळी मतदारसंघातून हरले होते. पण, नंतर ते आमदार झाले. प्रवीण झांट्ये यांनीही तोच अनुभव घेतला आहे.

निवडणुका हरणे म्हणजे सगळे काही संपले असे असत नाही. किंबहुना हरणारेच जिंकतात व मुख्यमंत्री देखील होतात. सासष्टी तालुक्यात अनेक राजकारणी प्रथम विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. काही उमेदवार मात्र निवडणुकीवेळी फक्त सेटिंग करण्यासाठी उभे राहत असतात. त्यांना जिंकण्याची इच्छा असत नाही. काहीजणांना दुसरा एखादा प्रस्थापित नेता किंवा मंत्री आपल्या विरोधकांची मते फोडण्यासाठी रिंगणात उतरवत असतो. उत्पल किंवा अन्य राजकारणी हे अशा प्रकारचे राजकारण करण्यासाठी आलेले नाहीत. पूर्वी काँग्रेसचे काही उमेदवार जिंकण्यासाठी तिकीट घेतच नव्हते. केवळ मिरवण्यासाठी व पडद्याआडून सेटिंग करण्यासाठी तिकीट घेत होते. त्यामुळेच लोकांचा विश्वास गेला. काँग्रेसला यावेळी जिंकू किंवा मरूच्या इर्षेने लढण्याची शेवटची संधी आहे. मात्र, काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसने यावेळी ज्यांना तिकीट दिले आहे, त्यापैकी दोघा-तिघांची नावे पाहिल्यानंतर राजकीय अभ्यासकांना हसावे की रडावे, ते कळत नाही. वाळपईपासून सुरुवात करावी लागेल. पणजीत म्हणे एल्वीस गोम्स यांना तिकीट देण्याची स्वप्ने काँग्रेसच्या नेत्यांना पडतात. डोके ठिकाणावर आहे ना असे विचारावेसे वाटते. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Politicsराजकारण