शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

पोलीस स्थानकांत हवा बाल तक्रार विभाग

By admin | Updated: August 23, 2015 02:04 IST

पणजी : राज्यात अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकात खास बाल तक्रार विभाग स्थापन करण्यात यावा

पणजी : राज्यात अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकात खास बाल तक्रार विभाग स्थापन करण्यात यावा, अशी मागणी कळंगुट बाल ग्राम समितीच्या बैठकीत झाली. राज्यातील समुद्रकिनारी परिसरात मोठ्या प्रमाणात बालमजुरी चालते. यात परप्रांतीय मुलांबरोबरच स्थानिक मुलांचाही समावेश आहे. बालमजुरी करून घेणे हा गुन्हा असला तरी कळंगुट, कांदोळीसारख्या समुद्रकिनारी परिसरात मोठमोठ्या हॉटेल, मसाज पार्लर, शॅक्स येथे सर्रासपणे अल्पवयीन मुले काम करताना आढळतात. काही मुलांकडून केवळ मजुरी करून घेतली जात नाही, तर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार, शारीरिक अत्याचारही केले जातात. आर्थिक परिस्थितीने कमजोर असलेली मुले मोठी रक्कम मिळते, या आशेने मसाज पार्लर, हॉटेलमध्ये काम करण्यास तयार होतात. गांभीर्याची बाब म्हणजे अशा कामात केवळ परप्रांतीयांची मुले नव्हे, तर स्थानिक मुलांचाही समावेश असल्याचे सीआरजी संस्थेच्या निदर्शनास आले आहे. सीआरजी संस्थेतर्फे कांदोळी, कळंगुट परिसरात घेतलेल्या बाल ग्राम समितीत पोलीस अधिकारी, सामाजिक संस्थेचे सदस्य, पंचायतीचे सदस्य असून मुलांना एका व्यासपीठावर आपल्या समस्या, सूचना मांडण्याची मुभा देण्यात येते. समाजकार्यकर्ते एकनाथ नागवेकर म्हणाले, या परिसरात बालमजुरी थांबविण्यासाठी विविध स्तरांवर जागृती करण्याची गरज आहे. यात पोलिसांची मदत महत्त्वपूर्ण ठरेल. प्रत्येक शॅक, हॉटेल, मसाज पार्लर, गाडे यावर बालमजूर दिसल्यास मालकाला दंड आकारण्याचा नियम सुरू करण्याची गरज आहे, अशी सूचना त्यांनी केली. ‘सेव्ह कळंगुट’ संस्थेचे नितेश चोडणकर म्हणाले, पैशांची कमतरता असल्याने काही मुले मसाज पार्लर, हॉटेलमध्ये काम करतात. यात स्थानिक मुलेही असतात. काही मुले सकाळी शाळा आणि संध्याकाळी मजुरी करतात. ही बालमजुरी रोखण्यासाठी पोलिसांनी मालकांना सूचना देणे आणि वेळ पडल्यास दंड आणि कारवाई करण्याची मोहीम सुरू करणे आवश्यक आहे. समुद्रकिनाऱ्यावर भीक मागणाऱ्या मुलांच्या संख्येतही वाढ होत आहे. पर्यटन हंगाम जवळ आल्यानंतर त्यात लक्षणीय वाढ होते. त्याला आवर घालण्यासाठीही समाजिक संस्थांबरोबर पोलिसांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. कळंगुट, कांदोळी परिसर हा पर्यटकांमुळे नेहमीच गजबजलेला असतो. या परिसरात बालमजुरी आणि बाल अत्याचार यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. मात्र, काही प्रकरणे नोंद होत नसल्याने ती कळत नाहीत. मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पर्यटकांना हॉटेल किंवा घरे भाड्याने देणाऱ्या मालकांनीही बाल सुरक्षा जबाबदारी उचलणे आवश्यक असल्याचा सूर बैठकीत उमटला. सीआरजीच्या सुषमा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. (प्रतिनिधी)