शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
4
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
5
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
6
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
7
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
8
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
9
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
10
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
11
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
12
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
13
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
14
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
15
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
16
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
17
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
18
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
19
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
20
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

गोव्याला कोळसा हब बनवण्याचा डाव; खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची लोकसभेत चौफेर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2024 08:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : ' गोवा हे राज्य म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाते. मात्र आता गोव्याला कोळसा ...

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'गोवा हे राज्य म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाते. मात्र आता गोव्याला कोळसा हब बनवण्याचा डाव खेळला जात आहे' असा आरोप दक्षिण गोव्याचे खासदार, कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी लोकसभेत केला.

लोकसभेतील भाषणात खासदार विरियातो म्हणाले की, 'गोवा हे सुंदर राज्य अशी अनेकांची ओळख आहे. मात्र, मागील काही वर्षांत गोमंतकीय लोकांवर कटकारस्थान रचून प्रकल्प लादले जात आहे. प्रकल्पांबाबत लोकांना विश्वासात घेतले जात नाही. केवळ कोळसा वाहतुकीसाठी हे सर्व केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

फर्नांडिस म्हणाले, की सरकारने गोव्यातील नद्या आपल्या ताब्यात घेतल्या. सहा नद्यांचे अगोदर राष्ट्रीयीकरण केले. त्यानंतर कोविड काळात रेल्वे दुपदरीकरण, तामनार प्रकल्प तसेच महामार्ग विस्तारीकरण असे तीन प्रकल्प लोकांवर लादले. प्रकल्पांना विरोध होत असूनही ते पुढे रेटले जात आहेत. सरकारने काही सांगितले तरी या प्रकल्पांद्वारे केवळ कोळसा वाहतुकीला चालना देण्यासाठी व गोव्याला कोळसा हब बनवण्यासाठी हे सर्व केले जात आहे' असा आरोप त्यांनी केला.

'गोवा १९६१ साली पोर्तुगिजांच्या राजवटीतून मुक्त झाले. तेव्हापासून राज्यात पर्यटन उद्योग हे एकमेव क्षेत्र आहे, जे चांगले काम करीत आहे. खाण बंदीनंतर पर्यटन उद्योगात कार्यरत आहे. कृषी क्षेत्र अपेक्षेनुसार काम करीत नाही. कृषी क्षेत्राला प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. अशातच गोव्याला कोळसा हब बनवू देऊ नका. सरकारने प्रकल्प आणताना जनतेला विश्वासात घ्यावे. कारण पर्यटन हा एकमेव उद्योग आहे, जो युवकांना रोजगार देतो. अन्यथा राज्य उद्ध्वस्त होईल, अशी भीतीही फर्नाडिस यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :goaगोवाlok sabhaलोकसभाParliamentसंसदcongressकाँग्रेस