शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'प्लास्टर'च्या मूर्ती लागल्या तरंगू; विसर्जनस्थळावरील चित्र, पर्यावरणाच्या हानीसह बाप्पांची अहवेलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 12:37 IST

विसर्जन केलेल्या या मूर्तीचे पाण्यात विघटन न होता त्या किनाऱ्यावर तरंगू लागल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यातील दीड तसेच पाच दिवसांच्या गणपतींचे विर्सजन करण्यात आले आहे. तर काल, सोमवारी सात दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. परंतु, यंदाही अनेक गणेशभक्तांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना पसंती दिल्याचे दिसून आले आहे. कारण, विसर्जन केलेल्या या मूर्तीचे पाण्यात विघटन न होता त्या किनाऱ्यावर तरंगू लागल्याचे चित्र आहे.

एकीकडे पर्यावरणाची हानी तर दुसरीकडे बाप्पांची अहवेलना असेच काहीसे चित्र आता किनारी भागात दिसू लागले आहे. प्लास्टरच्या गणेशमूर्ती दिसायला अगदी आकर्षक तसेच हाताळण्यासाठी हलक्या. परंतु, पर्यावरणाला सर्वाधिक धोका याच मूर्तीमुळे बसत आहे. दीड आणि पाच दिवसांच्या गणपतींचे विर्सजन होऊन बरेच दिवस झाले आहे. परंतु, प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती पाण्यात 'जैसे थे' आहेत. या मूर्तीचा रंग देखील उतरलेला नाही.

यातून या मूर्ती पर्यावरणाला किती घातक ठरत आहे, हे स्पष्ट होते. काही भक्तांनी आपण प्लास्टरच्या नाही तर शाडूच्या मूर्ती घेतल्याचे सांगितले. परंतु, त्याच मूर्तीचे अद्याप विघटन झाले नसल्याने तेही गोंधळात पडल्याचे दिसत होते. तर काही भक्तांनी पूजलेल्या प्लास्टरच्या मूर्तीना दगड बांधून पाण्यात सोडल्याचे समोर आले आहे.

किनाऱ्यावर निर्माल्य

अनेक विर्सजनस्थळी निर्माल्यांची विल्हेवाट लावण्याची सोय केलेली दिसत नाही. कचरापेटी देखील अनेक ठिकाणी नसल्याचे दिसून येत आहे. अशावेळी विसर्जनासाठी आलेले भक्त निर्माल्य थेट पाण्यात फेकतात. अनेक ठिकाणी निर्माल्याचा कचरा वाहून किनान्यावर आल्याचे चित्र आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. प्लास्टरपासून तयार केलेल्या मूर्तीसाठी वापरण्यात येणारे रंग रासायनिक असतात. यातून कर्करोग देखील होऊ शकतो. हाच रंग मासे खातात आणि नंतर त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे घातक केमिकल पोहचते. - डॉ. बबन इंगोले, माजी शास्त्रज्ञ.

 

टॅग्स :goaगोवाGanesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सव