शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

भ्रष्टाचार अन् अहंकारात बुडलेल्या सत्तेला जनतेने नाकारले: मुख्यमंत्री; दिल्लीतील विजयाचा गोव्यात आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2025 11:40 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताच्या वाटेवर असल्याचे दिसताच गोव्यासह देशभरात जल्लोष सुरू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: आम आदमी पक्षाचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, त्यात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यावरही ओढावलेली पराभवाची नामुष्की हा गोव्यातील आम आदमी पार्टीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. कारण, हायकमांड नेतेच पराभूत झाल्यामुळे आता स्थानिक नेत्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या गोटात कमालीचा उत्साह पसरला असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विजयाचा जल्लोष साजरा केला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताच्या वाटेवर असल्याचे दिसताच गोव्यासह देशभरात जल्लोष सुरू झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काल साखळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विजय साजरा केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, वास्कोचे आमदार दाजी साळकर, सर्वानंद भगत, भाजप नेते सिद्धार्थ कुंकळ्ळकर, सुलक्षणा सावंत, जिल्हा सदस्य गोपाळ सुर्लकर, सरचिटणीस कालिदास गावस, मंडळ अध्यक्ष रामा नाईक, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर यांच्यासह नगरसेवक, सरपंच, पंच सदस्ययांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आणि अहंकारी बनलेल्या आम आदमी पक्षाला दिल्लीकरांनी त्यांची जागा दाखवली. तसेच, काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडल्याचेही ते म्हणाले.

खोटेपणाला दिल्लीच्या जनतेने धडा शिकवत आम आदमी पक्ष व काँग्रेसचा धुव्वा उडविला आहे. या निवडणुकीत भाजपने निर्विवाद मिळवलेले यश हे भाजपवर असलेला विश्वास आहे. दिल्लीच्या विकासाला आता खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. दिल्लीच्या विजयाने देशातील जनतेला भाजपचे नेतृत्व मान्य असल्याचे स्पष्ट होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मी स्वतः दिल्लीतील चार मतदारसंघांत प्रचार केला आहे. त्याचवेळी दिल्लीत भाजपला पूर्ण बहुमत मिळणार याची खात्री होती. लोकांना खोटी आश्वासन देऊन भ्रष्टाचारात बुडलेल्या आम आदमी पक्षाविरोधात लाट पसरली होती. यापुढे डबल इंजिन सरकार दिल्लीला मजबूत सरकार प्राप्त करून देताना प्रत्येक घरात समृद्धी आणण्यास वचनबद्ध असेल. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी तसेच गृहमंत्री अमित शाह चाणक्य नीती व जे. पी. नड्डा यांचे संघटन या बळावरच भाजपने दिल्लीत विरोधकांना पळता भुई थोडी केली. जवळपास २७ वर्षांनतर भाजपने बहुमताने दिल्लीत विजय मिळवला आहे. या विजयात आपले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचाही वाटा आहे. - दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाPoliticsराजकारण