शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

लोकांनी जवळून पाहिलीय माझी २५ वर्षांतील कामगिरी: श्रीपाद नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2024 08:57 IST

जे आत्ताच आले, ते प्रश्न विचारतात?

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभेसाठी मला तिकीट मिळाल्याने विरोधकांचा आत्मविश्वास डगमगला आहे. यातून ते केवळ लोकांची दिशाभूल करत आहेत. जे नुकतेच राजकारणात आले ते विचारतात की, मी गेल्या २५ वर्षांत काय केले? ते नुकतेच आल्याने त्यांना माहीतदेखील नसणार, हे मी समजू शकतो. आम्ही जी कामे २५ वर्षात केली ती लोकांनी पहिली आहेत, त्यामुळे लोकांची दिशाभूल करणे विरोधकांनी टाळावे, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, तरीही टीका सुरू झाल्या आहेत. ताळगाव मतदारसंघाने आतापर्यंत बऱ्यापैकी विकास केला आहे. त्यांना आवश्यक गोष्टी खासदार असताना यापूर्वी मी दिल्या आहेत, यापुढे देखील जे आवश्यक आहे, ते त्यांना निश्चित मिळणार आहे, असे आश्वासन भाजपचे लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी दिले.

विकासकामे हाच प्रमुख मुद्दा

कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे काम केले पाहिजे. सरकारने केलेली विकासकामे हाच आमच्यासाठी या लढाईत प्रमुख अस्त्र असणार आहे. भाजप सरकारने केवळ समाजाचाच विकास केला नाही, तर लोकांचाही विकास केला आहे. हे लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. माझा देश, माझे राज्य, माझे गाव हीच भावना मनात ठेऊन मी देखील आतापर्यंत काम केले आहे, याच कामांमुळे मी आज मान वर करून लोकांकडे जात आहे, असेही नाईक यांनी यावेळी सांगितले.

पंचसदस्य, नगरसेवकांशी संपर्क

श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी ताळगाव मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार जेनिफर मोंसेरात, दामू नाईक, महापौर रोहित मोन्सेरात, जिल्हा पंचायत सदस्य अंजली नाईक व इतर पंच सदस्य, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी नाईक यांनी सर्व पंच सदस्य आणि नगरसेवकांशी वार्तालाप केला. व समस्या जाणून घेतल्या. मोन्सेरात कुटुंबीयांचा मला नेहमीच पाठिंबा मिळालेला आहे आणि यापुढेही त्यांचा पाठिंबा मिळणार आहे, याची मला खात्री आहे, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा