शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

कोंडीत लोकांची होरपळ, सरकारने जागे व्हावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 08:47 IST

दोन दिवस पणजी व पर्वरीत झालेली वाहतूक कोंडी जर कुणीही पाहिली तर राज्यातील सरकार जागे आहे की, नाही असा प्रश्न कुणालाही पडेल.

दोन दिवस पणजी व पर्वरीत झालेली वाहतूक कोंडी जर कुणीही पाहिली तर राज्यातील सरकार जागे आहे की, नाही असा प्रश्न कुणालाही पडेल. अटल सेतू हा तिसरा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने वाहतूक कोंडी झाली हे मान्य आहे, मात्र वाहतूक पोलिसांची व्यवस्था जिथे करायला हवी, तिथे केलीच जात नसल्याने पूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडून पडते. काही मंत्री, आमदार तसेच रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीत अडकल्या. मात्र सरकारला या स्थितीचे काहीच सोयरसुतक नसावे. एवढी उदासीनता आणि असंवेदनशीलता गोव्यात कधीच नव्हती. सरकारी यंत्रणेला कोणता रोग जडलाय ते कळत नाही, असे वाहनचालक पणजी व पर्वरीत फिरताना बोलतात. 

खंडणीच्या विषयावरून सरकारची नाचक्की झालेलीच आहे. त्यात वाहतूक कोंडीच्या विषयावरून सरकारने आणखी नाचक्की करून घेऊ नये. तत्काळ पणजीसह पर्वरी भागातही ज्यादा वाहतूक पोलिस नेमून वाहनचालकांचे त्रास थोडे कमी करावेत. काही मंत्रीदेखील बोलून दाखवतात की, वाहतूक पोलिस केवळ पर्यटकांची वाहने अडवून तालांव देण्यात मग्न आहेत. विद्यालये, जंक्शनच्या ठिकाणी पूर्वी वाहतूक पोलिस दिसायचे, त्यांना आता राज्य सरकारने उत्तर गोव्याच्या कळंगूट आदी किनारी भागांत तर नेमलेले नाहीत ना, असा प्रश्न लोक विचारत आहेत. सरकारी पातळीवरील भ्रष्टाचाराविषयी लोक उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत, अटल सेतू तर वारंवार नादुरुस्त होत आहे. त्यावरूनही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. ज्या पूज्य अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव पुलाला दिले आहे, तो पूल तरी नीट बांधायला हवा होता. एका मोठ्या कंपनीने बांधलेला हा पूल घाईघाईत उद्घाटनासाठी खुला करण्यात आला होता. (स्व.) मनोहर पर्रीकर यांना त्याचे उद्घाटन लवकर झालेले हवे होते. संबंधित कंत्राटदार कंपनीने अर्धवट काम केले होते. अटल सेतूचे रडगाणे आरंभापासूनच सुरू आहे. गोवा साधनसुविधा विकास महामंडळाने खरे म्हणजे कंत्राटदार कंपनीविरुद्ध खटला भरण्याची गरज आहे, पण महामंडळाला काही सोयरसुतक नाही.

राजधानी पणजीचा काल बुधवारी १८० वा वाढदिवस झाला. २२ मार्च १८४३ रोजी पणजीला शहराचा दर्जा देण्यात आला होता. त्याला आता १८० वर्षे झाली. आणि नेमका वाढदिवस साजरा होतानाच पणजीची दुर्दशा पाहायला मिळते. पर्रीकर आज हयात असते तर एवढी दुर्दशा झाली नसती, हेही मान्य करावे लागेल. पणजी बाहेरील लोकांनी आता पणजीत येणे खूप कमी केले आहे. काहीजणांनी आपली पणजीतील सरकारी व खासगी कामे एक महिन्याने पुढे ढकलली आहेत. आपण एक महिन्यानंतरच पाय ठेवणार, असे लोक सोशल मीडियावर जाहीर करू लागले आहेत. सरकारला याची शरम वाटणे गरजेचे आहे. सलग दोन दिवस पणजीत प्रचंड वाहतूककोंडी होत असताना जिल्हाधिकारी व पोलिस यंत्रणेने त्यावर कोणताही उपाय काढलेला नाही. पर्वरीवासीयांचे तर हालच झाले. 

पर्वरीतील वाहतूककोंडीत लोक अनेक तास अडकले. काल गुढीपाडवा होता, शाळा व सरकारी कार्यालये बंद होती, म्हणून वाहतूक बरीच कमी होती. सोमवारी व मंगळवारी हजारो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, रुग्णवाहिका अडकून पडल्या की, रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे काय हाल होतात याची कल्पना करता येते. दुर्दैव असे की, विद्यमान सरकारला तेवढेही कळत नाही. कळले असते तर वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने सगळी यंत्रणा वापरली असती. दोन दिवस वाहनचालकांना व प्रवाशांना मरण यातना सहन कराव्या लागल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी यंत्रणा जागी झाली व सीमेवर मालवाहू वाहने अडवावीत, असा आदेश निघाला. हे पूर्वी कळत नव्हते काय?

राजधानी पणजी सगळी फोडून ठेवल्यानंतर लोकांना जो त्रास होतोय, त्यावरही उपाय काढता येतो. मात्र पणजीचे आमदार, महापौर आणि मुख्यमंत्रीही त्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाहीत. फक्त राज्यपाल किंवा मुख्यमंत्री जेव्हा पणजीतून जायचे असतात, तेव्हाच वाहतूक पोलिस रस्त्यावर थांबलेले असतात. मंत्री किंवा आमदार वाहतूककोंडीत अडकून घामाघूम होतात तेव्हा पोलिस रस्त्यावर नसतातच. ही दुर्दशा आणि कोंडी किती काळ सहन करायची ?

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाTrafficवाहतूक कोंडी