शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकांची 'मन की बात' जाणा, अन्यथा करेक्ट कार्यक्रम! लोक होताहेत आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 08:55 IST

सरकारने आता लोकांच्या 'मन की बात' जाणून घ्यावी अन्यथा याचा वचपा म्हणून निवडणुकीत 'करेक्ट कार्यक्रम' करतील.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: पंच, सरपंच, आमदारांच्या नाकर्तेपणाला लोक कंटाळले आहेत. पंचायत क्षेत्रामध्ये बेकायदा कृत्यांना आलेला ऊत, गाव उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांना घातल्या जाणाऱ्या पायघड्या तसेच साधनसुविधांवर ताण असताना आणले जाणारे मेगा प्रकल्प यामुळे ग्रामसभा तापत आहेत. सरकारने आता लोकांच्या 'मन की बात' जाणून घ्यावी अन्यथा याचा वचपा म्हणून निवडणुकीत 'करेक्ट कार्यक्रम' करतील.

राज्यातील १९१ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश पंचायतींमध्ये रविवारी झालेल्या ग्रामसभांमध्ये याचा प्रत्यय आला. पर्यावरणाच्या विषयावरही आता लोक जागरुक बनले आहेत. अडवलपाल ग्रामसभेत खाणींना झालेला विरोध याचाच प्रत्यय देते. प्रदूषणामुळे गाव उद्ध्वस्त होतात याची जाणीव आता सर्वांनाच झालीय.

वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधांवर ताण असताना शेकडो सदनिकांचे मेगा प्रकल्प येऊ घातल्यावर ग्रामस्थ संतप्त होणारच. अजूनही मेगा प्रकल्प म्हटले की, ग्रामस्थ याच कारणास्तव चवताळून उठतात. ग्रामसभांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची तरतूद असतानाही अनेक पंचायती त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

असे आढळून आहे

सत्तरी, सांगे, पेडणे, काणकोण तालुक्यांमध्ये ग्रामसभांचे व्हिडीओ चित्रीकरण होतच नाही. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः ग्रामसभांचे व्हिडीओ चित्रीकरण आरंभले आहे. कार्यकर्ते ग्रामसभांमध्ये आक्रमकपणे मुद्दे मांडतात. पंचायत क्षेत्रातील बेकायदा बांधकामे, गैरकृत्ये, परप्रांतीयांना अभय देण्याचे काही पंचायतींचे धोरण यावर तुटून पडतात.

पंचायती भ्रष्टाचाराने बरबटलेल्या

आरजीचे आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, राज्यातील बहुतांश ग्रामपंचायती भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहेत.कोणताही प्रकल्प असो, लोकांना विश्वासात घेतले जात नाही. सरपंच, सचिवाला जाब विचारण्याचे अधिकार ग्रामस्थांना आहेत. खरे तर पंचायतीचा सचिव हा सरकारी प्रतिनिधी असल्याने तटस्थ असायला हवा. परंतु, तोदेखील सत्ताधारी पंचायत मंडळांना फितूर असतो व सर्वत्र मिली भगत चालते.

ग्रामसभांचा प्रभावी माध्यम म्हणून वापर

राजकीय विश्लेषक अॅड. क्लिओफात कुतिन्हो म्हणाले की, सरकार, प्रशासनातील अधिकारी, पंचायत मंडळे विविध आघाड्यांवर अपयशी ठरल्याने लोकांना आपल्या समस्या, गाऱ्हाणी मांडण्यासाठी ग्रामसभा प्रभावी माध्यम वाटते व त्यामुळेच लोक या व्यासपीठाचा वापर करतात. स्वतःला जे वाटते ते आक्रमकपणे मांडतात. ग्रामसभा आक्रमक होत आहेत यातून तर निदान सरकारने बोध घ्यायला हवा.

 

टॅग्स :goaगोवा