शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

लोकांची 'मन की बात' जाणा, अन्यथा करेक्ट कार्यक्रम! लोक होताहेत आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 08:55 IST

सरकारने आता लोकांच्या 'मन की बात' जाणून घ्यावी अन्यथा याचा वचपा म्हणून निवडणुकीत 'करेक्ट कार्यक्रम' करतील.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: पंच, सरपंच, आमदारांच्या नाकर्तेपणाला लोक कंटाळले आहेत. पंचायत क्षेत्रामध्ये बेकायदा कृत्यांना आलेला ऊत, गाव उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांना घातल्या जाणाऱ्या पायघड्या तसेच साधनसुविधांवर ताण असताना आणले जाणारे मेगा प्रकल्प यामुळे ग्रामसभा तापत आहेत. सरकारने आता लोकांच्या 'मन की बात' जाणून घ्यावी अन्यथा याचा वचपा म्हणून निवडणुकीत 'करेक्ट कार्यक्रम' करतील.

राज्यातील १९१ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश पंचायतींमध्ये रविवारी झालेल्या ग्रामसभांमध्ये याचा प्रत्यय आला. पर्यावरणाच्या विषयावरही आता लोक जागरुक बनले आहेत. अडवलपाल ग्रामसभेत खाणींना झालेला विरोध याचाच प्रत्यय देते. प्रदूषणामुळे गाव उद्ध्वस्त होतात याची जाणीव आता सर्वांनाच झालीय.

वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधांवर ताण असताना शेकडो सदनिकांचे मेगा प्रकल्प येऊ घातल्यावर ग्रामस्थ संतप्त होणारच. अजूनही मेगा प्रकल्प म्हटले की, ग्रामस्थ याच कारणास्तव चवताळून उठतात. ग्रामसभांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची तरतूद असतानाही अनेक पंचायती त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

असे आढळून आहे

सत्तरी, सांगे, पेडणे, काणकोण तालुक्यांमध्ये ग्रामसभांचे व्हिडीओ चित्रीकरण होतच नाही. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः ग्रामसभांचे व्हिडीओ चित्रीकरण आरंभले आहे. कार्यकर्ते ग्रामसभांमध्ये आक्रमकपणे मुद्दे मांडतात. पंचायत क्षेत्रातील बेकायदा बांधकामे, गैरकृत्ये, परप्रांतीयांना अभय देण्याचे काही पंचायतींचे धोरण यावर तुटून पडतात.

पंचायती भ्रष्टाचाराने बरबटलेल्या

आरजीचे आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, राज्यातील बहुतांश ग्रामपंचायती भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहेत.कोणताही प्रकल्प असो, लोकांना विश्वासात घेतले जात नाही. सरपंच, सचिवाला जाब विचारण्याचे अधिकार ग्रामस्थांना आहेत. खरे तर पंचायतीचा सचिव हा सरकारी प्रतिनिधी असल्याने तटस्थ असायला हवा. परंतु, तोदेखील सत्ताधारी पंचायत मंडळांना फितूर असतो व सर्वत्र मिली भगत चालते.

ग्रामसभांचा प्रभावी माध्यम म्हणून वापर

राजकीय विश्लेषक अॅड. क्लिओफात कुतिन्हो म्हणाले की, सरकार, प्रशासनातील अधिकारी, पंचायत मंडळे विविध आघाड्यांवर अपयशी ठरल्याने लोकांना आपल्या समस्या, गाऱ्हाणी मांडण्यासाठी ग्रामसभा प्रभावी माध्यम वाटते व त्यामुळेच लोक या व्यासपीठाचा वापर करतात. स्वतःला जे वाटते ते आक्रमकपणे मांडतात. ग्रामसभा आक्रमक होत आहेत यातून तर निदान सरकारने बोध घ्यायला हवा.

 

टॅग्स :goaगोवा