शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

लोकांची 'मन की बात' जाणा, अन्यथा करेक्ट कार्यक्रम! लोक होताहेत आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 08:55 IST

सरकारने आता लोकांच्या 'मन की बात' जाणून घ्यावी अन्यथा याचा वचपा म्हणून निवडणुकीत 'करेक्ट कार्यक्रम' करतील.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: पंच, सरपंच, आमदारांच्या नाकर्तेपणाला लोक कंटाळले आहेत. पंचायत क्षेत्रामध्ये बेकायदा कृत्यांना आलेला ऊत, गाव उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांना घातल्या जाणाऱ्या पायघड्या तसेच साधनसुविधांवर ताण असताना आणले जाणारे मेगा प्रकल्प यामुळे ग्रामसभा तापत आहेत. सरकारने आता लोकांच्या 'मन की बात' जाणून घ्यावी अन्यथा याचा वचपा म्हणून निवडणुकीत 'करेक्ट कार्यक्रम' करतील.

राज्यातील १९१ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश पंचायतींमध्ये रविवारी झालेल्या ग्रामसभांमध्ये याचा प्रत्यय आला. पर्यावरणाच्या विषयावरही आता लोक जागरुक बनले आहेत. अडवलपाल ग्रामसभेत खाणींना झालेला विरोध याचाच प्रत्यय देते. प्रदूषणामुळे गाव उद्ध्वस्त होतात याची जाणीव आता सर्वांनाच झालीय.

वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधांवर ताण असताना शेकडो सदनिकांचे मेगा प्रकल्प येऊ घातल्यावर ग्रामस्थ संतप्त होणारच. अजूनही मेगा प्रकल्प म्हटले की, ग्रामस्थ याच कारणास्तव चवताळून उठतात. ग्रामसभांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची तरतूद असतानाही अनेक पंचायती त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

असे आढळून आहे

सत्तरी, सांगे, पेडणे, काणकोण तालुक्यांमध्ये ग्रामसभांचे व्हिडीओ चित्रीकरण होतच नाही. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः ग्रामसभांचे व्हिडीओ चित्रीकरण आरंभले आहे. कार्यकर्ते ग्रामसभांमध्ये आक्रमकपणे मुद्दे मांडतात. पंचायत क्षेत्रातील बेकायदा बांधकामे, गैरकृत्ये, परप्रांतीयांना अभय देण्याचे काही पंचायतींचे धोरण यावर तुटून पडतात.

पंचायती भ्रष्टाचाराने बरबटलेल्या

आरजीचे आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, राज्यातील बहुतांश ग्रामपंचायती भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहेत.कोणताही प्रकल्प असो, लोकांना विश्वासात घेतले जात नाही. सरपंच, सचिवाला जाब विचारण्याचे अधिकार ग्रामस्थांना आहेत. खरे तर पंचायतीचा सचिव हा सरकारी प्रतिनिधी असल्याने तटस्थ असायला हवा. परंतु, तोदेखील सत्ताधारी पंचायत मंडळांना फितूर असतो व सर्वत्र मिली भगत चालते.

ग्रामसभांचा प्रभावी माध्यम म्हणून वापर

राजकीय विश्लेषक अॅड. क्लिओफात कुतिन्हो म्हणाले की, सरकार, प्रशासनातील अधिकारी, पंचायत मंडळे विविध आघाड्यांवर अपयशी ठरल्याने लोकांना आपल्या समस्या, गाऱ्हाणी मांडण्यासाठी ग्रामसभा प्रभावी माध्यम वाटते व त्यामुळेच लोक या व्यासपीठाचा वापर करतात. स्वतःला जे वाटते ते आक्रमकपणे मांडतात. ग्रामसभा आक्रमक होत आहेत यातून तर निदान सरकारने बोध घ्यायला हवा.

 

टॅग्स :goaगोवा